शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

इम्रान खानला बहुमत नाहीच; जागा मात्र सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 01:32 IST

लष्कर व आयएसआयचा वाढेल हस्तक्षेप

इस्लामाबाद : नॅशनल असेंब्लीच्या २७२ पैकी ११५ जागा इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) जिंकल्या असून, त्यामुळे त्यांना काठावरील बहुमतही नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाला ६३ व असिफ अली झरदारी पाकिस्तान पीपल्स पार्टीला (पीपीपी) ४३ जागा मिळाल्या आहेत.आता इम्रान खान यांना पीपीपीच्या पाठिंबा मिळणार का, यावर तेथील सत्तेची गणिते अवलंबून आहेत. अशा अस्थिर स्थितीत पाक लष्कर व आयएसआय यांचा इम्रान खान यांच्यावर दबाव वाढणार असून, तसे होणे भारतास त्रासदायक आहे. निवडणुकीत गैरप्रकाराद्वारे इम्रान खानच्या पक्षाने इतक्या जागा मिळवल्याचा आरोप शरीफ यांच्या पीएमएल-एनसह अन्य पक्षांनीही केला. नॅशनल असेंब्लीबरोबरच चार राज्यांच्या असेंब्लींच्या निवडणुकाही झाल्या होत्या. पंजाब प्रांतात नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एनला सर्वात जास्त १२७ तर पीटीआयला १२३ जागा मिळाल्या आहेत. मात्र २९७ सदस्य असलेल्या असेंब्लीत बहुमतासाठी १४९ जागा जिंकणे आवश्यक आहे.शरीफ यांचा बालेकिल्ला असलेला पंजाब त्यांच्याकडून हिसकावून घेण्यासाठी तिथे निवडून आलेल्या अपक्षांच्या सहकार्याने सरकार स्थापन करण्याच्या हालचाली पीटीआयने सुरू केल्या आहेत. एके काळी बेनझीर भुत्तो यांचा बालेकिल्ला असलेल्या सिंध प्रांतात त्यांच्याच पीपीपीला बहुमत मिळाले आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतात पीटीआयला बहुमत मिळाले आहे तर बलुचिस्तान असेंब्लीच्या ५१ जागांपैकी १३ जागा बलुचिस्तान अवामी पार्टीने जिंकल्या आहेत. पाकिस्तानमधील नव्या सरकारबरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगून अमेरिकेने म्हटले आहे की, दक्षिण आशियातील राजकीय स्थैर्य, शांतता वाढीस लागावी म्हणून हे सरकार प्रयत्नशील असेल अशी आशा आहे.मोदी परतल्यावर ठरणार भारताची पाकविषयीची भूमिका; सत्तांतरावर तूर्त प्रतिक्रिया नाही-संतोष ठाकूरनवी दिल्ली : पाकिस्तानातील नवे सरकारबाबत भारताची अधिकृत प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशातून आल्यानंतरच दिली जाईल. इम्रान खान यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत म्हटले की, तिथे मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे द्विपक्षीय संबंध नवे सरकार आल्यानंतरही सुधारणार नाहीत, असाच अंदाज आहे. या मुद्द्यावर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आम्ही तूर्तास परिस्थितीचे आकलन करत आहोत.आगामी काळात देशांमधील संबंध कसे राहतील यावर भारताचे माजी उच्चायुक्त जी. पार्थसारथी म्हणाले की, काश्मीरचा मुद्दा कोणताही पाकिस्तानी नेता सोडून देऊ शकत नाही. इम्रान खान यांच्या पक्षाची स्थापनाच मुळी आयएसआय प्रमुख राहिलेले जनरल हामिद गुल यांच्या सहकार्याने झाली होती. इम्रान खान यांना तालिबान खान म्हटले जाते. तालिबानबाबत इम्रान खान यांची भूमिका सौम्यच आहे. त्यांचे सरकार सैन्याच्या मदतीने बनणार आहे. पाकमधील भारताचे माजी उच्चायुक्तराहिलेले राजीव डोगरा म्हणाले की, आताच काही बोलणे घाईचे ठरेल.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistan Electionsपाकिस्तान निवडणूकPakistanपाकिस्तान