शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 13:28 IST

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात लश्कर ए तोयबाचा हात असल्याचं समोर आले

कराची - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढला आहे. त्यात पाकिस्तानी नौदल प्रमुखानं भारताविरोधात चिथावणीखोर विधान केले आहे. आता आपल्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या लोकांना खूप अपेक्षा आहेत. आता देशासाठी काहीतरी करण्याची वेळ आलीय असं विधान पाकिस्तानी नौदल प्रमुखाने जवानांसमोर केले आहे. पाकिस्तानी नौदल प्रमुख नावेद अशरफ यांनी भारताविरोधात हे विधान केले आहे.

पाकिस्तानी नौदल प्रमुख म्हणाले की, आपल्याला युद्धासाठी तयार राहायचे आहे. देशासाठी स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या देशातील लोकांना आपल्याकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे तयार राहा असं त्यांनी जवानांना संबोधित करताना म्हटलं आहे. नौदल प्रमुखाचे हे विधान थेट युद्धाच्या तयारीचे संकेत मानले जात आहेत. पाकिस्तानी नौदल प्रमुखाचं हे विधान जम्मू काश्मीरातील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आले आहे.

पाकिस्तानी नौदल प्रमुख नावेद अशरफ यांच्याशिवाय अनेक पाक नेत्यांनी भारताविरोधात वक्तव्ये सुरूच ठेवली आहेत. या यादीत संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ, परराष्ट्र मंत्री इशाक डार, माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो, रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांचा समावेश आहे. भारताच्या कुठल्याही कारवाईला चोख प्रत्युत्तर देऊ. आमचे सैन्य युद्धाला तयार आहे असं संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे. तर बिलावल भुट्टोने सिंधु नदीत पाण्याऐवजी रक्ताचे पाट वाहतील असं विधान केले. पाकिस्तानी नेत्यांकडून भारताला अणुहल्ल्याची धमकीही दिली जात आहे. 

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात लश्कर ए तोयबाचा हात असल्याचं समोर आले. पाकिस्तानी ISI च्या मदतीने या दहशतवादी संघटनेने पर्यटकांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्याची चौकशी करताना NIA ला अनेक महत्त्वाचे पुरावे मिळालेत त्यात पाकिस्तानी कनेक्शन असल्याचं उघड झाले. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलून सिंधु जल कराराला स्थगिती दिली आहे. इतकेच नाही पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून त्यांना देश सोडण्याचे आदेश दिले. पाकिस्तानसोबत व्यापारावर बंदी आणली. पाक राजदूतांना देश सोडायला सांगितले आहे. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला