शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 13:28 IST

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात लश्कर ए तोयबाचा हात असल्याचं समोर आले

कराची - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढला आहे. त्यात पाकिस्तानी नौदल प्रमुखानं भारताविरोधात चिथावणीखोर विधान केले आहे. आता आपल्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या लोकांना खूप अपेक्षा आहेत. आता देशासाठी काहीतरी करण्याची वेळ आलीय असं विधान पाकिस्तानी नौदल प्रमुखाने जवानांसमोर केले आहे. पाकिस्तानी नौदल प्रमुख नावेद अशरफ यांनी भारताविरोधात हे विधान केले आहे.

पाकिस्तानी नौदल प्रमुख म्हणाले की, आपल्याला युद्धासाठी तयार राहायचे आहे. देशासाठी स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या देशातील लोकांना आपल्याकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे तयार राहा असं त्यांनी जवानांना संबोधित करताना म्हटलं आहे. नौदल प्रमुखाचे हे विधान थेट युद्धाच्या तयारीचे संकेत मानले जात आहेत. पाकिस्तानी नौदल प्रमुखाचं हे विधान जम्मू काश्मीरातील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आले आहे.

पाकिस्तानी नौदल प्रमुख नावेद अशरफ यांच्याशिवाय अनेक पाक नेत्यांनी भारताविरोधात वक्तव्ये सुरूच ठेवली आहेत. या यादीत संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ, परराष्ट्र मंत्री इशाक डार, माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो, रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांचा समावेश आहे. भारताच्या कुठल्याही कारवाईला चोख प्रत्युत्तर देऊ. आमचे सैन्य युद्धाला तयार आहे असं संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे. तर बिलावल भुट्टोने सिंधु नदीत पाण्याऐवजी रक्ताचे पाट वाहतील असं विधान केले. पाकिस्तानी नेत्यांकडून भारताला अणुहल्ल्याची धमकीही दिली जात आहे. 

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात लश्कर ए तोयबाचा हात असल्याचं समोर आले. पाकिस्तानी ISI च्या मदतीने या दहशतवादी संघटनेने पर्यटकांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्याची चौकशी करताना NIA ला अनेक महत्त्वाचे पुरावे मिळालेत त्यात पाकिस्तानी कनेक्शन असल्याचं उघड झाले. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलून सिंधु जल कराराला स्थगिती दिली आहे. इतकेच नाही पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून त्यांना देश सोडण्याचे आदेश दिले. पाकिस्तानसोबत व्यापारावर बंदी आणली. पाक राजदूतांना देश सोडायला सांगितले आहे. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला