शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

सौदी अरेबियामध्ये भारतीयांच्या नोक-यांवर गदा? कामगारविषयक धोरणात महत्त्वपूर्ण बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:18 IST

सौदी अरेबियाने त्यांच्या निताकत या कामगारविषयक धोरणात महत्त्वपूर्ण बदल केला असून, त्यामुळे नोकरीच्या उद्देशाने सौदीमध्ये जाऊ पाहणा-या भारतीयांच्या अडचणी वाढणार आहेत.

रियाध : सौदी अरेबियाने त्यांच्या निताकत या कामगारविषयक धोरणात महत्त्वपूर्ण बदल केला असून, त्यामुळे नोकरीच्या उद्देशाने सौदीमध्ये जाऊ पाहणा-या भारतीयांच्या अडचणी वाढणार आहेत. सौदी सरकारने नव्या बदलांद्वारे स्थानिकांना नोक-यांमध्ये प्राधान्य देण्याचे ठरविले आहे.सौदीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांत लाखो भारतीय नोकरी करत आहेत. तिथे २०१६ साली नोकºया करणाºया भारतीयांची संख्या २५ लाख होती. मात्र मागील काही महिन्यांत त्यात विविध कारणांमुळे घट झाली आहे. उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांमधून दरवर्षी मोठ्या संख्येने तरुण नोकरीसाठी सौदीला जात असतात. त्यातच सौदी अरेबियात १ जुलैपासून परदेशी व्यक्तीला दरमहा १०० रियाल म्हणजे सुमारे १७०० रुपये इतका कुटुंब कर लागू झाला आहे. त्यामुळे तिथे नोकरीच्या निमित्ताने राहणारे भारतीय आपल्या कुटुंबाला मायदेशी पाठवू लागले आहेत. दरम्यान, या करामुळे सौदीत राहण्याचा खर्च परवडणे अशक्य झाल्याने काही कुटुंबांनी हैदराबादला परतण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मोहम्मद ताहिरने दिली. ताहिर पेशाने संगणक तज्ज्ञ आहे. मागील चार महिन्यांत अनेकांनी आपली कुटुंबे भारतात पाठवल्याची माहिती स्थलांतरितांच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते भीम रेड्डी मंधा यांनी दिली. (वृत्तसंस्था)