शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 12:47 IST

भारताने पाकिस्तानातून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे.

India-Pakistan: पहलगाममध्ये २६ निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने पाऊले उचचली आहेत. आता भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने पाकिस्तानमधून कोणत्याही प्रकारच्या वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर तात्काळ बंदी घातली आहे. सरकारने शनिवारी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. जर कोणाला या बंदीतून सूट हवी असेल तर सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असे सांगण्यात आलं आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला आणखी एक दणका दिला आहे. भारताने पाकिस्तानातून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानातून भारतात कोणत्याही वस्तूंची आयात होणार नाही. पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी भारताकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. २ मे रोजी वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदी अंतर्गत,  पाकिस्तानमधून येणाऱ्या कोणत्याही उत्पादनाच्या आयातीवर पूर्ण बंदी असेल. ती थेट आयात असो किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही तिसऱ्या देशातून असो पाकिस्तानल्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे.

भारत सरकारने लादलेले हे निर्बंध २०२३ च्या परराष्ट्र व्यापार धोरणात नवीन तरतुदी असल्याचे सांगण्यात आलं आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, जर कोणत्याही परिस्थितीत आयातीला परवानगी दिली गेली तर त्यासाठी भारत सरकारची विशेष मान्यता आवश्यक असेल. दुसरीकडे, भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला पाकिस्तानला दिलेल्या कर्जांचा आढावा घेण्यास सांगितले आहे. याशिवाय, पाकिस्तानला फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट करण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट होणे आणि आयएमएफने कर्ज मंजूर न करणे हे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा धक्का असेल.

भारताने पाकिस्तानी जहाजांना बंदरांवरून बंदी

दरम्यान, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. तसेच भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना पाकिस्तानातील बंदरांमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आलीय. भारतीय मालमत्ता, मालवाहतूक आणि बंदर पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यासाठी, व्यापारी शिपिंग कायदा, १९५८ च्या कलम ४११ अंतर्गत तात्काळ निर्बंध लादण्यात आले आहेत.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत