शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

Pulwama Attack: ...तर पाकिस्तानवर भारत २० अणुबॉम्ब टाकेल; परवेझ मुशर्रफ यांचे शहाणपणाचे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 16:44 IST

भारत आणि पाकिस्तानमधील वितुष्ट अगदी टोकाला गेलं आहे. परंतु....

ठळक मुद्देपाकिस्तानने भारतावर एक अणुबॉम्ब टाकला, तर भारत २० अणुबॉम्ब टाकून आम्हाला नेस्तनाबूत करून टाकेल.भारत आणि पाकिस्तानमधील वितुष्ट अगदी टोकाला गेलं आहे. परंतु, ते अणुहल्ला करणार नाहीत.

अबुधाबीः वादग्रस्त आणि प्रक्षोभक विधानांसाठी ओळखले जाणारे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी भारतावरील हल्ल्याबाबत अत्यंत विचारपूर्वक मत मांडत पाकमधील सत्ताधाऱ्यांना उपदेशाचा डोस पाजला आहे. 

पाकिस्तानने भारतावर एक अणुबॉम्ब टाकला, तर भारत २० अणुबॉम्ब टाकून आम्हाला नेस्तनाबूत करून टाकेल. त्यामुळे भारत-पाकिस्तान युद्ध होणं अशक्य असल्याचं परवेझ मुशर्रफ यांनी स्पष्ट केलं. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर, युद्धाचे ढग दाटले असताना, त्यांचं हे विधान महत्त्वपूर्ण मानलं जातंय. अबुधाबी इथल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

भारत आणि पाकिस्तानमधील वितुष्ट अगदी टोकाला गेलं आहे. परंतु, त्यांच्यात अणुहल्ला होणार नाही. आम्ही जर भारतावर एक अणुबॉम्ब टाकला, तर २० अणुबॉम्ब टाकून ते प्रत्युत्तर देतील, आम्हाला संपवतील. ते जर नको असेल, तर भारतावर ५० अणुबॉम्ब टाकावे लागतील. त्यासाठी तुम्ही तयार आहात का?, असा प्रश्न करत त्यांनी अणुहल्ल्याची शक्यता फेटाळून लावली.  

ऑल पाकिस्तान मुस्लीम लीगचे नेते असलेले मुशर्रफ सध्या विजनवासात आहेत. पाकिस्तानातील राजकीय वातावरण आपल्यासाठी फायदेशीर असल्याचं दिसू लागल्यानं, ते पाकला परतण्याचा विचार करत आहेत. पाकिस्तानमधील अर्धे मंत्री माझे आहेत, कायदा मंत्री आणि अॅटॉर्नी जनरल हे माझे वकील होते. हे वातावरण आपल्यासाठी चांगलं असल्याचं त्यांनी सूचित केलं.

१४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना वीरमरण आलं होतं. जैश-ए-मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेला पाकिस्तान पोसत असल्यानं भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्र सरकारनं लष्कराला पूर्ण मोकळीक दिली आहे.

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPervez Musharrafपरवेझ मुशर्रफPakistanपाकिस्तान