शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पाकव्याप्त काश्मीरवर पुढील आठ-दहा दिवसांत भारत हल्ला करण्याची शक्यता; पाकिस्तानला धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 15:25 IST

काश्मीरच्या विभाजन आणि 370 रद्द करण्यावरून पाकिस्तान भारताला युद्धाची धमकी देत होता.

नवी दिल्ली : भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी नुकताच बालाकोटमध्ये पाकिस्ताननेदहशतवादी तळ पुन्हा सक्रीय केल्याचा आरोप केला होता. तसेच गेल्या आठवड्यातच त्यांनी पीओकेही कधीही ताब्यात घेऊ शकतो, असे वक्तव्य केले होते. यावरून पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. 

पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या तुकडीवर भ्याड हल्ला करत 40 जवानांना शहीद केले होते. यामुळे भारताने लगेचच पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमधील बालाकोटमध्ये हवाई हल्ला करून दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारा तळ उद्धवस्त केला होता. तसेच वर्षभरापूर्वी सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. 

काश्मीरच्या विभाजन आणि 370 रद्द करण्यावरून पाकिस्तान भारताला युद्धाची धमकी देत होता. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही अणुयुद्धाची धमकी दिली होती. मात्र, अमेरिकेमध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्या मुलाखतीवरून पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. तेथील नेते आणि विशेषज्ञ घाबरलेल्या अवस्थेत आहेत. पुढील काही दिवसांत दहशतवादाचे नाव घेऊन भारत पीओकेवर हल्ला करणार असल्याची भीती त्यांना सतावत आहे. 

मंगळवारी पाकिस्तानच्या जिओ टीव्हीवरील एका कार्यक्रमात तेथील सर्वोच्च न्यायालयाचे वकील अक्रम शेख यांनी भारत एका आठवड्यात किंवा १० दिवसांत पीओकेवर हल्ला करू शकतो असे म्हटले आहे. ह्युस्टनमध्ये हाऊडी मोदी कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील जुगलबंदी पाहता भारत अमेरिकेच्या मदतीने पीओकेवर हल्ला करू शकतो. आता भारत बचावाच्या पवित्र्याऐवजी आक्रमक निती अवलंबेल. तेच त्यांच्यासाठी चांगला बचाव असल्याचे शेख यांनी म्हटले. या चर्चेमध्ये मोहम्मद अली शेख, खुर्शीद महमूद कुरैशी देखिल सहभागी होते. 

तर कुरैशी यांनी सांगितले की, पाकिस्तान कोणत्याही प्रकारे भारताशी युद्धाला समर्थ आहे. पाककडे स्वत: विकसित केलेले रणगाडे आणि युद्धसामग्री आहे. तर भारताकडे 44 वर्ष जुनी विमाने आहेत. यामुळे पाकिस्तान भारतापेक्षा ताकदवान असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवानHowdy Modiहाऊडी मोदी