आपल्या देशात एरव्ही माणसांच्या जिवाची किंमत काय आहे? हजारोंनी जत्थ्थे निघालेत गावांकडे, त्यांचे हाल कोण विचारतं? गेल्या वर्षभरांत शेतकरी आत्महत्यांची संख्या काढा, तो आकडा अंगावर येईल. रस्ते अपघात?- त्यात दगावणारी माणसं, जखमी होणारी माणसं यांची संख्याही मोठी आहे.त्यामुळे कोरोनाच्या याकाळात त्या आकडेवारीकडेही लक्ष द्यायला हवी. सगळा देश लॉकडाऊनमध्ये असताना आणि यंत्रणोवर आधीच कामाचा इतका ताण असताना पुरेशी आकडेवारी सध्या मिळणं शक्य नाही. मात्र तरीही एक अंदाज घेतला तर काय चित्रं दिसतं?ते चित्र असं म्हणतं की, दिवसाला भारतात सरासरी 41क् लोक रस्ते अपघातात दगावतात. जे जखमी होतात, त्यांची संख्या वेगळी. अगदी ढोबळ अंदाज लावायचा म्हटला तरी लॉकडाऊनमुळे रस्ते वाहतूक बंद असल्याने किमान 35क् लोकांचे जरी प्राण वाचतात असं ग्ृहित धरलं तरी 21 दिवसांत किती लोकांचे प्राण वाचले याचा अंदाज काढा.व्हॉट्सअॅपवर फिरणा:या विनोदासारखं नाही, ही वस्तुस्थिती आहे कारण जगभरात सर्वाधिक माणसं भारतातच रस्ते अपघातात दगावतात.दुसरा एक या काळाचा फायदा दाखवणारे काही फोटो सध्या व्हायरल आहेत. केरळमध्ये तर एक सांबर रस्ता क्रॉस करत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. माणसं घरांच्या पिंज:यात आणि प्राणी कधी नव्हे ते रस्त्यावर निवांत फिरत आहेत. अगदी पक्षी रस्त्यावर उतरले आहेत. गायी, श्वान, रस्त्यावर निवांत झोपल्या आहेत.हे चित्र खरोखरच वेगळं आहे.
जगभरात माणसं पिंजऱ्यात, प्राणी रस्त्यांवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 16:04 IST
माणसं घरांच्या पिंजऱ्यात आणि प्राणी कधी नव्हे ते रस्त्यावर निवांत फिरत आहेत. अगदी पक्षी रस्त्यावर उतरले आहेत. गायी, श्वान, रस्त्यावर निवांत झोपल्या आहेत.
जगभरात माणसं पिंजऱ्यात, प्राणी रस्त्यांवर!
ठळक मुद्देअनेकांना आता स्वत:चं अन्न शोधता येत नाही.