शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

१९८४ मधील अपहृत विमानात वडील होते; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 10:16 IST

५ जुलै १९८४ रोजी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे पठाणकोटहून अपहरण करून ते दुबईला नेण्यात आले होते

जिनिव्हा : १९८४ मध्ये अपहरण झालेल्या विमानात आपले वडील होते, असा गौप्यस्फोट करीत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी विमानातील प्रवाशांचे कुटुंबीय आणि त्यावेळी सरकारमध्ये असलेल्यांबद्दल आपल्या मनात विशेष भावना आहेत, असे येथे सांगितले.

१९९९ च्या विमान अपहरणाशी संबंधित 'आयसी ८१४' या वेबसिरीजबाबत एका कार्यक्रमात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर जयशंकर यांनी हा गौप्यस्फोट केला. अपहरणाचे प्रकरण हाताळणाऱ्या पथकातील एक तरुण अधिकारी म्हणून आणि दुसरीकडे सरकारवर दबाव टाकणाऱ्या प्रवाशांच्या कुटुंबीयांपैकी एकाचा घटक म्हणून त्यांची काय भावना होती, हे जयशंकर यांनी या वेळी सांगितले.

आयसी ८१४' या वेबसिरीजमध्ये नोकरशाह आणि सरकार यांच्यातील वाटाघाटी अत्यंत ढिसाळ पद्धतीने दाखविण्यात आल्या असे मला कळाले, असे सांगत जयशंकर यांनी आपण ही वेबसिरीज पाहिली नसल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी स्वतःचे १९८४ च्या अपहरणाबाबतचे अनुभव सांगितले.

५ जुलै १९८४ रोजी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे पठाणकोटहून अपहरण करून ते दुबईला नेण्यात आले होते. जयशंकर तेव्हा भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी होते आणि निवृत्तीनंतर आता ते परराष्ट्रमंत्री आहेत.

आईला सांगितले, मी येऊ शकत नाही...

'१९८४ मध्ये मी अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी करणाऱ्या पथकातील तरुण अधिकारी होतो. मी माझ्या आईला सांगितले की, विमानाचे अपहरण झाले आणि घरी येऊ शकत नाही. नंतर मला कळाले की, विमानात माझे वडील आहेत. विमान अखेर दुबईत सुखरूप उतरले. हे फार लांबलचक कथानक आहे, परंतु सुदैवाने या प्रकरणात कोणीही मृत्युमुखी पडले नाही,' असे ते म्हणाले.