शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

तणावाची भारताने चिंता करू नये- चीन

By admin | Updated: May 13, 2014 04:43 IST

दक्षिण चीन समुद्रातील तणावाबाबत भारताने अधिक चिंता करण्याचे काहीही कारण नसल्याचे चीनने म्हटले आहे.चीनने भारताच्या चिंतेवर नाराजी व्यक्त केली आहे.

बीजिंग : दक्षिण चीन समुद्रातील तणावाबाबत भारताने अधिक चिंता करण्याचे काहीही कारण नसल्याचे चीनने म्हटले आहे. चीनने भारताच्या चिंतेवर नाराजी व्यक्त केली आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हे स्पष्टीकरण दिले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता हुआ चुनिइंग म्हणाले, ‘दक्षिण चीन समुद्रातील परिस्थितीबाबत मी यापूर्वीच माहिती दिलेली आहे. भारतीय लोकांनाही मी सांगू इच्छितो की, दक्षिण चीन समुद्रातील सध्याच्या परिस्थितीबाबत अधिक चिंता करू नये.’ चीन आणि व्हिएतनामच्या नौका दक्षिण चीन समुद्रात फसल्या आहेत. यामुळे या भागात तणावाची स्थिती उद्भवली असून, यावर भारताने गेल्या आठवड्यात चिंता व्यक्त केली होती. दरम्यान, चीनकडून वादग्रस्त बंदराच्या क्षेत्रात तेल उत्खननाचा प्रयत्न झाल्यामुळे तणावात वाढ झाली आहे. व्हिएतनाम आणि चीन यांच्याकडून या भागावर मालकी सांगितली जाते. भारताने या संपूर्ण घटनाक्रमावर चिंता व्यक्त केली होती. प्रादेशिक शांतता, स्थिरता, विकास आणि समृद्धी जगाच्या हिताचे आहे, असे नवी दिल्ली येथून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. चीन आणि सार्क देशांनी दक्षिण चीन समुद्रात शांतता आणि स्थिरता यासाठी एक आदर्श आचारसंहितेची घोषणा केली आहे. संबंधित देश चीनबाबत त्याच दिशानिर्देशांचे पालन करतील, अशी अपेक्षा हुआ यांनी व्यक्त केली. (वृत्तसंस्था) गेल्या आठवड्यात दक्षिण चीन समुद्राच्या मुद्यावरून अमेरिका आणि जपानच्या प्रतिकियांवर चीन नाराज आहे. चीनने व्हिएतनामद्वारे चिन्हित आणि चीनद्वारा वादग्रस्त घोषित क्षेत्रात भारताच्या ओएनजीसी कंपनीकडून तेल उत्खनन प्रक्रियेत सहभागी होण्यावर आक्षेप घेतला होता. (वृत्तसंस्था)