शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

"बांगलादेशातील परिस्थिती जास्त चिंताजनक नाही"; सर्वपक्षीय बैठकीत सरकारने दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 11:42 IST

बांगलादेशच्या संकटावर चर्चा करण्यासाठी भारत सरकारने सकाळी १० वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

All Party Meeting on Bangladesh Situation : शेख हसीना यांनी मंगळवारी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला. शेख हसीना यांनी लष्करी हेलिकॉप्टरमधून देश सोडून भारतात आश्रय घेतला. आरक्षणावरून दोन महिने सुरु असलेल्या गदारोळानंतर बांगलादेशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालीय. बांगलादेशच्या या संकटावर भारताचे बारीक लक्ष आहे. बांगलादेशातल्या परिस्थितीबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. यावेळी सरकारने बांगलादेशातील भारतीयांबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

बांगलादेशातील आरक्षणविरोधी हिंसक आंदोलनांदरम्यान पंतप्रधान शेख हसीना यांनी अचानक राजीनामा देऊन देश सोडल्याने तेथे अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. बांगलादेशच्या संकटावर चर्चा करण्यासाठी भारत सरकारने सकाळी १० वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या बैठकीत सदस्यांना बांगलादेशातील परिस्थितीबाबत माहिती दिली. यानंतर सरकार संसदेत याविषयी महत्त्वाची देणार आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हिंसाचारग्रस्त देशातील १२,०००-१३,००० भारतीयांना बाहेर काढण्यासाठी बांगलादेशातील परिस्थिती इतकी चिंताजनक नव्हती असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी सांगितले . बांगलादेशातील सरकारविरोधी निदर्शने आणि ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यामुळे शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडल्यानंतर सरकार बांगलादेशातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असेही एस जयशंकर म्हणाले.

"सुमारे ८,००० भारतीय विद्यार्थी हे बांगलादेशातील हिंसाचारानंतर भारतात परतले आहेत. सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन भारतात पळून आलेल्या हसिना यांच्याशी सरकारने थोडक्यात चर्चा केली आहे. सरकारला हसीना यांला त्यांच्या भविष्यातील योजना ठरवण्यासाठी थोडा वेळ द्यायचा आहे,” असे जयशंकर यांनी सांगितले.

यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यासाठी एक दीर्घकालीन रणनीती असली पाहिजे, ज्यामध्ये बांगलादेशमध्ये निवडणुका होईपर्यंत अंतरिम सरकारचे शासन असेल, असे म्हटलं. यावर बोलताना एस जयशंकर म्हणाले की, "यासंदर्भात परिस्थिती विकसनशील आहे. जे सरकार येईल ते भारताशी योग्य व्यवहार करेल."

टॅग्स :BangladeshबांगलादेशS. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारत