शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

India China Face Off: भारत-चीनमधील संघर्षावर आमचे जवळून लक्ष- अमेरिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 02:52 IST

चिनी सैनिकांशी गलवान खोऱ्यात झालेल्या या हिंसक संघर्षात भारतीय लष्कराच्या कर्नलसह २० जवान मरण पावले. साडेचार दशकांनंतर उभय देशांत झालेली ही पहिलीच सगळ्यात मोठी लष्करी चकमक होती.

वॉशिंग्टन : भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमध्ये सोमवारी रात्री झालेल्या हिंसक संघर्षानंतरच्या परिस्थितीवर अमेरिका खूप जवळून लक्ष ठेवून आहे आणि उभय देश मतभेद शांततेने मिटवतील, अशी आशा आहे, असे परराष्ट्र विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्याने म्हटले.चिनी सैनिकांशी गलवान खोऱ्यात झालेल्या या हिंसक संघर्षात भारतीय लष्कराच्या कर्नलसह २० जवान मरण पावले. साडेचार दशकांनंतर उभय देशांत झालेली ही पहिलीच सगळ्यात मोठी लष्करी चकमक होती. भारत आणि चीन यांच्यात आधीच सीमावाद चिघळलेला असताना त्यात या संघर्षाने भर घातली. ‘‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन यांच्या सैन्यातील परिस्थितीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत,’’ असे परराष्ट्र मंत्रालयातील प्रवक्त्याने सोमवारी म्हटले. या संघर्षात आमचे २० सैनिक मरण पावल्याचे भारतीय लष्कराने जाहीर केले असून, आम्ही त्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत, असे हा प्रवक्ता म्हणाला. भारत आणि चीनने हा तणाव कमी करण्याची इच्छा व्यक्त केली असून, सध्याची परिस्थिती शांततेने दूर करण्यासाठी अमेरिकेचा पाठिंबा असल्याचे त्याने म्हटले.अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात २ जून रोजी भारत-चीन सीमेवरील परिस्थितीवर टेलिफोनवर चर्चा झाली होती, असे त्याने सांगितले.दक्षिण आशिया हा महत्त्वाचा - अ‍ॅलिसा आयरेजआघाडीच्या अमेरिकनतज्ज्ञांनी म्हटले की, चिनी लष्कराच्या योजनाबद्ध डावपेचांनी संपूर्ण विभागाला धोका निर्माण केलेला आहे. यातून अमेरिकेने एकच धडा घ्यायचा आहे तो म्हणजे भारत-चीन सीमा ही अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या रडार स्क्रीनवर हवी. कारण चीनची अरेरावी वाढत चालली आहे, असे कौन्सिल आॅन फॉरेन रिलेशन्सच्या अ‍ॅलिसा आयरेज यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, दक्षिण आशिया हा महत्त्वाचा असून, इंडो-पॅसिफिकचा तो मध्यभाग आहे.

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिका