शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

तर सर्जिकल स्ट्राईकला चोख प्रत्युत्तर दिले असते - अब्दुल बासित

By admin | Updated: October 13, 2016 10:06 IST

29 सप्टेंबरला भारताकडून कोणतेही सर्जिकल स्ट्राईक झाले नाही. जर भारताकडून तशी कोणतीही कृती झाली असती, तर पाकिस्तानने त्याला चोख प्रत्युत्तर दिले असते' असे पाक उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि १३ - 'उरी' दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याचे पाकिस्तानकडून वारंवार नाकारण्यात येत आहे. आता पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनाही सर्जिकल स्ट्राईक झालेच नाही, अशी री ओढली आहे. ' 29 सप्टेंबरला भारताकडून कोणतेही सर्जिकल स्ट्राईक झालेला नाही. जर भारताकडून तशी कोणतीही कृती झाली असती, तर पाकिस्तानने त्याला चोख प्रत्युत्तर दिले असते' असे पाक उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी म्हटले आहे.  तसेच , भारताकडे सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा म्हणून व्हिडिओ असल्याची बातमी देखील बनावट आहे, असेही ते म्हणाले.  एका पाकिस्तानी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले.
 
'29 सप्टेंबरला नियंत्रण रेषेजवळ भारताकडून फक्त गोळीबार करण्यात आला होता, ज्यात पाकिस्तानचे दोन सैनिक मारले गेले. मात्र त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या गोळीबाराला तात्काळ चोख उत्तर दिले. भारतीय सैनिकांनी नियंत्रण रेषा पार केली नाही. ' जर भारताकडून सर्जिकल स्ट्राईक झाला असता तर आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर दिले गेले असते,' अशा शब्दांत त्यांनी पुन्हा सर्व वृत्त फेटाळून लावली.  दरम्यान, सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा भारतीय लष्कराने केंद्र सरकारकडे सोपवला आहे. मात्र, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या कारवाईचा व्हिडीओ , फोटो अशी कुठलीही माहिती जाहीर न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.