शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

India China Face Off: भारत-चीनमधील संघर्षावर आमचे जवळून लक्ष- अमेरिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 02:52 IST

चिनी सैनिकांशी गलवान खोऱ्यात झालेल्या या हिंसक संघर्षात भारतीय लष्कराच्या कर्नलसह २० जवान मरण पावले. साडेचार दशकांनंतर उभय देशांत झालेली ही पहिलीच सगळ्यात मोठी लष्करी चकमक होती.

वॉशिंग्टन : भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमध्ये सोमवारी रात्री झालेल्या हिंसक संघर्षानंतरच्या परिस्थितीवर अमेरिका खूप जवळून लक्ष ठेवून आहे आणि उभय देश मतभेद शांततेने मिटवतील, अशी आशा आहे, असे परराष्ट्र विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्याने म्हटले.चिनी सैनिकांशी गलवान खोऱ्यात झालेल्या या हिंसक संघर्षात भारतीय लष्कराच्या कर्नलसह २० जवान मरण पावले. साडेचार दशकांनंतर उभय देशांत झालेली ही पहिलीच सगळ्यात मोठी लष्करी चकमक होती. भारत आणि चीन यांच्यात आधीच सीमावाद चिघळलेला असताना त्यात या संघर्षाने भर घातली. ‘‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन यांच्या सैन्यातील परिस्थितीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत,’’ असे परराष्ट्र मंत्रालयातील प्रवक्त्याने सोमवारी म्हटले. या संघर्षात आमचे २० सैनिक मरण पावल्याचे भारतीय लष्कराने जाहीर केले असून, आम्ही त्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत, असे हा प्रवक्ता म्हणाला. भारत आणि चीनने हा तणाव कमी करण्याची इच्छा व्यक्त केली असून, सध्याची परिस्थिती शांततेने दूर करण्यासाठी अमेरिकेचा पाठिंबा असल्याचे त्याने म्हटले.अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात २ जून रोजी भारत-चीन सीमेवरील परिस्थितीवर टेलिफोनवर चर्चा झाली होती, असे त्याने सांगितले.दक्षिण आशिया हा महत्त्वाचा - अ‍ॅलिसा आयरेजआघाडीच्या अमेरिकनतज्ज्ञांनी म्हटले की, चिनी लष्कराच्या योजनाबद्ध डावपेचांनी संपूर्ण विभागाला धोका निर्माण केलेला आहे. यातून अमेरिकेने एकच धडा घ्यायचा आहे तो म्हणजे भारत-चीन सीमा ही अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या रडार स्क्रीनवर हवी. कारण चीनची अरेरावी वाढत चालली आहे, असे कौन्सिल आॅन फॉरेन रिलेशन्सच्या अ‍ॅलिसा आयरेज यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, दक्षिण आशिया हा महत्त्वाचा असून, इंडो-पॅसिफिकचा तो मध्यभाग आहे.

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिका