शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

तर सर्जिकल स्ट्राईकला चोख प्रत्युत्तर दिले असते - अब्दुल बासित

By admin | Updated: October 13, 2016 10:06 IST

29 सप्टेंबरला भारताकडून कोणतेही सर्जिकल स्ट्राईक झाले नाही. जर भारताकडून तशी कोणतीही कृती झाली असती, तर पाकिस्तानने त्याला चोख प्रत्युत्तर दिले असते' असे पाक उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि १३ - 'उरी' दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याचे पाकिस्तानकडून वारंवार नाकारण्यात येत आहे. आता पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनाही सर्जिकल स्ट्राईक झालेच नाही, अशी री ओढली आहे. ' 29 सप्टेंबरला भारताकडून कोणतेही सर्जिकल स्ट्राईक झालेला नाही. जर भारताकडून तशी कोणतीही कृती झाली असती, तर पाकिस्तानने त्याला चोख प्रत्युत्तर दिले असते' असे पाक उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी म्हटले आहे.  तसेच , भारताकडे सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा म्हणून व्हिडिओ असल्याची बातमी देखील बनावट आहे, असेही ते म्हणाले.  एका पाकिस्तानी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले.
 
'29 सप्टेंबरला नियंत्रण रेषेजवळ भारताकडून फक्त गोळीबार करण्यात आला होता, ज्यात पाकिस्तानचे दोन सैनिक मारले गेले. मात्र त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या गोळीबाराला तात्काळ चोख उत्तर दिले. भारतीय सैनिकांनी नियंत्रण रेषा पार केली नाही. ' जर भारताकडून सर्जिकल स्ट्राईक झाला असता तर आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर दिले गेले असते,' अशा शब्दांत त्यांनी पुन्हा सर्व वृत्त फेटाळून लावली.  दरम्यान, सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा भारतीय लष्कराने केंद्र सरकारकडे सोपवला आहे. मात्र, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या कारवाईचा व्हिडीओ , फोटो अशी कुठलीही माहिती जाहीर न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.