शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

'मुंबईवरील 26/11चा हल्ला भारतानंच घडवून आणला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 12:43 IST

पाकिस्तानच्या माजी गृहमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

नवी दिल्ली: मुंबईवरील 26/11 हल्ल्याबद्दल माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केलेल्या विधानानं अडचणीत सापडलेल्या पाकिस्ताननं आता नवा कांगावा सुरू केला आहे. भारतानंच मुंबईवरील हल्ला घडवून आणला, असा अजब दावा पाकिस्तानचे माजी गृहमंत्री रहमान मलिक यांनी केला आहे. मुंबईवरील 26/11 हल्ल्यामागे भारताची गुप्तहेर यंत्रणा रॉचा हात आहे, असे अकलेचे तारेदेखील मलिक यांनी तोडले आहेत. '26/11 चा हल्ला रॉने घडवून आणला. या हल्ल्याला पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा होता. काश्मीरमधील मानवाधिकाराच्या उल्लंघनाच्या घटनांकडे जगाचं दुर्लक्ष व्हावं, यासाठी हा हल्ला घडवून आणण्यात आला,' असं मलिक यांनी म्हटलं. या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग नव्हता, असंदेखील ते म्हणाले. 'पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांचं विधान मागे घ्यावं. त्यांच्या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा डागाळली जात आहे,' असं मलिक यांनी म्हटलं. नवाज शरीफ यांनी शनिवारी दिलेल्या मुलाखतीत मुंबई हल्ल्याबद्दल महत्त्वपूर्ण विधान केलं होतं. 26/11 चा हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घडवून आणला, अशी कबुली शरीफ यांनी दिली होती.  नवाज शरीफ यांच्या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची नाचक्की झाली. त्यामुळे शरीफ यांनी सारवासारव करत, भारतीय माध्यमांनी विधानाची तोडमोड करुन अर्थाचा अनर्थ केल्याचं म्हटलं. हाच संदर्भ देत, शरीफ यांनी त्यांचं विधान मागे घ्यावं, असं मलिक म्हणाले. 'स्टेट अॅक्टर्स आणि नॉन स्टेट अॅक्टर्स यामध्ये फरक आहे. शरीफ यांनी तो लक्षात घेण्याची गरज आहे. नॉन स्टेट अॅक्टर्स फक्त त्यांची उद्दिष्टं साध्य करण्यासाठी पाकिस्तानचा वापर करतात,' असं मलिक यांनी म्हटलं.  

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान