शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
2
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
4
छांगूर बाबाची हुशारी, मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन नाही
5
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
6
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
7
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
8
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
9
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
10
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
11
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
12
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
13
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
14
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
15
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
16
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
17
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
18
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
19
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
20
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?

'मला संसद बरखास्त करण्यासाठी भाग पाडले, हा राजकीय निर्णय', ओलींचे स्पष्टीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 15:05 IST

Nepal Political Crisis: नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या वाढत्या संघर्षा दरम्यान 20 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान के.पी. ओली यांनी राष्ट्रपतींना त्याच दिवशी संसद बरखास्त करण्याची शिफारस केली होती.

ठळक मुद्देसंसद बरखास्त केल्यानंतर पंतप्रधान ओली यांनी मध्यावधी निवडणुकांसाठी 30 एप्रिल आणि 10 मे या तारखांची घोषणा केली होती.

काठमांडू : नेपाळचे काळजीवाहू पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी संसद बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडल्याचे म्हटले आहे. न्यायालयात या निर्णयाच्या आव्हानाशी संबंधित प्रश्नावर ओली म्हणाले, "संसद बरखास्त करणे एक राजकीय पाऊल होते आणि यामध्ये न्यायालयीन आढाव्यासाठी अधिकृत परवानगी नाही. पक्षातील काही नेत्यांनी मला हा निर्णय घेण्यास भाग पाडले."

द काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, पीएम ओली यांनी 25 डिसेंबरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर म्हणून अॅटर्नी जनरल कार्यालयामार्फत उत्तर दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या 11 पानांच्या उत्तरात पंतप्रधान ओली म्हणाले, "संसद बरखास्त करण्याची शिफारस करणे आणि संसद बरखास्त करणे, दोन्हीही पूर्णपणे राजकीय निर्णय आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्वतःला हे सिद्धांत मांडले आहे की अशा विषयांवर घटनात्मक आणि कायदेशीर वैधतेचे प्रश्न न्यायालयीन आढाव्याचे विषय नसावेत. पक्षात वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मला असे वाटले नाही की सरकार निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करू शकेल."

नवीन जनादेशसाठी आपल्याला संसद बरखास्त करण्यास भाग पाडले, कारण सरकार पक्षातील संघर्षात अडकले होते. आपला स्वार्थ केवळ समृद्ध नेपाळ आणि सुखी नेपाळी लोकांकरिता आहे, असेही ओली यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे. संसद बरखास्त केल्यानंतर पंतप्रधान ओली यांनी मध्यावधी निवडणुकांसाठी 30 एप्रिल आणि 10 मे या तारखांची घोषणा केली होती. सरकार आणि संसदेवर पक्षाच्या अंतहीन समस्यांचा परिणाम होत असल्याने त्यांचे हे कार्य 'गरजेच्या सिद्धांतवर' आधारित असल्याचा दावा ओली यांनी केला आहे.

नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या वाढत्या संघर्षा दरम्यान 20 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान के.पी. ओली यांनी राष्ट्रपतींना त्याच दिवशी संसद बरखास्त करण्याची शिफारस केली होती. तेव्हापासून ओली दावा करीत आहेत की पुष्प कमल दहल प्रचंड, पक्षातील माधवकुमार नेपाळ आणि इतरांनी विरोधकांनी निर्माण केलेल्या अडचणींमुळे आपल्याला हे कठोर पाऊल उचलले गेले होते. मात्र, भारतविरोधी भूमिकेमुळे ओलीची लोकप्रियता सातत्याने कमी होत होती. भारताबद्दल कठोर विचारसरणी व विधानानंतरच कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्त्वाने त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे केले. ओली यांच्यावर चीन समर्थक असल्याचा आणि भारतविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप आहे. 

टॅग्स :Nepalनेपाळ