शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

५ राष्ट्रे १८८ देशांना अजून किती दाबून ठेवणार? कायमस्वरूपी जागा मिळण्यास विलंब का?; भारताचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 09:13 IST

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) कायमस्वरूपी जागा देण्यावर भारताने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) कायमस्वरूपी जागा देण्यावर भारताने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाशिवाय न्याय्य आणि सर्वसमावेशक जग निर्माण करणे आणि जगात सर्वांना सोबत घेणे कठीण आहे, अशी भारताची भूमिका संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी मांडली.

सुरक्षा परिषदेत सुधारणांची गरज आहे, भारताला कायमस्वरूपी जागा मिळण्यास विलंब का होत आहे? संयुक्त राष्ट्रांच्या १८८ सदस्य देशांचा सामूहिक आवाज ५ स्थायी सदस्य किती काळ दाबून ठेवणार? असे कंबोज म्हणाल्या. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी भारताच्या स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा दिला आहे.

चीनचा अडथळा : सुरक्षा परिषदेत एकूण १५ सदस्य देश आहेत, त्यापैकी ५ स्थायी आणि १० अस्थायी आहेत. स्थायी सदस्यांमध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि चीन यांचा समावेश आहे. स्थायी सदस्यांपैकी कोणताही देश कोणत्याही निर्णयाशी असहमत असल्यास, तो व्हेटो पॉवर वापरून मंजूर होण्यापासून रोखू शकतो. स्थायी सदस्यांपैकी ४ देश भारताला पाठिंबा देण्यास तयार आहेत, मात्र चीन अडसर ठरत आहे. सहाव्या स्थायी जागेसाठी भारत सर्वात प्रबळ दावेदार आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत सहभागी होण्याची शक्यता किती?

४०% लोक म्हणतात की १० वर्षांत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा विस्तार शक्य नाही.

८ वेळा भारत सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य झाला.

‘पेट्रोल खरेदीत भारत ठरला स्मार्ट’

“भारताकडे अनेक पर्याय असल्याबद्दल टीका केली जाऊ नये, रशियाकडून पेट्रोल खरेदीत भारत स्मार्ट ठरला,” असे स्पष्ट प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी जर्मनीतील म्युनिकमधील सुरक्षा परिषदेतील संवादात्मक सत्रात केले.

यावेळी त्यांच्या शेजारी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन होते. अनेक देशांशी जुळवून घेण्यात मी हुशार आहे. त्यात काय अडचण आहे? तुम्ही माझे कौतुक केले पाहिजे, टीका करू नका,” असेही ते मिश्कीलपणे म्हणाले.