शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
3
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
4
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
5
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
6
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
7
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
8
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
9
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
10
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
11
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
12
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
13
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
14
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
15
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
16
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
17
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
18
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
19
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
20
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)

भारतात पायाभूत सुविधा, वाहतूक क्षेत्रांत जागतिक गुंतवणूकदारांना मोठी संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 07:00 IST

भारत पायाभूत सुविधा, वाहतूक, कृषी, महामार्ग आणि अन्न प्रक्रिया उद्योगांत गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण$संधी उपलब्ध करून देत आहे, असे केंद्रीय रस्ते व महामार्ग, जलस्रोतमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले

नवी दिल्ली : भारत पायाभूत सुविधा, वाहतूक, कृषी, महामार्ग आणि अन्न प्रक्रिया उद्योगांत गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण$संधी उपलब्ध करून देत आहे, असे केंद्रीय रस्ते व महामार्ग, जलस्रोतमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले. ते शनिवारी येथे जागतिक फूड इंडिया, २०१७ कॉन्फरन्सने पायाभूत तंत्रज्ञान आणि उपकरणे यावर आयोजित केलेल्या परिषदेत बोलत होते.भारत दोन वर्षांत महामार्गांसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधाच देणार नाही, तर जलमार्ग आणि कृषी क्षेत्रातही मोठे बदल घडविणार आहे. ३२५ पाटबंधारे प्रकल्प, मोठा नदी जोड प्रकल्पाचा त्यात समावेश आहे. गडकरी म्हणाले, एकूण ३२ लॉजिस्टिक पार्कस्पैकी २४ नॅशनल कॉरिडॉर्स दोन लाख कोटी रुपये खर्चून बांधले जातील. चेन्नई, बंगळुरू, विजयवाडा, हैदराबाद, सूरत आणि गुवाहाटीत याचे काम सुरूही झाले आहे. या पार्कस्ची रचना शीतगृहे व गोदामांची गरज भागविणारी आहे. सरकारने घेतलेला दुसरा महत्त्वाचा पुढाकार म्हणजे सागरमाला प्रकल्प. बंदराद्वारे देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प आहे. यामुळे देशाचे सुमारे ४० हजार कोटी रुपये वाचणार आहेत, असे गडकरी यांनी सांगितले. सागरमालातून १४ किनारी आर्थिक विकास विभागांचा आणि दोन मोठ्या अन्नप्रक्रिया पार्कस्चा विकास होईल. देशात फळे व भाजीपाल्यांची १३,३०० कोटी रुपयांची हानी होते. ते टाळण्यासाठी लॉजिस्टिक पार्कस्चा विकास हा आवश्यक बनला आहे, यावर गडकरी यांनी भर दिला. ही हानी एकूण उत्पादनाच्या ३५ टक्के आहे व केवळ पायाभूत सुविधा नसल्यामुळे ते सोसावे लागते, असे गडकरी यांनी सांगितले. भारतात दहा टक्के फळे आणि भाजीपाल्यांवर प्रक्रिया होते व हे प्रमाण जागतिक पातळीवरील टक्केवारीचा विचार करता केवळ १टक्का आहे, असेही ते म्हणाले.२०१९ पर्यंत २० टक्के फळे व भाजीपाल्यावर प्रक्रिया करण्याचे लक्ष्य आहे. मुंबई-कोलकाता आणि मुंबई-कन्याकुमारीसह ४४ इकॉनॉमिक कॉरिडॉर्सची बांधणी झाल्यावर, बाजारात उत्पादने लगेचच पोहोचतील. त्यांच्या साठवणुकीचा खर्च वाचून शेतकºयांच्या उत्पन्नात भर पडेल, असे नितीन गडकरी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरी