शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

तणावाची भारताने चिंता करू नये- चीन

By admin | Updated: May 13, 2014 04:43 IST

दक्षिण चीन समुद्रातील तणावाबाबत भारताने अधिक चिंता करण्याचे काहीही कारण नसल्याचे चीनने म्हटले आहे.चीनने भारताच्या चिंतेवर नाराजी व्यक्त केली आहे.

बीजिंग : दक्षिण चीन समुद्रातील तणावाबाबत भारताने अधिक चिंता करण्याचे काहीही कारण नसल्याचे चीनने म्हटले आहे. चीनने भारताच्या चिंतेवर नाराजी व्यक्त केली आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हे स्पष्टीकरण दिले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता हुआ चुनिइंग म्हणाले, ‘दक्षिण चीन समुद्रातील परिस्थितीबाबत मी यापूर्वीच माहिती दिलेली आहे. भारतीय लोकांनाही मी सांगू इच्छितो की, दक्षिण चीन समुद्रातील सध्याच्या परिस्थितीबाबत अधिक चिंता करू नये.’ चीन आणि व्हिएतनामच्या नौका दक्षिण चीन समुद्रात फसल्या आहेत. यामुळे या भागात तणावाची स्थिती उद्भवली असून, यावर भारताने गेल्या आठवड्यात चिंता व्यक्त केली होती. दरम्यान, चीनकडून वादग्रस्त बंदराच्या क्षेत्रात तेल उत्खननाचा प्रयत्न झाल्यामुळे तणावात वाढ झाली आहे. व्हिएतनाम आणि चीन यांच्याकडून या भागावर मालकी सांगितली जाते. भारताने या संपूर्ण घटनाक्रमावर चिंता व्यक्त केली होती. प्रादेशिक शांतता, स्थिरता, विकास आणि समृद्धी जगाच्या हिताचे आहे, असे नवी दिल्ली येथून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. चीन आणि सार्क देशांनी दक्षिण चीन समुद्रात शांतता आणि स्थिरता यासाठी एक आदर्श आचारसंहितेची घोषणा केली आहे. संबंधित देश चीनबाबत त्याच दिशानिर्देशांचे पालन करतील, अशी अपेक्षा हुआ यांनी व्यक्त केली. (वृत्तसंस्था) गेल्या आठवड्यात दक्षिण चीन समुद्राच्या मुद्यावरून अमेरिका आणि जपानच्या प्रतिकियांवर चीन नाराज आहे. चीनने व्हिएतनामद्वारे चिन्हित आणि चीनद्वारा वादग्रस्त घोषित क्षेत्रात भारताच्या ओएनजीसी कंपनीकडून तेल उत्खनन प्रक्रियेत सहभागी होण्यावर आक्षेप घेतला होता. (वृत्तसंस्था)