शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
5
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
6
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
7
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
8
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
9
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
10
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
11
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
12
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
13
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
14
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
15
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
16
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
17
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
18
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
19
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
20
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 

पृथ्वीची गती मंदावली? 2018मध्ये मोठे भूकंप होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 18:24 IST

पृथ्वीची परिवलनाची गती मंदावल्यामुळे 2018 साली मोठे भूकंप होण्याची शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देवैज्ञानिकांच्या अभ्यासात साधारणतः 25 ते 30 वर्षांनी पृथ्वीची गती मंदावण्यास सुरुवात होते असे दिसून आले. ही गती मंद होण्याची प्रक्रिया भूकंपांच्या अगदी थोडा काळ आधी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अशा प्रकारचे मंदावणे गेली पाच वर्षे सुरु आहे.

न्यू यॉर्क- पृथ्वीची परिवलनाची गती मंदावल्यामुळे 2018 साली मोठे भूकंप होण्याची शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.पृथ्वीच्या परिवलनाची गती वैज्ञानिक अत्यंत अचूकरित्या मोजतात. सन 1900 पासून वैज्ञानिकांनी 7.0 रिश्टर स्केलपेक्षा मोठया भूकंपांचे निरीक्षण केले आहे. प्रत्येक 32 वर्षांनी मोठ्या तीव्रतेचे भूकंप येत असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले आहे. त्याचबरोबर पृथ्वीच्या परिवलनाची गती ही या भूकंपांचे मूळ कारण असल्याची धक्कादायक माहितीही त्यांच्या लक्षात आली.

या वैज्ञानिकांच्या अभ्यासात साधारणतः 25 ते 30 वर्षांनी पृथ्वीची गती मंदावण्यास सुरुवात होते असे दिसून आले. ही गती मंद होण्याची प्रक्रिया भूकंपांच्या अगदी थोडा काळ आधी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अशा प्रकारचे मंदावणे गेली पाच वर्षे सुरु आहे. मागच्या वर्षी सर्वात जास्त तीव्र भूकंप झाल्याची नोंद करण्यात आली आहे. परिवलन गती मंद होण्याच्या आताच्या मालिकेचे 2017 हे सलग चौथे वर्ष होते. 2018 हे या मालिकेचे पाचवे वर्ष असल्यामुळे पुढच्या वर्षी अधिक भूकंप होतील असे मत तज्ज्ञांनी अभ्यासावरुन मांडले आहे.

पृथ्वीची गती मंदावल्याने भूकंप कसे होतात?पृथ्वीच्या गाभ्याचे अंतर्गत आणि बाह्य असे दोन भार असतात. बाह्य भागा हा द्रवरुप लोह आणि निकेल पासून बनलेला आहे तर अंतर्गाभा हा स्थायूरुप लोह व निकेलने बनलेला आहे. पृथ्वीच्या पृष्ठावरील कवचाच्या आत मॅंटल हा गाभा आणि कवचाच्या मध्ये असतो. हे मॅंटल थोडेसे द्रवरुप असते. भूगर्भशास्त्राच्या दृष्टीकोनातून दीर्घकालीन विचार करायचा झाला तर त्याला जाड द्रवरुप पदार्थ म्हणता येईल.

बिलहॅम आणि बेंडीक या तज्ज्ञांच्या मते प्रत्येक काही वर्षांनंतर मॅंटल त्याच्या अर्धवट द्रवरुपतेमुळे पृथ्वीच्या बाह्य कवचाला चिकटतो.त्यामुळे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र (मॅग्नेटिक फिल्ड) बदलते. त्याचा परिणाम पृथ्वीच्या परिवलनावर होतो आणि ही गती काही मिलीसेकंदांनी कमी होते व दिवसाच्या आकारातही बदल होतो. यासर्व प्रकारामुळे मॅंटलमध्ये चुंबकीय तरंग निर्माण होतात व त्यामुळेच भूकंप होतो. गेल्या चार वर्षांमध्ये पृथ्वीची गती कमी होत असल्यामुळे पुढली वर्षी भूकंपांची संख्या वाढतील असे या दोघा तज्ज्ञांचे मत आहे.

 

टॅग्स :Earthquakeभूकंप