शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

इम्रान खानला बहुमत नाहीच; जागा मात्र सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 01:32 IST

लष्कर व आयएसआयचा वाढेल हस्तक्षेप

इस्लामाबाद : नॅशनल असेंब्लीच्या २७२ पैकी ११५ जागा इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) जिंकल्या असून, त्यामुळे त्यांना काठावरील बहुमतही नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाला ६३ व असिफ अली झरदारी पाकिस्तान पीपल्स पार्टीला (पीपीपी) ४३ जागा मिळाल्या आहेत.आता इम्रान खान यांना पीपीपीच्या पाठिंबा मिळणार का, यावर तेथील सत्तेची गणिते अवलंबून आहेत. अशा अस्थिर स्थितीत पाक लष्कर व आयएसआय यांचा इम्रान खान यांच्यावर दबाव वाढणार असून, तसे होणे भारतास त्रासदायक आहे. निवडणुकीत गैरप्रकाराद्वारे इम्रान खानच्या पक्षाने इतक्या जागा मिळवल्याचा आरोप शरीफ यांच्या पीएमएल-एनसह अन्य पक्षांनीही केला. नॅशनल असेंब्लीबरोबरच चार राज्यांच्या असेंब्लींच्या निवडणुकाही झाल्या होत्या. पंजाब प्रांतात नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एनला सर्वात जास्त १२७ तर पीटीआयला १२३ जागा मिळाल्या आहेत. मात्र २९७ सदस्य असलेल्या असेंब्लीत बहुमतासाठी १४९ जागा जिंकणे आवश्यक आहे.शरीफ यांचा बालेकिल्ला असलेला पंजाब त्यांच्याकडून हिसकावून घेण्यासाठी तिथे निवडून आलेल्या अपक्षांच्या सहकार्याने सरकार स्थापन करण्याच्या हालचाली पीटीआयने सुरू केल्या आहेत. एके काळी बेनझीर भुत्तो यांचा बालेकिल्ला असलेल्या सिंध प्रांतात त्यांच्याच पीपीपीला बहुमत मिळाले आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतात पीटीआयला बहुमत मिळाले आहे तर बलुचिस्तान असेंब्लीच्या ५१ जागांपैकी १३ जागा बलुचिस्तान अवामी पार्टीने जिंकल्या आहेत. पाकिस्तानमधील नव्या सरकारबरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगून अमेरिकेने म्हटले आहे की, दक्षिण आशियातील राजकीय स्थैर्य, शांतता वाढीस लागावी म्हणून हे सरकार प्रयत्नशील असेल अशी आशा आहे.मोदी परतल्यावर ठरणार भारताची पाकविषयीची भूमिका; सत्तांतरावर तूर्त प्रतिक्रिया नाही-संतोष ठाकूरनवी दिल्ली : पाकिस्तानातील नवे सरकारबाबत भारताची अधिकृत प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशातून आल्यानंतरच दिली जाईल. इम्रान खान यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत म्हटले की, तिथे मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे द्विपक्षीय संबंध नवे सरकार आल्यानंतरही सुधारणार नाहीत, असाच अंदाज आहे. या मुद्द्यावर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आम्ही तूर्तास परिस्थितीचे आकलन करत आहोत.आगामी काळात देशांमधील संबंध कसे राहतील यावर भारताचे माजी उच्चायुक्त जी. पार्थसारथी म्हणाले की, काश्मीरचा मुद्दा कोणताही पाकिस्तानी नेता सोडून देऊ शकत नाही. इम्रान खान यांच्या पक्षाची स्थापनाच मुळी आयएसआय प्रमुख राहिलेले जनरल हामिद गुल यांच्या सहकार्याने झाली होती. इम्रान खान यांना तालिबान खान म्हटले जाते. तालिबानबाबत इम्रान खान यांची भूमिका सौम्यच आहे. त्यांचे सरकार सैन्याच्या मदतीने बनणार आहे. पाकमधील भारताचे माजी उच्चायुक्तराहिलेले राजीव डोगरा म्हणाले की, आताच काही बोलणे घाईचे ठरेल.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistan Electionsपाकिस्तान निवडणूकPakistanपाकिस्तान