शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
5
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
6
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
7
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
8
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
9
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
10
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
11
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
12
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
13
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
14
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
15
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
16
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
17
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
18
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
19
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
20
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या

मुंबई हल्ल्याप्रकरणी पाकला भारताचे समन्स

By admin | Updated: July 25, 2014 13:54 IST

मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या खटल्याच्या सुनावणीतील दिरंगाईचा भारताने शुक्रवारी जोरदार विरोध दर्शवला.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २५- मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या खटल्याच्या सुनावणीतील दिरंगाईचा भारताने शुक्रवारी जोरदार विरोध दर्शवला. भारताने पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांना समन्स पाठवून या घटनेचा कडाडून विरोध दर्शवला आहे. 
२६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानमधील न्यायालयात खटला सुरु असून लागोपाठ सातव्यांदा या खटल्याची सुनावणी होऊ शकली नाही. यापूर्वी २५ जून रोजी न्यायाधीश अनुपस्थित असल्याने खटल्याची सुनावणी टळली. तर २८ मे, ४ जून, १८  जून आणि २ जुलैरोजी होणारी सुनावणी दोन्ही पक्षाचे वकिल उपस्थित नसल्याने टळली होती. यावर भारत सरकारने शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारताने पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांना समन्स पाठवून या घटनेचा निषेध केला. तर पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तांनीही इस्लामाबादमधील पाकिस्तानच्या अधिका-यांना पत्र पाठवून या घटनेचा विरोध दर्शवला. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सर्व आरोपींना पाकने न्यायालयासमोर हजर करुन लवकरात लवकर खटल्याचा निकाल लावावा अशी मागणीही भारतीय अधिका-यांनी पाककडे केली आहे. 
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात १६६ निष्पापांचा मृत्यू झाला होता. तर सुरक्षा दलाचे शेकडो जवान या हल्ल्यात जखमी झाले होते. या हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानमधील रावळपिंडी न्यायालयात लष्कर ए तोयबाचा ऑपरेशन कमांडर झकीऊर रेहमान लखवी, अब्दूल वाजीद, मजहर इक्बाल, हमाद अमीन सादिक, शाहीद जमीन रियाज, जमील अहमद आणि अंजूम या सात जणांविरोधात खटला सुरु आहे. कट रचणे, आर्थिक सहाय्य करणे आणि कट पूर्णत्वास नेणे असा ठपका आरोपींवर ठेवण्यात आला आहे.