शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

घातक रोगाचे निदान करणारी तंत्रप्रणाली

By admin | Updated: October 30, 2014 00:28 IST

वेळीच निदान झाल्यास प्राणघातक रोग किंवा आजारावर उपचार करून आयुष्य वाढविता येऊ शकते. रोग किंवा आजार बळावण्याधीच त्याला पायबंद कसा घालता येईल,

सॅनफ्रान्सिको : वेळीच निदान झाल्यास प्राणघातक रोग किंवा आजारावर उपचार करून आयुष्य वाढविता येऊ शकते. रोग किंवा आजार बळावण्याधीच त्याला पायबंद कसा घालता येईल, या दिशेने जगभरातील अनेक संस्था संशोधन करीत आहेत. ‘गुगल’ही अशा पद्धतीने कर्करोग आणि हृदयविकार (कॅन्सर, हार्टअटॅक) यासारख्या जीवघेण्या आजाराचे वेळीच निदान करणारी तंत्रप्रणाली विकसित करीत आहे. गुगलच्या एक्स लॅबमध्ये आयुर्विज्ञान संशोधक पथक या प्रकल्पावर काम करीत आहे. 
 रासायनिक घटकयुक्त गोळी आणि मनगटी संवेदक यंत्रयुक्त अशीही वैद्यकीय निदान तंत्रप्रणाली आहे. या रोगनिदान तंत्रप्रणालीतहत मानवी शरीरातील कॅन्सर, हृदयविकारासह अन्य प्राणघातक रोगाची लक्षणो वेळीच शोधून संबंधितावर तातडीने उपचार करणो शक्य होईल.
डॉ. अॅन्ड्रय़ू कोनार्ड यांच्या मार्गदर्शनाखाली ही रोगनिदान तंत्रप्रणाली विकसित केली जात आहे. डॉ. कोनार्ड यांनी एचआयव्ही टेस्ट चीप विकसित केली असून तिचा आता सर्वत्र वापर केला जात आहे. वैद्यकीय उपचारात सक्रिय आणि प्रतिबंधात्मक उपचार असा बदल करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे डॉ. कोनार्ड यांनी सांगितले. नॅनोपार्टिकल्समुळे मानवी शरीरातील रेणू आणि पेशीस्तरावरील माहिती अवगत होते. रासायनिक घटकयुक्त गोळीसोबत एक संवेदी यंत्रच्या माध्यमातून अशा रोगांची लक्षणो आढळून आल्यास मनगटावरील संवेदक यंत्रवर त्याची नोंद होते. परिणामी लक्षणानुसार रोगनिदान करणो शक्य होईल. तथापि, हा प्रयोग अद्याप प्राथमिक स्तरावर असल्याचे गुगलने स्पष्ट केले. दोन वर्षापूर्वी गुगलचे सॉफ्टवेअर इंजिनिअर टॉम स्टेन्स यांना कारची धडक बसली होती. तातडीने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. तातडीने आवश्यक चाचण्या करण्यात आल्या असता अंतर्गत रक्तस्त्रव झाला की काय? यासाठी तपासणी केली असताना त्यांच्या मूत्रपिंडात गाठ असल्याचे आढळून आले. त्यानंतर शस्त्रक्रिया करून ही गाठ काढून टाकण्यात आल्याने टॉम आज कॅन्सरमुक्त आहे. त्याच्यापासून ‘गुगल’ला या रोगनिदान तंत्रप्रणाली विकसित करण्याची प्रेरणा मिळाली. टॉम गुगलच्या एक्स लाईफ सायन्स टीमचा सदस्य आहे.(वृत्तसंस्था)
 
4गोळीच्या माध्यमातून रक्तप्रवाहात नॅनोपार्टिकल मिसळल्यानंतर शरीरातील रोगांची लक्षणो टिपली जातील आणि त्याची माहिती मनगटी घडय़ाळ्य़ासारख्या संवेदक यंत्रर्पयत पोहोचती होतील. त्यामुळे डॉक्टरांना वेळेआधीच योग्य ते वैद्यकीय उपचार करून संबंधित व्यक्तीचे रोगापासून संरक्षण करणो शक्य होईल.