शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीची गती मंदावली? 2018मध्ये मोठे भूकंप होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 18:24 IST

पृथ्वीची परिवलनाची गती मंदावल्यामुळे 2018 साली मोठे भूकंप होण्याची शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देवैज्ञानिकांच्या अभ्यासात साधारणतः 25 ते 30 वर्षांनी पृथ्वीची गती मंदावण्यास सुरुवात होते असे दिसून आले. ही गती मंद होण्याची प्रक्रिया भूकंपांच्या अगदी थोडा काळ आधी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अशा प्रकारचे मंदावणे गेली पाच वर्षे सुरु आहे.

न्यू यॉर्क- पृथ्वीची परिवलनाची गती मंदावल्यामुळे 2018 साली मोठे भूकंप होण्याची शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.पृथ्वीच्या परिवलनाची गती वैज्ञानिक अत्यंत अचूकरित्या मोजतात. सन 1900 पासून वैज्ञानिकांनी 7.0 रिश्टर स्केलपेक्षा मोठया भूकंपांचे निरीक्षण केले आहे. प्रत्येक 32 वर्षांनी मोठ्या तीव्रतेचे भूकंप येत असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले आहे. त्याचबरोबर पृथ्वीच्या परिवलनाची गती ही या भूकंपांचे मूळ कारण असल्याची धक्कादायक माहितीही त्यांच्या लक्षात आली.

या वैज्ञानिकांच्या अभ्यासात साधारणतः 25 ते 30 वर्षांनी पृथ्वीची गती मंदावण्यास सुरुवात होते असे दिसून आले. ही गती मंद होण्याची प्रक्रिया भूकंपांच्या अगदी थोडा काळ आधी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अशा प्रकारचे मंदावणे गेली पाच वर्षे सुरु आहे. मागच्या वर्षी सर्वात जास्त तीव्र भूकंप झाल्याची नोंद करण्यात आली आहे. परिवलन गती मंद होण्याच्या आताच्या मालिकेचे 2017 हे सलग चौथे वर्ष होते. 2018 हे या मालिकेचे पाचवे वर्ष असल्यामुळे पुढच्या वर्षी अधिक भूकंप होतील असे मत तज्ज्ञांनी अभ्यासावरुन मांडले आहे.

पृथ्वीची गती मंदावल्याने भूकंप कसे होतात?पृथ्वीच्या गाभ्याचे अंतर्गत आणि बाह्य असे दोन भार असतात. बाह्य भागा हा द्रवरुप लोह आणि निकेल पासून बनलेला आहे तर अंतर्गाभा हा स्थायूरुप लोह व निकेलने बनलेला आहे. पृथ्वीच्या पृष्ठावरील कवचाच्या आत मॅंटल हा गाभा आणि कवचाच्या मध्ये असतो. हे मॅंटल थोडेसे द्रवरुप असते. भूगर्भशास्त्राच्या दृष्टीकोनातून दीर्घकालीन विचार करायचा झाला तर त्याला जाड द्रवरुप पदार्थ म्हणता येईल.

बिलहॅम आणि बेंडीक या तज्ज्ञांच्या मते प्रत्येक काही वर्षांनंतर मॅंटल त्याच्या अर्धवट द्रवरुपतेमुळे पृथ्वीच्या बाह्य कवचाला चिकटतो.त्यामुळे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र (मॅग्नेटिक फिल्ड) बदलते. त्याचा परिणाम पृथ्वीच्या परिवलनावर होतो आणि ही गती काही मिलीसेकंदांनी कमी होते व दिवसाच्या आकारातही बदल होतो. यासर्व प्रकारामुळे मॅंटलमध्ये चुंबकीय तरंग निर्माण होतात व त्यामुळेच भूकंप होतो. गेल्या चार वर्षांमध्ये पृथ्वीची गती कमी होत असल्यामुळे पुढली वर्षी भूकंपांची संख्या वाढतील असे या दोघा तज्ज्ञांचे मत आहे.

 

टॅग्स :Earthquakeभूकंप