शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा सहावा विनाश मानवी हव्यासामुळे होणार?

By admin | Updated: June 2, 2017 00:44 IST

पृथ्वीवरील सजीवसृष्टी सहाव्यांदा मोठ्या प्रमाणावर विनष्ट होण्याचा धोका आहे आणि यावेळी हा धोका मानवाकडून निर्माण

लंडन : पृथ्वीवरील सजीवसृष्टी सहाव्यांदा मोठ्या प्रमाणावर विनष्ट होण्याचा धोका आहे आणि यावेळी हा धोका मानवाकडून निर्माण केला जात आहे, असा इशारा जगभरातील आघाडीच्या वैज्ञानिकांनी ‘नेचर’ या प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकातील आगामी लेखातून दिला आहे.गेल्या ५० हजार वर्षांत पृथ्वीवरील सजीवसृष्टी पाच वेळा मोठ्या प्रमाणावर विनष्ट झाली होती. अंतराळातून आलेली एखादी महाकाय अशनी पृथ्वीवर येऊन आदळणे किंवा ज्वालामुखींचे प्रचंड उद्रेक अशा विनाशकारी घटना त्यावेळी कारणीभूत ठरल्या होत्या. मात्र आता अशी कोणतीही एक महाविध्वंसक घटना न घडताही पूर्वीच्या पाच वेळच्याच दराने पृथ्वीवरील सस्तन प्राणी, जलचर व पक्ष्यांच्या प्रजाती विनष्ट होत असल्याचे नमूद करून हा इशारा देण्यात आला आहे.वैज्ञानिक लिहितात की, गेल्या काही शतकांत जमीन आणि सागरांवर होणारा मानवी कृतींच्या दुष्परिणामात न भूतो अशी वाढ झाली आहे. त्यामुळे सजीवसृष्टीचे वैविध्य रोडावले आहे. पूर्वी सजीवसृष्टी विनष्ट होण्याच्या काळात सजीवांच्या प्रजाती नष्ट होण्याचे जे प्रमाण जिवाश्म पुराव्यांवरून दिसून येते त्याहून अधिक वेगाने आता सजीवांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. सजीवांच्या विविध प्रजातींच्या नैसर्गिक अधिवासांचे रक्षण करून, आहारात बदल करून आणि निसर्ग संरक्षणाचे इतर अनेक उपाय योजून धोक्याच्या दिशेने सुरू असलेली ही वाटचाल थांबविली जाऊ शकते, असा आशेचा किरणही वैज्ञानिकांना वाटतो.सर्व सजीवांचे नैसर्गिक अधिवास शाबूत ठेवूनही सन २०६० पर्यंत अपेक्षित असलेल्या १० अब्ज मानवी लोकसंख्येस सकस आहार पुरविता येईल एवढी पृथ्वीची क्षमता नक्कीच आहे. मात्र, त्यासाठी मानवाने फक्त स्वत:चा व अल्पकालिक विचार न करता सुजाणपणे धोरणे राबविण्याची गरजही वैज्ञानिकांनी अधोरेखित केली. (वृत्तसंस्था)मानवाची सतत वाढत जाणारी लोकसंख्या आणि या वाढत्या लोकसंख्येच्या उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या गरजा भागविण्यासाठी नैसर्गिक साधनांचा ओरबाडणे म्हणता येईल एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारा वापर ही वैज्ञानिकांच्या मते या नव्या धोक्याची प्रमुख कारणे आहेत. गेल्या ५० वर्षांत पृथ्वीवरील मानवांची संख्या १३० टक्क्यांनी वाढली आहे व सन २०६० पर्यंत ती आणखी वाढून १० अब्जांवर जाण्याची शक्यता आहे.वाढती लोकसंख्या सर्वांच्याच मुळावरमानवांची ही वाढती संख्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे अन्य सजीवांच्या विनष्टतेस कारणीभूत ठरत आहे.प्रमाणाबाहेर होणारी शिकार, प्राण्यांची अवैध हत्या, प्राणी-पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, घुसखोर आणि शिकारी प्रजातींमध्ये वाढ होणे आणि मानवाच्या वाढत्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या अन्य समस्यांमुळे सस्तन प्राण्यांच्या २५ टक्के व पक्ष्यांच्या १३ टक्के प्रजातींसह सजीवांच्या हजारो प्रजातींना विनष्टतेचा धोका निर्माण झाला आहे.सावध करणारा पूर्वेतिहासयाच नियतकालिकातील आणखी एका लेखात वैज्ञानिकांनी यापूर्वी मानवी हव्यासापोटी अन्य सजीवसृष्टी नष्ट होण्याचे कालखंड कसे होऊन गेले याची गांभीर्याने दखल घ्यावी, असे चित्रही मांडले आहे.आॅस्ट्रेलिया खंडात (५० हजार वर्षांपूर्वी), उत्तर व दक्षिण अमेरिका खंडात (१०-११ हजार वर्षांपूर्वी) व युरोप खंडात (३ ते १२ हजार वर्षांपूर्वी) सजीवांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणावर नष्ट होण्याचे जे कालखंड होऊन गेले ते मानवाने प्रमाणाबाहेर केलेली शिकार व नैसर्गिक पर्यावरणात झालेले बदल या दोन्हींच्या एकत्रित परिणामांमुळे होते. ज्यांचे वजन ४५ किलोपेक्षा जास्त आहे अशा जमिनीवर वावरणाऱ्या सजीवांच्या निम्म्या प्रजाती व पक्ष्यांच्या १५ टक्के प्रजाती गेल्या तीन हजार वर्षांत विनष्ट झाल्या आहेत.