शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

भारतातील अशांतता वाढतेय

By admin | Updated: August 15, 2014 12:19 IST

जगभरातील शांतताप्रिय देशांमध्ये भारताची घसरण सुरु असून २०१० मध्ये १२५ व्या स्थानावर असलेला भारत २०१४ मध्ये १४३व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १५ - जगभरातील शांतताप्रिय देशांमध्ये भारताची घसरण सुरु असून २०१० मध्ये १२५ व्या स्थानावर असलेला भारत २०१४ मध्ये १४३व्या क्रमांकावर पोहोचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे श्रीलंका, नेपाळ या शेजारी राष्ट्रांपेक्षाही भारतातील अशांतता वाढत असल्याचे समोर आले आहे. 
इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेतर्फे दरवर्षी ग्लोबल पीस इंडेक्स हा अहवाल प्रकाशित करण्यात येतो.  यंदा अहवालात जगातील १६२ देशांचा समावेश करण्यात आला असून या देशांमध्ये जगातील ९० टक्क्याहून अधिक लोकं राहतात. देशांतर्गत वाद, आंतरराष्ट्रीय वाद, सैन्यबळाचा वापर, तुरुंगातील कैद्यांची संख्या, समाजातील सुरक्षा आणि संरक्षण, दहशतवादी कारवाया अशा विविध मुद्द्यांच्या आधारे हा अहवाल तयार केला जातो. या अहवालात १६२ देशांमध्ये भारताचा १४३ क्रमांक लागला आहे. तर भारताचा शेजारी पाकचा १५४, श्रीलंकेचा १०५ आणि नेपाळचा ७८ वा क्रमांक लागला आहे.  
२००८ पेक्षा यंदा जगातील ११ देशांमधील अशांततेचे प्रमाण कमी झाले आहे. तर ५१ देशांमधील प्रमाण दरवर्षी वाढत आहे. आइसलँड हा जगातील सर्वात शांत देश आहे. त्याखालोखाल डेन्मार्क, न्यूझीलंड या देशांचा नंबर लागतो. जॉर्जिया, लिबीया, आयव्हरी कोस्ट या देशांमध्ये शांतता निर्माण करण्याचे जोमाने प्रयत्न सुरु आहेत. तर सिरीया यंदा सर्वाधिक अशांत देश बनले आहे. सिरीयाचा या यादीत सर्वात तळाचा म्हणजे १६२ वा क्रमांक लागला आहे. तर अफगाणिस्तानचा १६१ वा क्रमांक आहे.