शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
2
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
3
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
4
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
5
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
6
सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडसोबत मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात?
7
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
8
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
9
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
10
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
11
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
12
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
13
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
14
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
15
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
16
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
17
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
18
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
19
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
Daily Top 2Weekly Top 5

सौदी अरेबियामध्ये भारतीयांच्या नोक-यांवर गदा? कामगारविषयक धोरणात महत्त्वपूर्ण बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:18 IST

सौदी अरेबियाने त्यांच्या निताकत या कामगारविषयक धोरणात महत्त्वपूर्ण बदल केला असून, त्यामुळे नोकरीच्या उद्देशाने सौदीमध्ये जाऊ पाहणा-या भारतीयांच्या अडचणी वाढणार आहेत.

रियाध : सौदी अरेबियाने त्यांच्या निताकत या कामगारविषयक धोरणात महत्त्वपूर्ण बदल केला असून, त्यामुळे नोकरीच्या उद्देशाने सौदीमध्ये जाऊ पाहणा-या भारतीयांच्या अडचणी वाढणार आहेत. सौदी सरकारने नव्या बदलांद्वारे स्थानिकांना नोक-यांमध्ये प्राधान्य देण्याचे ठरविले आहे.सौदीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांत लाखो भारतीय नोकरी करत आहेत. तिथे २०१६ साली नोकºया करणाºया भारतीयांची संख्या २५ लाख होती. मात्र मागील काही महिन्यांत त्यात विविध कारणांमुळे घट झाली आहे. उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांमधून दरवर्षी मोठ्या संख्येने तरुण नोकरीसाठी सौदीला जात असतात. त्यातच सौदी अरेबियात १ जुलैपासून परदेशी व्यक्तीला दरमहा १०० रियाल म्हणजे सुमारे १७०० रुपये इतका कुटुंब कर लागू झाला आहे. त्यामुळे तिथे नोकरीच्या निमित्ताने राहणारे भारतीय आपल्या कुटुंबाला मायदेशी पाठवू लागले आहेत. दरम्यान, या करामुळे सौदीत राहण्याचा खर्च परवडणे अशक्य झाल्याने काही कुटुंबांनी हैदराबादला परतण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मोहम्मद ताहिरने दिली. ताहिर पेशाने संगणक तज्ज्ञ आहे. मागील चार महिन्यांत अनेकांनी आपली कुटुंबे भारतात पाठवल्याची माहिती स्थलांतरितांच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते भीम रेड्डी मंधा यांनी दिली. (वृत्तसंस्था)