शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

नेहरुंनी केली तीच चूक मोदी सरकार करतंय - चीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 17:27 IST

नरेंद्र मोदी सरकारने चीनच्या इशा-याकडे दुर्लक्ष करु नये अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि युद्ध अटळ असेल.

ठळक मुद्देकुठल्याही परिस्थितीत चीन युद्धाचे पाऊल उचणार नाही असा भारताचा विश्वास असेल तर, भारताचे विश्लेषण हे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि लष्करी विज्ञानाला धरुन नाही.सिक्कीम सीमेजवळच्या डोकलाममध्ये संघर्ष निर्माण झाल्यापासून ग्लोबल टाइम्सच्या लेखातून अनेकदा भारताला युद्धाची धमकी देण्यात आली आहे.

बिजींग, दि. 8 - कुठल्याही परिस्थितीत चीन युद्धाचे पाऊल उचणार नाही असा भारताचा विश्वास असेल तर, भारताचे विश्लेषण हे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि लष्करी विज्ञानाला धरुन नाही. नरेंद्र मोदी सरकारने चीनच्या इशा-याकडे दुर्लक्ष करु नये अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि युद्ध अटळ असेल अशी धमकी पुन्हा एकदा ग्लोबल टाइम्सच्या लेखातून देण्यात आली आहे. ग्लोबल टाइम्स हे चिनी सरकारच्या मालकीचे वृत्तपत्र असून त्यात जे छापून येते त्याकडे चीन सरकारची अधिकृत भूमिका म्हणून पाहिले जाते. 

सिक्कीम सीमेजवळच्या डोकलाममध्ये संघर्ष निर्माण झाल्यापासून ग्लोबल टाइम्सच्या लेखातून अनेकदा भारताला युद्धाची धमकी देण्यात आली आहे. कालच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा हवाला देऊन ग्लोबल टाइम्सने धमकीची भाषा केली आहे. चीन युद्धाचा धोका पत्करणार नाही. छोटया मर्यादीत स्वरुपाचे युद्धाचे पाऊलही चीन उचलणार नाही असा भारतीय सुरक्षा यंत्रणांना विश्वास असल्याचे टाइम्सच्या वृत्तात म्हटले होते. आम्हाला सुद्धा युद्ध नकोय. सीमेवर शांतता हवी आहे. भारत आणि चीनची एकत्र वाटचाल हवी आहे. पण भारतीय सैनिक चीनच्या भूमिवरुन माघारी फिरले नाहीत तर, मात्र संघर्ष अटळ आहे असे लेखात म्हटले आहे. 

1962 साली सुद्धा भारतीय सैन्य भारत-चीन सीमेवर चिथावणी देत होते. त्यावेळचे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना सुद्धा चीन प्रत्युत्तर देणार नाही असे वाटले होते. चीन त्यावेळी अंतर्गत वाद आणि नैसर्गिक आपत्तीसा सामोरा गेला होता. चीनचा अमेरिकेबरोबर संघर्ष सुरु होता. पण या सर्व परिस्थितीतही चीनने आपल्या प्रादेशिक अखंडतेसाठी युद्धाचा पाऊल उचलले होते याची आठवण यानिमित्ताने करुन दिली आहे. काल चीनने पीपल्स डेली या वर्तमानपत्राच्या माध्यमातून भारताला इशारा दिला. 

प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्याचा आमचा जो संकल्प आहे त्याला भारताने कमी लेखू नये असे पीपल्स डेलीमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. सिक्कीममध्ये तैनात असलेल्या भारतीय सैन्याने भारत-चीन सीमारेषेचे उल्लंघन करुन चीनच्या हद्दीत घुसखोरी केली आहे. भारताची ही कृती पूर्णपणे बेकायदा आहे असा आरोप करण्यात आला आहे. चीनचे कायदेशीर अधिकार आणि हित लक्षात घेऊन सर्व आवश्यक उपायोजना करु असे पीपल्ड डेलीच्या वृत्तात म्हटले आहे.