शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपवर श्रीलंकेने घातली बंदी; दोन धर्मीयांत तणाव, देशभर सहा तासांची संचारबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 05:25 IST

फेसबुकवरील एका पोस्टमुळे मशिदींवर तसेच मुस्लिमांच्या मालकीच्या व्यवसायांवर हल्ले सुरू झाले आणि धार्मिक तणाव भडकल्यामुळे श्रीलंकेने समाजमाध्यमांवर सोमवारी बंदी घातली.

कोलंबो : फेसबुकवरील एका पोस्टमुळे मशिदींवर तसेच मुस्लिमांच्या मालकीच्या व्यवसायांवर हल्ले सुरू झाले आणि धार्मिक तणाव भडकल्यामुळे श्रीलंकेने समाजमाध्यमांवर सोमवारी बंदी घातली.श्रीलंकेत सतत हिंसाचार पसरत चालल्यामुळे सोमवारी अधिकाऱ्यांनी संपूर्ण देशभर सहा तासांची संचारबंदी लागू केली आहे. सोमवारी रात्री नऊ ते पहाटे चार वाजेपर्यंत ही संचारबंदी राहील, असे पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.ईस्टर संडेला झालेल्या हल्ल्यांनंतरची ही सगळ्यात मोठी सामाजिक अशांतता आहे. ईस्टर संडेच्या हल्ल्यांत २६० जण ठार तर ५०० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. देशाच्या पश्चिम किनाºयावरील गाव चिलावमध्ये जमावाने मशिदीवर व मुस्लिमांच्या मालकीच्या काही दुकानांवर हल्ले केल्यानंतर श्रीलंकेच्या पोलिसांनी दुसºया दिवशी गावात संचारबंदी लागू केली व त्यानंतर समाजमाध्यमांवर बंदी घालण्यात आली. (वृत्तसंस्था)आणखी हसू नका...एका मुस्लिम दुकानदाराने फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर वादाला सुरुवात झाली होती. फेसबुकवर पोस्ट टाकणाºयाचे नाव अब्दुल हमीद मोहम्मद हासमर (३८) असे असून, त्याने ‘आणखी हसू नका, एकेदिवशी तुम्ही रडाल’ असे त्या पोस्टमध्ये म्हटले होते.मुस्लिम दुकानदाराच्या या टिपणीला स्थानिक ख्रिश्चन्स आणखी हल्ले होणार आहेत, अशी धमकी समजले. अल्पसंख्य मुस्लिम आणि बहुसंख्य सिंहली समाजात हिंसक घटना सुरू होताच मध्यरात्रीपासून फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली.रविवारी सायंकाळी उशिरा कुलियापित्यामध्ये मशीद आणि मुस्लिमांची मालकी असलेल्या काही दुकानांवर हल्ले झाल्यानंतर अशांतता पसरली व अधिकाऱ्यांनी वायव्येकडील शहरात संचारबंदी लागू केली होती. कुलियापित्या आणि चिलावमधील संचारबंदी मागे घेण्यात आल्याचे पोलिसांचे प्रवक्ते रुवान गुणसेकरा यांनी सांगितले.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका