शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

भारतासाठी महत्त्वाचं असलेलं चाबहार बंदर 2018पर्यंत सुरू होणार- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 08:33 IST

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी 2018पर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला चाबहार बंदर सुरू होण्याची आशा व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी 2018पर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला चाबहार बंदर सुरू होण्याची आशा व्यक्त केलीचाबहार हे बंदर इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात स्थित आहे. त्यामुळे आता पाकिस्तान मार्गे न जाताच पश्चिमी तटावरून इराणला सहजगत्या पोहोचता येणार आहे. चाबहार विकासासाठीच्या काही निविदांना अंतिम मंजुरीही देण्यात आली असून, हे बंदर चालू झाल्यास भारताचा मोठा फायदा होणार आहे.

तेहरान, दि. 6 - केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी 2018पर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला चाबहार बंदर सुरू होण्याची आशा व्यक्त केली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेली नितीन गडकरी हे भारताचं प्रतिनिधित्व करतायत. दुस-यांना राष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल हसन रुहानी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्यात. तसेच रुहानी यांनीही भारत-इराण द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचंही प्रतिपादन केलं आहे.तेहरानमध्ये गडकरी म्हणाले, भारत आणि इराण यांच्यात विशेष ऐतिहासिक नात्याची वीण घट्ट आहे. भारत सरकार चाबहार बंदराचा विकास करण्यासाठी सदैव तत्पर आहे. आम्हाला आशा आहे की, चाबहार बंद हे येत्या एक ते दीड वर्षांत वाहतुकीसाठी खुलं होईल. भारत सरकारही चाबहार बंदर विकासासाठी कसोशीनं प्रयत्न करत आहे. चाबहार हे बंदर इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात स्थित आहे. त्यामुळे आता पाकिस्तान मार्गे न जाताच पश्चिमी तटावरून इराणला सहजगत्या पोहोचता येणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींचा हा इराण दौरा भारताच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे भारतानं जलद गतीनं कामाला सुरुवात केली आहे. चाबहार बंदर विकासासाठी भारतानं काम सुरू केलं असून, बंदरावर काही उपकरणंही बसवण्यात येणार आहेत. तसेच चाबहार विकासासाठीच्या काही निविदांना अंतिम मंजुरीही देण्यात आली असून, हे बंदर चालू झाल्यास भारताचा मोठा फायदा होणार आहे. चाबहार बंदर विकासासाठी 600 कोटींच्या उपकरणं बसवण्यात येणार असून, त्यासाठी 380 कोटी रुपयांच्या निविदांना मंजुरी मिळाली आहे.  

गेल्या दोन वर्षांपूर्वीच नरेंद्र मोदींनी इराण दौऱ्यात चाबहार बंदराच्या संदर्भातला करार केला आणि गेली तेरा वर्षे रखडलेला एक महत्त्वाचा विषय मार्गी लावला होता. या कराराच्या वेळी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी हेसुद्धा मुद्दाम हजर राहिले होते. चाबहार बंदर विकसित करण्यासाठी भारत इराणमध्ये तब्बल पाचशे दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार असून, त्यात जपानसुद्धा सहाय्य करणार आहे. हे बंदर इराण, भारत, मध्य आशिया, अफगाणिस्तान तसेच, पूर्व युरोपला जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. चाबहारबरोबरच मोदी व रौहानी यांनी अनेक तेल, गॅस, रेल्वे, ऊर्जा आदी क्षेत्रांतील विविध करार केले होते. या करारांमुळे भारताला इराणमध्ये जम बसविण्याचा तसंच, पाकिस्तानला डावलून अफगाणिस्तान, रशिया व थेट पूर्व युरोपापर्यंत थेट पोहोचण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे भारताचा व्यापारी माल इराणमध्ये उतरवून त्यानंतर रेल्वे व रस्ते वाहतुकीद्वारे अफगाणिस्तान, मध्य आशिया आणि रशियात नेता येणार आहे. इराणकडे अत्यंत स्वस्त नैसर्गिक गॅस व वीज आहे. ही स्वस्त वीज व गॅस मिळविण्याचा व युरिया निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा भारताचा विचार आहे.पाकिस्तानचे ग्वादर बंदर विकसित करून तिथून थेट चीनपर्यंत एक कॉरिडॉर विकसित करण्याचे काम चीनने सुरू केले आहे. ते पुढच्या वर्षात पूर्ण झाले की चीनला पाकिस्तानच्या पश्चिमेकडच्या बंदरापर्यंत सहजपणे येता येईल आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंतच्या भागावर नियंत्रण आणता येईल. अरबी समुद्रावर आणि त्याद्वारे हिंदी महासागराच्या महत्त्वाच्या भूभागावर नियंत्रण आणून भारताला दबावाखाली आणण्यासाठी चीनला याचा उपयोग होणार आहे. चाबहार आणि ग्वादर यांच्यात जेमतेम दोनशे किलोमीटरचे अंतर आहे. यावरून विषयाचे महत्त्व किती आहे हे समजू शकते. चाबहार करार म्हणजे भारताने चीनच्या ग्वादरनीतीला दिलेले चोख उत्तर असल्याचे मानले जाते, पण पाकिस्तानमध्येसुद्धा या विषयाकडे तिथले जाणकार त्याच भूमिकेतून पाहत आहेत.