शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive भारताने जीवाच्या भीतीने पळून आलेल्या रोहिंग्यांना आसरा द्यावा - रो ने सान ल्विन

By अोंकार करंबेळकर | Updated: September 7, 2017 15:52 IST

मुंबई, दि, ७- भारत आणि बांगलादेश सरकारने संकटात सापडलेल्या रोहिंग्यांना मदत करण्यासाठी आपल्या देशाची दारं उघडावीत अशी विनंती युरोपस्थित ...

ठळक मुद्दे भारत आणि बांगलादेश सरकारने संकटात सापडलेल्या रोहिंग्यांना मदत करण्यासाठी आपल्या देशाची दारं उघडावीत.

मुंबई, दि, ७- भारत आणि बांगलादेश सरकारने संकटात सापडलेल्या रोहिंग्यांना मदत करण्यासाठी आपल्या देशाची दारं उघडावीत अशी विनंती युरोपस्थित रोहिंग्या कार्यकर्ते आणि ब्लाँगर रो ने सान ल्विन यांनी लोकमतशी बोलताना केली. या दोन्ही देशांनी आताच रोहिंग्यांना मदतीचा हात पुढे करावा असे ते म्हणाले. परदेशात कार्यरत असणा-या रोहिंग्या चळवळीतील कार्यकर्त्याने भारतातील एखाद्या प्रादेशिक भाषेतील वृत्तसमुहाला मुलाखत देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

रो ने सान ल्विन यांनी रोहिंग्यांच्या प्रश्नावर लोकमतकडे आपले मत व्यक्त करताना सांगितले, भारत आणि बांगलादेशची लोकसंख्या आधीच जास्त आहे हे आम्ही जाणतो, आजवर या देशांनी केलेल्या मदतीसाठी आम्ही कृतज्ज्ञ आहोत पण आता संकटात सापडलेल्या, जीवाच्या भीतीने पळून आलेल्या रोहिंग्यांना आसरा द्या, यूएनच्या संघटनांद्वारे आम्हाला मदत करा. बांगलादेशाने सीमांची दारं बंद केलीत पण खिडकीतून आत येणार्या रोहिंग्यांचा मृत्यू होत आहे, हे टाळण्यासाठी बांगलादेशाने सीमा पूर्ण उघडाव्यात. रोहिंग्या फार काळ परदेशात राहणार नाहीत, आम्हाला आमचा देश गमवायचा नाही, आम्हाला परत जायचंच आहे, त्यामुळे थोड्या काळासाठी तरी आम्हाला राहू द्यावं. 

अराकान प्रांत हा खरंतर रोहिंग्यांचा स्वतःचा प्रांत होता, बर्मिज लोकांनी तेथे घुसखोरी करुन आम्हीच बाहेरचे आहोत अशी हाकाटी सुरु केली आहे. या प्रदेशात आर्थिक क्षेत्रं त्यांना तयार करायची आहेत तसेच रोहिंग्यांना हाकलून देशाची वंशशुद्धी करायची आहे, म्हणूनच रोहिंग्यांवरील अत्याचारांचं सत्र त्यांनी आरंभलं आहे.दिवसाढवळ्या लूट, जाळपोळ, बलात्कार तेथे सरकार आणि लष्कराच्या आशीर्वादानेच सुरु आहे.

 म्यानमारमध्ये नवे सरकार आल्यावर रोहिंग्यांच्या स्थितीत काही फरक पडला का असे विचारताच रो ने सान ल्विन म्हणाले, आजिबात नाही. म्यानमारमध्ये अजूनही पूर्ण लोकशाही नाही, सगळे निर्णय लष्करच घेते, आजही लष्कराच्या आदेशाशिवाय तेथे काहीही करता येत नाही. म्यानमारमध्ये नेते किंवा लष्कराविरोधात ब्र काढला तरी तुरुंगवास होतो. तुम्ही सोशल मीडियावरसुदिधा काहीही लिहू शकत नाही. अशा स्थितीत लष्करशाहीतून देशाची मान कशी मोकळी होणार ? 

लष्कर आणि पोलिसी कारवाईला विरोध करणार्या रोहिंग्यांना दहशतवादी ठरवून त्यांना दडपणं सुरु आहे. अन्यायी सरकारी बळाला विरोध करणं म्हणजे दहशतवादी अशी त्यांची व्याख्या आहे. एकदा दहशतवादी असं नाव दिलं की कसंही मुस्कटदाबी करण्याचा परवाना त्यांना मिळतो, म्हणूनच रोहिंग्यांना दहशतवादाचं लेबल चिकटवलं जात आहे.

पाश्चिमात्य देशांचे म्यानमारमध्ये व्यापारी हितसंबंध आहेत, ते अनेक प्रकल्पांमध्ये हळूहळू गुंतवणूक करु लागले आहेत, तेथे लष्कराला मोठी शस्त्र सामुग्रीही विकली जाते. हे सगळं बंद झालं तर रोहिंग्यांचा प्रश्न लवकर सुटेल. म्यानमार सरकार या आर्थिक बळावर दडपशाही करत असल्यामुळे ते बळ कमू झाले तर काही वेळातच रोहिंग्यांचा प्रश्न सुटेल. सध्या संकटात सापडलेल्या रोहिंग्यांना मानवाधिकाराच्या नजरेने पाहात भारत व बांगलादेशाने मदत करण्याची नितांत गरज असल्याचे रो ने सान ल्विन यांनी लोकमतकडे वारंवार बोलून दाखवली.