शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:00 IST

अखेर सर्व सहमतीने माजी न्यायाधीश सुशीला कार्की यांचे नाव पुढे आले. मात्र त्यांना तयार करणे फार मोठे चॅलेंज होते.

काठमांडू - नेपाळमध्ये Gen Z आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर अवघ्या २ दिवसांत केपी शर्मा ओली यांचं सरकार कोसळले. बुधवारी नेपाळ सैन्याचे प्रमुख अशोक राज सिग्देल यांनी रस्त्यावर सैनिकांना उतरवून शांतता आणण्याचा प्रयत्न केला. बुधवारी Gen Z चे आंदोलन शांत झाले. गुरुवारी सकाळी या आंदोलनाचे १५ प्रतिनिधींनी भद्रकाली बेसवर सैन्य अधिकाऱ्यांना भेटले. या भेटीत देशात अंतरिम सरकारचं नेतृत्व करण्यासाठी काही नावांचा पर्याय त्यांनी सुचवला. ज्यात माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की, काठमांडूचे मेयर बालेंद्र शाह, माजी अध्यक्ष ओन्सारी घर्ती मगर, वकील ओम प्रकाश आर्याल, डॉ. गोविंद केसी, ब्रिगेडियर जनरल प्रेम शाही आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त नीलकंठ उप्रेती यांचा समावेश होता. 

त्यातच सैन्याने व्यवसायी दुर्गा प्रसाई आणि राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी यांना चर्चेत सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव दिला, तेव्हा आंदोलनकर्त्यांचे प्रतिनिधी रक्षा बम यांनी बैठक सोडली. प्रसाई हिंदू राजेशाहीचे समर्थन करतात आणि संघराज्यीय लोकशाही ढाचा संपवण्याची मागणी करतात. तर २०२२ मध्ये बनलेल्या राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीवर काही युवा संघटनांनी सध्याच्या व्यवस्थेचा बचाव करत असल्याचा आरोप केला आहे. या दोन्ही संघटनांना सहभागी केल्याने आंदोलन कमकुवत होईल असं रक्षा बम यांनी म्हटलं. सैन्य प्रमुखांनी दिलेला प्रस्ताव आम्ही फेटाळला आणि बैठकीतून बाहेर पडलो असं त्यांनी सांगितले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या सर्व गटामध्ये एकमत दिसून आले नाही. 

अखेर सर्व सहमतीने माजी न्यायाधीश सुशीला कार्की यांचे नाव पुढे आले. मात्र त्यांना तयार करणे फार मोठे चॅलेंज होते. सैन्य प्रमुख कार्की यांना भेटण्यासाठी रात्री २ वाजता घरी पोहचले. अंतरिम सरकारचं नेतृत्व करण्यासाठी आपणच योग्य व्यक्ती आहात असं सैन्य प्रमुखांनी त्यांना सांगितले. १५ तासांच्या महाचर्चेनंतर Gen Z आंदोलनकर्त्यांच्या आग्रहास्तव त्या तयार झाल्या. काठमांडूचे मेयर बालेंद्र शाह ज्यांचे नाव अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून पुढे आले होते. त्यांनीही सुशीला कार्की यांच्या नावाला पाठिबा दिला. 

दरम्यान, सुशीला कार्की यांचं नाव पुढे आल्यानंतर लोकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सुशीला कार्की पंतप्रधान होऊ शकत नाहीत, कारण त्या आधीच वादात सापडल्या आहेत. नव्या पिढीचा एखादा नेता पंतप्रधान व्हावा. आमची पहिली पसंत बालेंद्र शाह आहेत असं काही लोकांचे म्हणणं आहे. आमचा देश एका संकटात अडकला आहे. एखाद्या व्यक्तीपेक्षा देश मोठा आहे. पंतप्रधान कुणीही व्हावे पण त्यांनी देशहिताचे निर्णय घ्यावेत जेणेकरून नेपाळी लोकांचे भले होईल असंही काही नागरिक म्हणत आहेत. त्यात बालेंद्र शाह यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :Nepalनेपाळ