शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील अशांतता वाढतेय

By admin | Updated: August 15, 2014 12:19 IST

जगभरातील शांतताप्रिय देशांमध्ये भारताची घसरण सुरु असून २०१० मध्ये १२५ व्या स्थानावर असलेला भारत २०१४ मध्ये १४३व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १५ - जगभरातील शांतताप्रिय देशांमध्ये भारताची घसरण सुरु असून २०१० मध्ये १२५ व्या स्थानावर असलेला भारत २०१४ मध्ये १४३व्या क्रमांकावर पोहोचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे श्रीलंका, नेपाळ या शेजारी राष्ट्रांपेक्षाही भारतातील अशांतता वाढत असल्याचे समोर आले आहे. 
इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेतर्फे दरवर्षी ग्लोबल पीस इंडेक्स हा अहवाल प्रकाशित करण्यात येतो.  यंदा अहवालात जगातील १६२ देशांचा समावेश करण्यात आला असून या देशांमध्ये जगातील ९० टक्क्याहून अधिक लोकं राहतात. देशांतर्गत वाद, आंतरराष्ट्रीय वाद, सैन्यबळाचा वापर, तुरुंगातील कैद्यांची संख्या, समाजातील सुरक्षा आणि संरक्षण, दहशतवादी कारवाया अशा विविध मुद्द्यांच्या आधारे हा अहवाल तयार केला जातो. या अहवालात १६२ देशांमध्ये भारताचा १४३ क्रमांक लागला आहे. तर भारताचा शेजारी पाकचा १५४, श्रीलंकेचा १०५ आणि नेपाळचा ७८ वा क्रमांक लागला आहे.  
२००८ पेक्षा यंदा जगातील ११ देशांमधील अशांततेचे प्रमाण कमी झाले आहे. तर ५१ देशांमधील प्रमाण दरवर्षी वाढत आहे. आइसलँड हा जगातील सर्वात शांत देश आहे. त्याखालोखाल डेन्मार्क, न्यूझीलंड या देशांचा नंबर लागतो. जॉर्जिया, लिबीया, आयव्हरी कोस्ट या देशांमध्ये शांतता निर्माण करण्याचे जोमाने प्रयत्न सुरु आहेत. तर सिरीया यंदा सर्वाधिक अशांत देश बनले आहे. सिरीयाचा या यादीत सर्वात तळाचा म्हणजे १६२ वा क्रमांक लागला आहे. तर अफगाणिस्तानचा १६१ वा क्रमांक आहे.