शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 13:54 IST

मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशची सूत्रे हाती घेतल्यापासून, भारतासोबतचे त्यांचे संबंध बिघडत चालले आहेत.

एकेकाळी नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित झालेले मोहम्मद युनूस बांगलादेशात सत्तेत आल्यापासून कट्टरपंथीयांच्या हाती असलेल्या कळसूत्री बाहुलीसारखे वागत असल्याचे दिसून आले आहे. युनूस यांनी बांगलादेशची सूत्रे हाती घेतल्यापासून, भारतासोबतचे संबंध बिघडत चालले आहेत. दरम्यान, युनूस यांनी आता भारतातील ईशान्येकडील सात राज्यांविषयी एक नवी योजना आखल्याचे कळत आहे.

बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या नेपाळच्या प्रतिनिधी सभागृहाचे उपसभापती यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान मोहम्मद युनूस यांनी ही चर्चा केल्याचे म्हटले जात आहे. ऊर्जा, आरोग्य सेवा आणि वाहतूक क्षेत्रात सीमापार सहकार्य वाढविण्यावर भर देताना ते म्हणाले, "बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि भारतातील ईशान्येकडील सात राज्य यांसाठी आर्थिक नियोजनाची गरज आहे." यावेळी सामायिक ऊर्जा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांद्वारे परस्पर संबंध मजबूत करण्याच्या गरजेवर देखील त्यांनी भर दिला.

एका बाणाने अनेक निशाणे साधण्याचा प्रयत्नया बैठकीत बांगलादेश, नेपाळ आणि भारत यांच्यातील अलिकडच्या वीज विक्री करारावरही चर्चा झाली, ज्याअंतर्गत नेपाळमधून भारताच्या ग्रीडद्वारे बांगलादेशला ४० मेगावॅट जलविद्युत पुरवठा केला जात आहे. मोहम्मद युनूस म्हणाले की, बांगलादेश केवळ ऊर्जाच नाही तर प्रादेशिक आरोग्य सेवेकडेही सामायिक दृष्टिकोनातून पाहतो. ते म्हणाले, "रंगपूरमध्ये बांधण्यात येणारे १००० खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल नेपाळ आणि भूतानमधील रुग्णांसाठी देखील खुले असेल. आम्ही प्रादेशिक आरोग्य सुरक्षा आणि सामायिक समृद्धीवर भर देणार आहोत."

चीन दौऱ्यातही भारताविरुद्ध विधानयावेळी मोहम्मद युनूस यांच्या जुन्या व्यक्तव्यांवरही चर्चा झाली. खरं तर, चीनच्या भेटीदरम्यान, युनूस यांनी बांगलादेशला चीनसाठी उत्पादन, रसद आणि व्यापाराचे प्रादेशिक केंद्र बनवण्याची बाजू मांडली होती. ते म्हणाले होते की, "ईशान्य भारतातील सात राज्ये भूपरिवेष्ठित आहेत. त्यांना समुद्रात प्रवेश नाही. आम्ही त्यांच्यासाठी समुद्राचे दार आहोत. तुम्ही बांगलादेशात उत्पादन करा, नेपाळ आणि भूतानमधून जलविद्युत घ्या आणि ती चीनमध्ये विका.' त्यांच्या या विधानावर भारतातही टीका झाली.

चीनचा काय संबंध?त्यानंतर, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सन्याल यांनी युनूस यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना एक्सवर लिहिले की, "युनूस चीनला आवाहन करत आहे की, भारतातील सात राज्ये भूपरिवेष्ठित अर्थात जमिनीवर आहेत... याचा चीनशी काय संबंध? चीनने बांगलादेशमध्ये गुंतवणूक करावी, परंतु भारताच्या अंतर्गत भूगोलाचा उल्लेख करणे चुकीचे आहे."

टॅग्स :BangladeshबांगलादेशNepalनेपाळIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय