शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

१९८४ मधील अपहृत विमानात वडील होते; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 10:16 IST

५ जुलै १९८४ रोजी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे पठाणकोटहून अपहरण करून ते दुबईला नेण्यात आले होते

जिनिव्हा : १९८४ मध्ये अपहरण झालेल्या विमानात आपले वडील होते, असा गौप्यस्फोट करीत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी विमानातील प्रवाशांचे कुटुंबीय आणि त्यावेळी सरकारमध्ये असलेल्यांबद्दल आपल्या मनात विशेष भावना आहेत, असे येथे सांगितले.

१९९९ च्या विमान अपहरणाशी संबंधित 'आयसी ८१४' या वेबसिरीजबाबत एका कार्यक्रमात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर जयशंकर यांनी हा गौप्यस्फोट केला. अपहरणाचे प्रकरण हाताळणाऱ्या पथकातील एक तरुण अधिकारी म्हणून आणि दुसरीकडे सरकारवर दबाव टाकणाऱ्या प्रवाशांच्या कुटुंबीयांपैकी एकाचा घटक म्हणून त्यांची काय भावना होती, हे जयशंकर यांनी या वेळी सांगितले.

आयसी ८१४' या वेबसिरीजमध्ये नोकरशाह आणि सरकार यांच्यातील वाटाघाटी अत्यंत ढिसाळ पद्धतीने दाखविण्यात आल्या असे मला कळाले, असे सांगत जयशंकर यांनी आपण ही वेबसिरीज पाहिली नसल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी स्वतःचे १९८४ च्या अपहरणाबाबतचे अनुभव सांगितले.

५ जुलै १९८४ रोजी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे पठाणकोटहून अपहरण करून ते दुबईला नेण्यात आले होते. जयशंकर तेव्हा भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी होते आणि निवृत्तीनंतर आता ते परराष्ट्रमंत्री आहेत.

आईला सांगितले, मी येऊ शकत नाही...

'१९८४ मध्ये मी अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी करणाऱ्या पथकातील तरुण अधिकारी होतो. मी माझ्या आईला सांगितले की, विमानाचे अपहरण झाले आणि घरी येऊ शकत नाही. नंतर मला कळाले की, विमानात माझे वडील आहेत. विमान अखेर दुबईत सुखरूप उतरले. हे फार लांबलचक कथानक आहे, परंतु सुदैवाने या प्रकरणात कोणीही मृत्युमुखी पडले नाही,' असे ते म्हणाले.