शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मुंबई हल्ल्याप्रकरणी पाकला भारताचे समन्स

By admin | Updated: July 25, 2014 13:54 IST

मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या खटल्याच्या सुनावणीतील दिरंगाईचा भारताने शुक्रवारी जोरदार विरोध दर्शवला.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २५- मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या खटल्याच्या सुनावणीतील दिरंगाईचा भारताने शुक्रवारी जोरदार विरोध दर्शवला. भारताने पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांना समन्स पाठवून या घटनेचा कडाडून विरोध दर्शवला आहे. 
२६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानमधील न्यायालयात खटला सुरु असून लागोपाठ सातव्यांदा या खटल्याची सुनावणी होऊ शकली नाही. यापूर्वी २५ जून रोजी न्यायाधीश अनुपस्थित असल्याने खटल्याची सुनावणी टळली. तर २८ मे, ४ जून, १८  जून आणि २ जुलैरोजी होणारी सुनावणी दोन्ही पक्षाचे वकिल उपस्थित नसल्याने टळली होती. यावर भारत सरकारने शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारताने पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांना समन्स पाठवून या घटनेचा निषेध केला. तर पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तांनीही इस्लामाबादमधील पाकिस्तानच्या अधिका-यांना पत्र पाठवून या घटनेचा विरोध दर्शवला. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सर्व आरोपींना पाकने न्यायालयासमोर हजर करुन लवकरात लवकर खटल्याचा निकाल लावावा अशी मागणीही भारतीय अधिका-यांनी पाककडे केली आहे. 
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात १६६ निष्पापांचा मृत्यू झाला होता. तर सुरक्षा दलाचे शेकडो जवान या हल्ल्यात जखमी झाले होते. या हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानमधील रावळपिंडी न्यायालयात लष्कर ए तोयबाचा ऑपरेशन कमांडर झकीऊर रेहमान लखवी, अब्दूल वाजीद, मजहर इक्बाल, हमाद अमीन सादिक, शाहीद जमीन रियाज, जमील अहमद आणि अंजूम या सात जणांविरोधात खटला सुरु आहे. कट रचणे, आर्थिक सहाय्य करणे आणि कट पूर्णत्वास नेणे असा ठपका आरोपींवर ठेवण्यात आला आहे.