शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

हिंदूंकडे केवळ २ पर्याय...बांगलादेशातील स्थितीवर कट्टरपंथीचं खळबळजनक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 16:17 IST

बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर देशात हिंदूवरील अत्याचारात वाढ झाली आहे. हिंदू समुहातील घरे, मंदिरांवर हल्ले होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 

ढाका - बांगलादेशमध्ये शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडल्यानंतर तिथल्या हिंदूंवर अत्याचार सुरू झाले आहेत. देशभरातील हिंदू समुदायांच्या घरांना, मंदिरांना टार्गेट करून हल्ले केले जातायेत. बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार होईल अशी भीती व्यक्त करतायेत. तर स्वत:ला इस्लामी विद्वान सांगणारे अबू नज्म फर्नांडो बिन अल इस्कंदरने बांगलादेशातून हिंदूंना पूर्णपणे संपवून टाका असं आवाहन केले आहे. त्यांनी इस्लामी कायद्याचा हवाला देत हिंदूकडे केवळ २ पर्याय आहेत ज्यात पहिला पर्याय मृत्यू आहे. 

पीएचडीचा अभ्यास करणारे अल इस्कंदरने ट्विटमध्ये म्हटलंय की, अहल-ए-सुन्ना इस्लामिक न्यायशास्त्राच्या चारपैकी तीन विचारानुसार, हिंदूंना फक्त दोनच पर्याय असायला हवेत, हे जाणून मला दिलासा मिळाला. प्रथम तलवार स्वीकारा आणि दुसरा इस्लामचा स्वीकार करा. हिंदूंनी आभार मानले पाहिजे की ते सध्या हनफीचा सामना करत आहेत, ना मलिकी,ना शफी किंवा ना हनबलीशी नाही.हे सर्व सुन्नी मुस्लिमांमधील मुस्लिम कायद्याच्या या चार प्रमुख विचारधारा आहेत असं विष त्यांनी ओकलं आहे. 

त्याचसोबत मुस्लिमांपासून वेगळे दिसण्यासाठी त्यांनी डोक्याच्या पुढील बाजूचे केस मुंडण केले पाहिजेत. मुस्लिमांपेक्षा कमी दर्जाचे असल्यामुळे गैर-मुस्लिमांना कसे अपमानास्पद वागणूक मिळावी, हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न करायला हवा असंही सौदी अरेबिया आणि कतारमधील प्रमुख सुन्नी हनबली इस्लामिक कायद्याचा हवाला देत अल इस्कंदरने म्हटलं आहे. 

दरम्यान, जे हिंदू मुस्लीम देशांमध्ये राहतात, त्यांच्यापेक्षा खाली राहणे स्वीकारतात त्यांना काही अडचण नाही. ते त्यांच्या धर्माचा शिर्क (मूर्तिपूजा, बहुदेववाद) सोडून इस्लामिक कायदे आणि नियमांनुसार जगावं. बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले हे हिंदू प्रोपेगेंडा आहे. बांगलादेश हिंदू प्रभाव आणि हस्तक्षेपापासून मुक्त होईल अशी आशा व्यक्त करत स्वत:ला उदारमतवादी दाखवण्याचा प्रयत्न अल इस्कंदर यांनी केला आहे.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशHinduहिंदूMuslimमुस्लीम