शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भारत, पाकिस्तान आणि चीनकडून अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 08:45 IST

पाकिस्तानकडे भारतापेक्षा अधिक अण्वस्त्रं

नवी दिल्ली : भारत, चीन आणि पाकिस्तान या शेजारी देशांनी गेल्या वर्षभरात अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ केली आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सिपरी) ताज्या अहवालातून याबद्दलची आकडेवारी समोर आली आहे. आशियातील तीन प्रमुख देश असलेल्या भारत, चीन आणि पाकिस्ताननं गेल्या वर्षभरात अण्वस्त्र यंत्रणा अधिक सुसज्ज केली असून अण्वस्त्रांच्या संख्येतही वाढ केली आहे. सध्या हे तिन्ही देश अत्याधुनिक आणि लहान अण्वस्त्रांच्या विकासावर भर देत असल्याचं सिपरीच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अण्वस्त्रांच्या संख्येचा विचार केल्यास पाकिस्तान आत्ताही भारताच्या पुढे आहे. आशिया खंडात अण्वस्त्र स्पर्धा सुरू असताना पाश्चिमात्य देशांमध्ये मात्र स्थिरता आहे, असं निरीक्षण सिपरीनं नोंदवलं आहे. सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात तिन्ही देशांकडे असणाऱ्या अण्वस्त्रांबद्दलची आकडेवारी देण्यात आली आहे. 'गेल्या वर्षी चीनकडे असणाऱ्या अण्वस्त्रांची संख्या 270 इतकी आहे. आता ती वाढून 280 वर पोहोचली आहे. भारताकडे सध्याच्या घडीला 130 ते 140 अण्वस्त्र असून पाकिस्तानकडे असलेल्या अण्वस्त्रांची संख्या 140 ते 150 इतकी आहे. मात्र यातील कोणतंही अण्वस्त्र डागण्यासाठी क्षेपणास्त्रात लावण्यात आलेलं नाही,' असं सिपरीचा अहवाल सांगतो. चीननं गेल्या वर्षी संरक्षण दलांवर 228 अब्ज डॉलर खर्च केला आहे. संरक्षण सामर्थ्यावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांच्या यादीत चीन अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत आणि पाकिस्ताननं गेल्या वर्षभरात अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ केल्याचं सिपरीचा अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 'भारत आणि पाकिस्ताननं जमीन, हवा आणि समुद्रातून डागता येणारी अण्वस्त्र तयार करण्यास प्राधान्य दिलं आहे. गेल्या वर्षभरात या दोन्ही देशांनी त्यांच्या अण्वस्त्रांच्या ताफ्यात प्रत्येकी 10 अण्वस्त्रांनी वाढ केली आहे', अशी आकडेवारी अहवालात आहे.  

टॅग्स :nuclear warअणुयुद्धIndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीन