शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

Exclusive भारताने जीवाच्या भीतीने पळून आलेल्या रोहिंग्यांना आसरा द्यावा - रो ने सान ल्विन

By अोंकार करंबेळकर | Updated: September 7, 2017 15:52 IST

मुंबई, दि, ७- भारत आणि बांगलादेश सरकारने संकटात सापडलेल्या रोहिंग्यांना मदत करण्यासाठी आपल्या देशाची दारं उघडावीत अशी विनंती युरोपस्थित ...

ठळक मुद्दे भारत आणि बांगलादेश सरकारने संकटात सापडलेल्या रोहिंग्यांना मदत करण्यासाठी आपल्या देशाची दारं उघडावीत.

मुंबई, दि, ७- भारत आणि बांगलादेश सरकारने संकटात सापडलेल्या रोहिंग्यांना मदत करण्यासाठी आपल्या देशाची दारं उघडावीत अशी विनंती युरोपस्थित रोहिंग्या कार्यकर्ते आणि ब्लाँगर रो ने सान ल्विन यांनी लोकमतशी बोलताना केली. या दोन्ही देशांनी आताच रोहिंग्यांना मदतीचा हात पुढे करावा असे ते म्हणाले. परदेशात कार्यरत असणा-या रोहिंग्या चळवळीतील कार्यकर्त्याने भारतातील एखाद्या प्रादेशिक भाषेतील वृत्तसमुहाला मुलाखत देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

रो ने सान ल्विन यांनी रोहिंग्यांच्या प्रश्नावर लोकमतकडे आपले मत व्यक्त करताना सांगितले, भारत आणि बांगलादेशची लोकसंख्या आधीच जास्त आहे हे आम्ही जाणतो, आजवर या देशांनी केलेल्या मदतीसाठी आम्ही कृतज्ज्ञ आहोत पण आता संकटात सापडलेल्या, जीवाच्या भीतीने पळून आलेल्या रोहिंग्यांना आसरा द्या, यूएनच्या संघटनांद्वारे आम्हाला मदत करा. बांगलादेशाने सीमांची दारं बंद केलीत पण खिडकीतून आत येणार्या रोहिंग्यांचा मृत्यू होत आहे, हे टाळण्यासाठी बांगलादेशाने सीमा पूर्ण उघडाव्यात. रोहिंग्या फार काळ परदेशात राहणार नाहीत, आम्हाला आमचा देश गमवायचा नाही, आम्हाला परत जायचंच आहे, त्यामुळे थोड्या काळासाठी तरी आम्हाला राहू द्यावं. 

अराकान प्रांत हा खरंतर रोहिंग्यांचा स्वतःचा प्रांत होता, बर्मिज लोकांनी तेथे घुसखोरी करुन आम्हीच बाहेरचे आहोत अशी हाकाटी सुरु केली आहे. या प्रदेशात आर्थिक क्षेत्रं त्यांना तयार करायची आहेत तसेच रोहिंग्यांना हाकलून देशाची वंशशुद्धी करायची आहे, म्हणूनच रोहिंग्यांवरील अत्याचारांचं सत्र त्यांनी आरंभलं आहे.दिवसाढवळ्या लूट, जाळपोळ, बलात्कार तेथे सरकार आणि लष्कराच्या आशीर्वादानेच सुरु आहे.

 म्यानमारमध्ये नवे सरकार आल्यावर रोहिंग्यांच्या स्थितीत काही फरक पडला का असे विचारताच रो ने सान ल्विन म्हणाले, आजिबात नाही. म्यानमारमध्ये अजूनही पूर्ण लोकशाही नाही, सगळे निर्णय लष्करच घेते, आजही लष्कराच्या आदेशाशिवाय तेथे काहीही करता येत नाही. म्यानमारमध्ये नेते किंवा लष्कराविरोधात ब्र काढला तरी तुरुंगवास होतो. तुम्ही सोशल मीडियावरसुदिधा काहीही लिहू शकत नाही. अशा स्थितीत लष्करशाहीतून देशाची मान कशी मोकळी होणार ? 

लष्कर आणि पोलिसी कारवाईला विरोध करणार्या रोहिंग्यांना दहशतवादी ठरवून त्यांना दडपणं सुरु आहे. अन्यायी सरकारी बळाला विरोध करणं म्हणजे दहशतवादी अशी त्यांची व्याख्या आहे. एकदा दहशतवादी असं नाव दिलं की कसंही मुस्कटदाबी करण्याचा परवाना त्यांना मिळतो, म्हणूनच रोहिंग्यांना दहशतवादाचं लेबल चिकटवलं जात आहे.

पाश्चिमात्य देशांचे म्यानमारमध्ये व्यापारी हितसंबंध आहेत, ते अनेक प्रकल्पांमध्ये हळूहळू गुंतवणूक करु लागले आहेत, तेथे लष्कराला मोठी शस्त्र सामुग्रीही विकली जाते. हे सगळं बंद झालं तर रोहिंग्यांचा प्रश्न लवकर सुटेल. म्यानमार सरकार या आर्थिक बळावर दडपशाही करत असल्यामुळे ते बळ कमू झाले तर काही वेळातच रोहिंग्यांचा प्रश्न सुटेल. सध्या संकटात सापडलेल्या रोहिंग्यांना मानवाधिकाराच्या नजरेने पाहात भारत व बांगलादेशाने मदत करण्याची नितांत गरज असल्याचे रो ने सान ल्विन यांनी लोकमतकडे वारंवार बोलून दाखवली.