शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 13:54 IST

मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशची सूत्रे हाती घेतल्यापासून, भारतासोबतचे त्यांचे संबंध बिघडत चालले आहेत.

एकेकाळी नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित झालेले मोहम्मद युनूस बांगलादेशात सत्तेत आल्यापासून कट्टरपंथीयांच्या हाती असलेल्या कळसूत्री बाहुलीसारखे वागत असल्याचे दिसून आले आहे. युनूस यांनी बांगलादेशची सूत्रे हाती घेतल्यापासून, भारतासोबतचे संबंध बिघडत चालले आहेत. दरम्यान, युनूस यांनी आता भारतातील ईशान्येकडील सात राज्यांविषयी एक नवी योजना आखल्याचे कळत आहे.

बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या नेपाळच्या प्रतिनिधी सभागृहाचे उपसभापती यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान मोहम्मद युनूस यांनी ही चर्चा केल्याचे म्हटले जात आहे. ऊर्जा, आरोग्य सेवा आणि वाहतूक क्षेत्रात सीमापार सहकार्य वाढविण्यावर भर देताना ते म्हणाले, "बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि भारतातील ईशान्येकडील सात राज्य यांसाठी आर्थिक नियोजनाची गरज आहे." यावेळी सामायिक ऊर्जा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांद्वारे परस्पर संबंध मजबूत करण्याच्या गरजेवर देखील त्यांनी भर दिला.

एका बाणाने अनेक निशाणे साधण्याचा प्रयत्नया बैठकीत बांगलादेश, नेपाळ आणि भारत यांच्यातील अलिकडच्या वीज विक्री करारावरही चर्चा झाली, ज्याअंतर्गत नेपाळमधून भारताच्या ग्रीडद्वारे बांगलादेशला ४० मेगावॅट जलविद्युत पुरवठा केला जात आहे. मोहम्मद युनूस म्हणाले की, बांगलादेश केवळ ऊर्जाच नाही तर प्रादेशिक आरोग्य सेवेकडेही सामायिक दृष्टिकोनातून पाहतो. ते म्हणाले, "रंगपूरमध्ये बांधण्यात येणारे १००० खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल नेपाळ आणि भूतानमधील रुग्णांसाठी देखील खुले असेल. आम्ही प्रादेशिक आरोग्य सुरक्षा आणि सामायिक समृद्धीवर भर देणार आहोत."

चीन दौऱ्यातही भारताविरुद्ध विधानयावेळी मोहम्मद युनूस यांच्या जुन्या व्यक्तव्यांवरही चर्चा झाली. खरं तर, चीनच्या भेटीदरम्यान, युनूस यांनी बांगलादेशला चीनसाठी उत्पादन, रसद आणि व्यापाराचे प्रादेशिक केंद्र बनवण्याची बाजू मांडली होती. ते म्हणाले होते की, "ईशान्य भारतातील सात राज्ये भूपरिवेष्ठित आहेत. त्यांना समुद्रात प्रवेश नाही. आम्ही त्यांच्यासाठी समुद्राचे दार आहोत. तुम्ही बांगलादेशात उत्पादन करा, नेपाळ आणि भूतानमधून जलविद्युत घ्या आणि ती चीनमध्ये विका.' त्यांच्या या विधानावर भारतातही टीका झाली.

चीनचा काय संबंध?त्यानंतर, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सन्याल यांनी युनूस यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना एक्सवर लिहिले की, "युनूस चीनला आवाहन करत आहे की, भारतातील सात राज्ये भूपरिवेष्ठित अर्थात जमिनीवर आहेत... याचा चीनशी काय संबंध? चीनने बांगलादेशमध्ये गुंतवणूक करावी, परंतु भारताच्या अंतर्गत भूगोलाचा उल्लेख करणे चुकीचे आहे."

टॅग्स :BangladeshबांगलादेशNepalनेपाळIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय