शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

आधी यादीतले कुख्यात दहशतवादी भारताकडे सोपवा, तरच...; भारताने पाकिस्तानला पुन्हा खडसावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 20:06 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताशी दहशतवादासह सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची खुली ऑफर दिल्यानंतर भारताने यावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताशी दहशतवादासह सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची खुली ऑफर दिल्यानंतर भारताने यावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानशी कोणताही संवाद फक्त दोन मुद्द्यांवरच शक्य आहे, त्यातील एक म्हणजे पाकिस्तानने दहशतवाद्यांचा ताबा भारताकडे द्यावा आणि दुसरा म्हणजे पाकव्याप्त काश्मीर भारताला .

परराष्ट्र मंत्रालयाने घेतली ठाम भूमिकापरराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारत-पाकिस्तानमधील कोणताही संवाद पूर्णपणे द्विपक्षीय स्वरूपाचा असावा, त्यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका मान्य केली जाणार नाही. त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी परदेश दौऱ्यांदरम्यान दिलेल्या चर्चेच्या प्रस्तावावर उत्तर देताना ही भूमिका मांडली.

जयस्वाल म्हणाले की, "दहशतवाद आणि संवाद एकत्र शक्य नाहीत. काही वर्षांपूर्वी आम्ही पाकिस्तानकडे कुख्यात दहशतवाद्यांची यादी सुपूर्त केली होती. त्या व्यक्तींना भारताच्या ताब्यात द्यावे, हीच आमची प्रमुख मागणी आहे."

जम्मू-काश्मीर प्रश्नावरही भारताचा स्पष्ट इशाराजम्मू आणि काश्मीरबाबत पाकिस्तान चर्चा करू इच्छितो, पण भारताने यावर ठाम भूमिका घेतली आहे की, जोपर्यंत पाकिस्तान आपल्या बेकायदेशीर ताब्यात असलेला भाग (पीओके) रिकामा करून भारताला परत करत नाही, तोपर्यंत या विषयावर कोणतीही चर्चा होणार नाही.

सिंधू करारावर देखील कठोर भूमिकासिंधू जलवाटप कराराबाबत भारताने स्पष्ट इशारा दिला आहे की, जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पूर्णपणे आणि विश्वासार्हतेने थांबवत नाही, तोपर्यंत हा करार स्थगितच राहील. जयस्वाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाची पुनरावृत्ती करत म्हटले की, “दहशतवाद आणि संवाद, दहशतवाद आणि व्यापार, आणि पाणी-रक्त हे एकत्र होऊ शकत नाहीत.”

दहशतवाद्यांच्या समर्थनाबाबत पाकिस्तानवर आरोपऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी आयोजित केलेल्या सभांमध्ये पाकिस्तान सरकारच्या नेत्यांची आणि लष्करी अधिकाऱ्यांची उपस्थिती यावर प्रतिक्रिया देताना भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली. जयस्वाल म्हणाले, “दहशतवाद्यांचे सत्कार, त्यांना फुलं अर्पण करणं आणि व्यासपीठ उपलब्ध करून देणं, हे आम्हाला नवीन नाही. यावरून पुन्हा सिद्ध होतं की पाकिस्तान सरकार आणि लष्कर यांचा दहशतवाद्यांना थेट पाठिंबा आहे.”

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर