शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
3
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
4
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
5
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
6
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
7
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
8
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
9
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
10
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
11
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
12
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
13
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
14
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
15
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
16
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
17
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
18
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
19
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
20
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची

भारतातील अशांतता वाढतेय

By admin | Updated: August 15, 2014 12:19 IST

जगभरातील शांतताप्रिय देशांमध्ये भारताची घसरण सुरु असून २०१० मध्ये १२५ व्या स्थानावर असलेला भारत २०१४ मध्ये १४३व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १५ - जगभरातील शांतताप्रिय देशांमध्ये भारताची घसरण सुरु असून २०१० मध्ये १२५ व्या स्थानावर असलेला भारत २०१४ मध्ये १४३व्या क्रमांकावर पोहोचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे श्रीलंका, नेपाळ या शेजारी राष्ट्रांपेक्षाही भारतातील अशांतता वाढत असल्याचे समोर आले आहे. 
इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेतर्फे दरवर्षी ग्लोबल पीस इंडेक्स हा अहवाल प्रकाशित करण्यात येतो.  यंदा अहवालात जगातील १६२ देशांचा समावेश करण्यात आला असून या देशांमध्ये जगातील ९० टक्क्याहून अधिक लोकं राहतात. देशांतर्गत वाद, आंतरराष्ट्रीय वाद, सैन्यबळाचा वापर, तुरुंगातील कैद्यांची संख्या, समाजातील सुरक्षा आणि संरक्षण, दहशतवादी कारवाया अशा विविध मुद्द्यांच्या आधारे हा अहवाल तयार केला जातो. या अहवालात १६२ देशांमध्ये भारताचा १४३ क्रमांक लागला आहे. तर भारताचा शेजारी पाकचा १५४, श्रीलंकेचा १०५ आणि नेपाळचा ७८ वा क्रमांक लागला आहे.  
२००८ पेक्षा यंदा जगातील ११ देशांमधील अशांततेचे प्रमाण कमी झाले आहे. तर ५१ देशांमधील प्रमाण दरवर्षी वाढत आहे. आइसलँड हा जगातील सर्वात शांत देश आहे. त्याखालोखाल डेन्मार्क, न्यूझीलंड या देशांचा नंबर लागतो. जॉर्जिया, लिबीया, आयव्हरी कोस्ट या देशांमध्ये शांतता निर्माण करण्याचे जोमाने प्रयत्न सुरु आहेत. तर सिरीया यंदा सर्वाधिक अशांत देश बनले आहे. सिरीयाचा या यादीत सर्वात तळाचा म्हणजे १६२ वा क्रमांक लागला आहे. तर अफगाणिस्तानचा १६१ वा क्रमांक आहे.