शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

भारताने विकासावर लक्ष केंद्रित करावे - चिनी मीडिया

By admin | Updated: April 24, 2017 19:07 IST

चीनच्या प्रभावास चाप लावण्याकरता हिंदी महासागरात विमानवाहू नौका बांधण्यापेक्षा भारताने आपल्या आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करावे.

ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 24 - चीनच्या प्रभावास चाप लावण्याकरता हिंदी महासागरात विमानवाहू नौका बांधण्यापेक्षा भारताने आपल्या आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करावे. असा सल्ला चिनी माध्यमांने भारताला दिला आहे. भारत सध्या औद्योगिकीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आहे. अशा वेळी भारताला अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. भारताला विमानवाहू नौका बांधताना अनेक अडथळे येऊ शकतात. असा सल्ला ग्लोबल टाईम्स या चीनमधील सरकारी वृत्तपत्राच्या माध्यमामधून देण्यात आला आहे. तसेच विमानवाहू नौकेच्या बांधणीसंदर्भातील नकारात्मक उदाहरण म्हणून भारताकडे पहावयास हरकत नाही, अशी उपाहासात्मक टीकाही चीनने भारतावर केली आहे.ग्लोबल टाईम्समध्ये असलेल्या लेखामध्ये भारताला खडे बोल सुनावले आहेत. या लेखाद्वारे एकप्रकारे भारताला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच काही सूचना करण्यात आल्या आहेत. भारत आणि चीन या दोन्ही देशांनी विमानवाहू नौका बांधण्यासंदर्भात दोन वेगवेगळे मार्ग स्वीकारले. मात्र दोन्ही देशांच्या प्रगतीमधील फरकामधून आर्थिक विकासाचे महत्व स्पष्ट होते. तेव्हा हिंदी महासागरामधील चीनचा वाढता प्रभाव रोखण्याकरिता विमानवाहू नौका बांधण्याच्या मोहिमेस गती देण्यापेक्षा भारताने आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करावयास हवे. असेही सांगण्यात आले आहे. जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनकडे आता व्यूहात्मक हिताच्या संरक्षणासाठी बलिष्ठ नौदल बांधण्याची क्षमता आहे. चीनकडून निर्मिती करण्यात आलेली पहिली विमानवाहू नौका हे चीनच्या आर्थिक विकासाचे फळ आहे. असेही सांगण्यात आले आहे.