शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

पाकव्याप्त काश्मीरवर पुढील आठ-दहा दिवसांत भारत हल्ला करण्याची शक्यता; पाकिस्तानला धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 15:25 IST

काश्मीरच्या विभाजन आणि 370 रद्द करण्यावरून पाकिस्तान भारताला युद्धाची धमकी देत होता.

नवी दिल्ली : भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी नुकताच बालाकोटमध्ये पाकिस्ताननेदहशतवादी तळ पुन्हा सक्रीय केल्याचा आरोप केला होता. तसेच गेल्या आठवड्यातच त्यांनी पीओकेही कधीही ताब्यात घेऊ शकतो, असे वक्तव्य केले होते. यावरून पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. 

पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या तुकडीवर भ्याड हल्ला करत 40 जवानांना शहीद केले होते. यामुळे भारताने लगेचच पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमधील बालाकोटमध्ये हवाई हल्ला करून दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारा तळ उद्धवस्त केला होता. तसेच वर्षभरापूर्वी सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. 

काश्मीरच्या विभाजन आणि 370 रद्द करण्यावरून पाकिस्तान भारताला युद्धाची धमकी देत होता. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही अणुयुद्धाची धमकी दिली होती. मात्र, अमेरिकेमध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्या मुलाखतीवरून पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. तेथील नेते आणि विशेषज्ञ घाबरलेल्या अवस्थेत आहेत. पुढील काही दिवसांत दहशतवादाचे नाव घेऊन भारत पीओकेवर हल्ला करणार असल्याची भीती त्यांना सतावत आहे. 

मंगळवारी पाकिस्तानच्या जिओ टीव्हीवरील एका कार्यक्रमात तेथील सर्वोच्च न्यायालयाचे वकील अक्रम शेख यांनी भारत एका आठवड्यात किंवा १० दिवसांत पीओकेवर हल्ला करू शकतो असे म्हटले आहे. ह्युस्टनमध्ये हाऊडी मोदी कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील जुगलबंदी पाहता भारत अमेरिकेच्या मदतीने पीओकेवर हल्ला करू शकतो. आता भारत बचावाच्या पवित्र्याऐवजी आक्रमक निती अवलंबेल. तेच त्यांच्यासाठी चांगला बचाव असल्याचे शेख यांनी म्हटले. या चर्चेमध्ये मोहम्मद अली शेख, खुर्शीद महमूद कुरैशी देखिल सहभागी होते. 

तर कुरैशी यांनी सांगितले की, पाकिस्तान कोणत्याही प्रकारे भारताशी युद्धाला समर्थ आहे. पाककडे स्वत: विकसित केलेले रणगाडे आणि युद्धसामग्री आहे. तर भारताकडे 44 वर्ष जुनी विमाने आहेत. यामुळे पाकिस्तान भारतापेक्षा ताकदवान असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवानHowdy Modiहाऊडी मोदी