शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई हल्ल्याप्रकरणी पाकला भारताचे समन्स

By admin | Updated: July 25, 2014 13:54 IST

मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या खटल्याच्या सुनावणीतील दिरंगाईचा भारताने शुक्रवारी जोरदार विरोध दर्शवला.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २५- मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या खटल्याच्या सुनावणीतील दिरंगाईचा भारताने शुक्रवारी जोरदार विरोध दर्शवला. भारताने पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांना समन्स पाठवून या घटनेचा कडाडून विरोध दर्शवला आहे. 
२६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानमधील न्यायालयात खटला सुरु असून लागोपाठ सातव्यांदा या खटल्याची सुनावणी होऊ शकली नाही. यापूर्वी २५ जून रोजी न्यायाधीश अनुपस्थित असल्याने खटल्याची सुनावणी टळली. तर २८ मे, ४ जून, १८  जून आणि २ जुलैरोजी होणारी सुनावणी दोन्ही पक्षाचे वकिल उपस्थित नसल्याने टळली होती. यावर भारत सरकारने शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारताने पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांना समन्स पाठवून या घटनेचा निषेध केला. तर पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तांनीही इस्लामाबादमधील पाकिस्तानच्या अधिका-यांना पत्र पाठवून या घटनेचा विरोध दर्शवला. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सर्व आरोपींना पाकने न्यायालयासमोर हजर करुन लवकरात लवकर खटल्याचा निकाल लावावा अशी मागणीही भारतीय अधिका-यांनी पाककडे केली आहे. 
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात १६६ निष्पापांचा मृत्यू झाला होता. तर सुरक्षा दलाचे शेकडो जवान या हल्ल्यात जखमी झाले होते. या हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानमधील रावळपिंडी न्यायालयात लष्कर ए तोयबाचा ऑपरेशन कमांडर झकीऊर रेहमान लखवी, अब्दूल वाजीद, मजहर इक्बाल, हमाद अमीन सादिक, शाहीद जमीन रियाज, जमील अहमद आणि अंजूम या सात जणांविरोधात खटला सुरु आहे. कट रचणे, आर्थिक सहाय्य करणे आणि कट पूर्णत्वास नेणे असा ठपका आरोपींवर ठेवण्यात आला आहे.