शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

काश्मीरमधील अतिरेकी गटांना ‘प्रोत्साहन’ नको

By admin | Updated: February 3, 2016 02:51 IST

काश्मीरमधील अतिरेकी गटांना ‘प्रोत्साहन’ देण्याचे सरकारने टाळावे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होणारी काळजी दूर करण्यासाठी काश्मीरमधील हल्ल्यांत सहभागी असलेल्या गटांवर कारवाई करावी,

इस्लामाबाद : काश्मीरमधील अतिरेकी गटांना ‘प्रोत्साहन’ देण्याचे सरकारने टाळावे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होणारी काळजी दूर करण्यासाठी काश्मीरमधील हल्ल्यांत सहभागी असलेल्या गटांवर कारवाई करावी, असे पाकिस्तानच्या संसदीय समितीने म्हटले आहे.नॅशनल असेम्ब्लीच्या स्थायी समितीने (परराष्ट्र व्यवहार) सोमवारी काश्मीरशी संबंधित आपले चार पानी धोरण प्रसिद्धीस दिले, त्यात वरील सूचना करण्यात आली आहे, असे ‘एक्स्प्रेस ट्रिब्युन’ने वृत्त दिले. पाकिस्तान सरकारने काश्मीरमधील अतिरेकी, सशस्त्र, बंदी घातलेल्या गटांना प्रोत्साहन द्यायला नको, असे या समितीने म्हटले आहे. समितीने भारत-पाकिस्तान संबंधांवर अनेक धोरणात्मक सूचना केल्या आहेत. पाकमधून भारताविरुद्ध कारवाया करणाऱ्या गटांवर कारवाई करण्याची भारताची सतत मागणी आहे.या समितीचे प्रमुख पाकिस्तान मुस्लिम लीगचे (नवाज शरीफ) नॅशनल असेम्ब्ली सदस्य अवैज अहमद लेघारी आहेत. या समितीने काश्मीरमधील हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या गटांवर पाकिस्तान पुरेशी कारवाई करीत नाही ही आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होणारी काळजी दूर करण्यासाठी हिंसक सशस्त्र संघटनांविरुद्ध कारवाई केली पाहिजे, अशी शिफारस केली आहे. पाकिस्तानचे भारताबाबतचे धोरण हे देवाणघेवाण, कपात करणे, फेरसुरुवात आणि निकाल या चार महत्त्वाच्या तत्त्वांवर आधारित हवेत. भारताशी संबंधित प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत संबंध ठेवले पाहिजेत, असेही समितीचे म्हणणे आहे. या वरील चार तत्त्वांवर अपेक्षित प्रगती होऊ शकली नाही, तर पाकिस्तान सरकारने भारताशी काश्मीर, पाणी, व्यापार आणि संस्कृती आणि दूरसंचार या महत्त्वाच्या विषयावर संबंध ठेवले पाहिजेत, अशी समितीची सूचना आहे.