शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Pulwama Attack: ...तर पाकिस्तानवर भारत २० अणुबॉम्ब टाकेल; परवेझ मुशर्रफ यांचे शहाणपणाचे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 16:44 IST

भारत आणि पाकिस्तानमधील वितुष्ट अगदी टोकाला गेलं आहे. परंतु....

ठळक मुद्देपाकिस्तानने भारतावर एक अणुबॉम्ब टाकला, तर भारत २० अणुबॉम्ब टाकून आम्हाला नेस्तनाबूत करून टाकेल.भारत आणि पाकिस्तानमधील वितुष्ट अगदी टोकाला गेलं आहे. परंतु, ते अणुहल्ला करणार नाहीत.

अबुधाबीः वादग्रस्त आणि प्रक्षोभक विधानांसाठी ओळखले जाणारे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी भारतावरील हल्ल्याबाबत अत्यंत विचारपूर्वक मत मांडत पाकमधील सत्ताधाऱ्यांना उपदेशाचा डोस पाजला आहे. 

पाकिस्तानने भारतावर एक अणुबॉम्ब टाकला, तर भारत २० अणुबॉम्ब टाकून आम्हाला नेस्तनाबूत करून टाकेल. त्यामुळे भारत-पाकिस्तान युद्ध होणं अशक्य असल्याचं परवेझ मुशर्रफ यांनी स्पष्ट केलं. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर, युद्धाचे ढग दाटले असताना, त्यांचं हे विधान महत्त्वपूर्ण मानलं जातंय. अबुधाबी इथल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

भारत आणि पाकिस्तानमधील वितुष्ट अगदी टोकाला गेलं आहे. परंतु, त्यांच्यात अणुहल्ला होणार नाही. आम्ही जर भारतावर एक अणुबॉम्ब टाकला, तर २० अणुबॉम्ब टाकून ते प्रत्युत्तर देतील, आम्हाला संपवतील. ते जर नको असेल, तर भारतावर ५० अणुबॉम्ब टाकावे लागतील. त्यासाठी तुम्ही तयार आहात का?, असा प्रश्न करत त्यांनी अणुहल्ल्याची शक्यता फेटाळून लावली.  

ऑल पाकिस्तान मुस्लीम लीगचे नेते असलेले मुशर्रफ सध्या विजनवासात आहेत. पाकिस्तानातील राजकीय वातावरण आपल्यासाठी फायदेशीर असल्याचं दिसू लागल्यानं, ते पाकला परतण्याचा विचार करत आहेत. पाकिस्तानमधील अर्धे मंत्री माझे आहेत, कायदा मंत्री आणि अॅटॉर्नी जनरल हे माझे वकील होते. हे वातावरण आपल्यासाठी चांगलं असल्याचं त्यांनी सूचित केलं.

१४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना वीरमरण आलं होतं. जैश-ए-मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेला पाकिस्तान पोसत असल्यानं भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्र सरकारनं लष्कराला पूर्ण मोकळीक दिली आहे.

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPervez Musharrafपरवेझ मुशर्रफPakistanपाकिस्तान