शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जगभरात माणसं पिंजऱ्यात, प्राणी रस्त्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 16:04 IST

माणसं घरांच्या पिंजऱ्यात आणि प्राणी कधी नव्हे ते रस्त्यावर निवांत फिरत आहेत. अगदी पक्षी रस्त्यावर उतरले आहेत. गायी, श्वान, रस्त्यावर निवांत झोपल्या आहेत.

ठळक मुद्देअनेकांना आता स्वत:चं अन्न शोधता येत नाही.

आपल्या देशात एरव्ही माणसांच्या जिवाची किंमत काय आहे? हजारोंनी जत्थ्थे निघालेत गावांकडे, त्यांचे हाल कोण विचारतं? गेल्या वर्षभरांत शेतकरी आत्महत्यांची संख्या काढा, तो आकडा अंगावर येईल. रस्ते अपघात?- त्यात दगावणारी माणसं, जखमी होणारी माणसं यांची संख्याही मोठी आहे.त्यामुळे कोरोनाच्या याकाळात त्या आकडेवारीकडेही लक्ष  द्यायला हवी. सगळा देश लॉकडाऊनमध्ये असताना आणि यंत्रणोवर आधीच कामाचा इतका ताण असताना पुरेशी आकडेवारी सध्या मिळणं शक्य नाही. मात्र तरीही एक अंदाज घेतला तर काय चित्रं दिसतं?ते चित्र असं म्हणतं की, दिवसाला भारतात सरासरी 41क् लोक रस्ते अपघातात दगावतात. जे जखमी होतात, त्यांची संख्या वेगळी. अगदी ढोबळ अंदाज लावायचा म्हटला तरी लॉकडाऊनमुळे रस्ते वाहतूक बंद असल्याने किमान 35क् लोकांचे जरी प्राण वाचतात असं ग्ृहित धरलं तरी 21 दिवसांत किती लोकांचे प्राण वाचले याचा अंदाज काढा.व्हॉट्सअॅपवर फिरणा:या विनोदासारखं नाही, ही वस्तुस्थिती आहे कारण जगभरात सर्वाधिक माणसं भारतातच रस्ते अपघातात दगावतात.दुसरा एक या काळाचा फायदा दाखवणारे काही फोटो सध्या व्हायरल आहेत. केरळमध्ये तर एक सांबर रस्ता  क्रॉस करत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. माणसं घरांच्या पिंज:यात आणि प्राणी कधी नव्हे ते रस्त्यावर निवांत फिरत आहेत. अगदी पक्षी रस्त्यावर उतरले आहेत. गायी, श्वान, रस्त्यावर निवांत झोपल्या आहेत.हे चित्र खरोखरच वेगळं आहे. 

या शहरांवर, इथल्या जगण्यावर प्राण्यांचाही तेवढाच हक्क आहे, हे तरी निदान यानिमित्तानं समोर आलं.अर्थात यासा:यात काही भली माणसंही आहेतच. रस्त्यावर राहणारे श्वान, फिरणा:या गायी यांना खायला कोण घालणार असं म्हणत अनेकांनी फेसबूक कॅम्पेन सुरु केल्या आहेत. ब:याच प्राणीमित्रंचं म्हणणं की मुख्यत: श्वानांना आयतं खायला घालून माणसांनीच त्यांच्या सवयी बिघडवल्या, अनेकांना आता स्वत:चं अन्न शोधता येत नाही.तर जरा आपल्या परिसरात, श्वानांना अन्न मिळेल असंही पहा!जरा शांत, स्थिर जगणं यानिमित्तानं माणसांच्या वाटय़ाला आलं आहे, ते टिकेल की पुन्हा रिव्हर्स गिअर टाकेल याचं उत्तर येणारा काळ देईलच!