शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:00 IST

अखेर सर्व सहमतीने माजी न्यायाधीश सुशीला कार्की यांचे नाव पुढे आले. मात्र त्यांना तयार करणे फार मोठे चॅलेंज होते.

काठमांडू - नेपाळमध्ये Gen Z आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर अवघ्या २ दिवसांत केपी शर्मा ओली यांचं सरकार कोसळले. बुधवारी नेपाळ सैन्याचे प्रमुख अशोक राज सिग्देल यांनी रस्त्यावर सैनिकांना उतरवून शांतता आणण्याचा प्रयत्न केला. बुधवारी Gen Z चे आंदोलन शांत झाले. गुरुवारी सकाळी या आंदोलनाचे १५ प्रतिनिधींनी भद्रकाली बेसवर सैन्य अधिकाऱ्यांना भेटले. या भेटीत देशात अंतरिम सरकारचं नेतृत्व करण्यासाठी काही नावांचा पर्याय त्यांनी सुचवला. ज्यात माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की, काठमांडूचे मेयर बालेंद्र शाह, माजी अध्यक्ष ओन्सारी घर्ती मगर, वकील ओम प्रकाश आर्याल, डॉ. गोविंद केसी, ब्रिगेडियर जनरल प्रेम शाही आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त नीलकंठ उप्रेती यांचा समावेश होता. 

त्यातच सैन्याने व्यवसायी दुर्गा प्रसाई आणि राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी यांना चर्चेत सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव दिला, तेव्हा आंदोलनकर्त्यांचे प्रतिनिधी रक्षा बम यांनी बैठक सोडली. प्रसाई हिंदू राजेशाहीचे समर्थन करतात आणि संघराज्यीय लोकशाही ढाचा संपवण्याची मागणी करतात. तर २०२२ मध्ये बनलेल्या राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीवर काही युवा संघटनांनी सध्याच्या व्यवस्थेचा बचाव करत असल्याचा आरोप केला आहे. या दोन्ही संघटनांना सहभागी केल्याने आंदोलन कमकुवत होईल असं रक्षा बम यांनी म्हटलं. सैन्य प्रमुखांनी दिलेला प्रस्ताव आम्ही फेटाळला आणि बैठकीतून बाहेर पडलो असं त्यांनी सांगितले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या सर्व गटामध्ये एकमत दिसून आले नाही. 

अखेर सर्व सहमतीने माजी न्यायाधीश सुशीला कार्की यांचे नाव पुढे आले. मात्र त्यांना तयार करणे फार मोठे चॅलेंज होते. सैन्य प्रमुख कार्की यांना भेटण्यासाठी रात्री २ वाजता घरी पोहचले. अंतरिम सरकारचं नेतृत्व करण्यासाठी आपणच योग्य व्यक्ती आहात असं सैन्य प्रमुखांनी त्यांना सांगितले. १५ तासांच्या महाचर्चेनंतर Gen Z आंदोलनकर्त्यांच्या आग्रहास्तव त्या तयार झाल्या. काठमांडूचे मेयर बालेंद्र शाह ज्यांचे नाव अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून पुढे आले होते. त्यांनीही सुशीला कार्की यांच्या नावाला पाठिबा दिला. 

दरम्यान, सुशीला कार्की यांचं नाव पुढे आल्यानंतर लोकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सुशीला कार्की पंतप्रधान होऊ शकत नाहीत, कारण त्या आधीच वादात सापडल्या आहेत. नव्या पिढीचा एखादा नेता पंतप्रधान व्हावा. आमची पहिली पसंत बालेंद्र शाह आहेत असं काही लोकांचे म्हणणं आहे. आमचा देश एका संकटात अडकला आहे. एखाद्या व्यक्तीपेक्षा देश मोठा आहे. पंतप्रधान कुणीही व्हावे पण त्यांनी देशहिताचे निर्णय घ्यावेत जेणेकरून नेपाळी लोकांचे भले होईल असंही काही नागरिक म्हणत आहेत. त्यात बालेंद्र शाह यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :Nepalनेपाळ