शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

भूकंपाने भारत उत्तरेकडे सरकला

By admin | Updated: April 29, 2015 02:21 IST

शनिवारी नेपाळला बसलेल्या ७.९ मॅग्निट्यूडच्या भूकंपात भारतालाही जबर धक्का बसला असून, काही क्षणांत भारताचा भूभाग १० फूट उत्तरेकडे सरकला असल्याचे अमेरिकन शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

शास्त्रज्ञांचा दावा : जमीन दहा फूट वर ढकलली गेलीवॉशिंग्टन : शनिवारी नेपाळला बसलेल्या ७.९ मॅग्निट्यूडच्या भूकंपात भारतालाही जबर धक्का बसला असून, काही क्षणांत भारताचा भूभाग १० फूट उत्तरेकडे सरकला असल्याचे अमेरिकन शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. शनिवारचा भूकंप झाल्यानंतर काही क्षणांत काठमांडू ते पोखरा यासह १ हजार ते २ हजार चौ. मैलाचा भूभाग एका दिशेने सरकला व हिमालयासह हिमालयाच्या रुंदीचा तेवढाच भूभाग दुसऱ्या दिशेने सरकला, असे कोलंबिया विद्यापीठाच्या लॅमाँट - डोहर्थी अर्थ आॅब्झर्वेटरीचे संशोधक सहायक प्रोफेसर कोलीन स्टार्क यांनी म्हटले आहे. क्रस्ट या नावाने ओळखला जाणारा हा खडक (लिथोस्पिअर) बिहार ते भरतपूर, हेतुदा व जनकपूर हा भाग नेपाळच्या दिशेला सरकला, असे स्टार्क यांनी सांगितले. उत्तर भारत नेपाळजवळ सरकत असून, ही प्रक्रिया कायम सुरू आहे, असेही स्टार्क म्हणाले. पृथ्वीचे प्रतल (प्लेट्स) कसे सरकत आहेत याकडे भूगर्भ शास्त्रज्ञांचे लक्ष आहे. संपूर्ण भारतीय उपखंड दरवर्षी १.८ इंच गतीने नेपाळ व तिबेटखाली सरकत आहे, असे स्टार्क यांनी सीएनएन वेबसाईटवर लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. दहा लाख वर्षांपूर्वी अशाच प्रक्रियेतून उत्तुंग अशा हिमालयाचा जन्म झाला असून, पाकिस्तान ते म्यानमार हा प्रदेश भूकंपप्रवण बनला आहे, असे स्टार्क यांनी म्हटले आहे. शनिवारचा भूकंप अनपेक्षित वा अकल्पित नव्हता. १० जणांचा बळी घेणाऱ्या १९३४च्या बिहार भूकंपानंतर भारतीय प्रतल (टेक्टॉनिक प्लेट) नेपाळच्या प्रतलात १२ फूट घुसला आहे. त्यामुळे निर्माण होणारी ऊर्जा बाहेर पडली इतकेच. हिमालय कोपला!मदतीसाठी कार्यकर्ते दुर्गम भागात पोहोचण्यासाठी धडपडत असून, या भागातील मृतांची संख्या कळल्यानंतर मृतांची संख्या १० हजारांपेक्षा जास्त होईल, असे नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी म्हटले आहे. भूकंपाचा तडाखा ८० लाख लोकांना बसल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. एव्हरेस्टची उंची कायम एव्हरेस्ट शिखर थेट फॉल्ट लाइनवर नसल्याने एव्हरेस्टवर फार परिणाम झाला नाही. कोसळलेल्या दरडीने शिखरावरील बर्फाचा थर खाली आणला असता तर कदाचित एव्हरेस्टची उंची कमी झाली असती. काठमांडू दक्षिणेकडे सरकलेच्नेपाळला बसलेल्या भीषण भूकंपाच्या धक्क्याने नेपाळची राजधानी असणाऱ्या काठमांडू शहराची जमीन सरकली असून, काठमांडू शहर ३ मीटर दक्षिणेकडे सरकले आहे; पण लगतच्या माऊंट एव्हरेस्टची उंची मात्र कायम असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. च्हा भूकंप हिमालयातील दोन प्रतल एकत्र येण्याच्या (थ्रस्ट फॉल्ट) जागी झाला असावा. भारतीय उपखंड व युरेशिया यांचे प्रतल हिमालयातील थ्रस्ट फॉल्टवर वेगळे होतात. च्हा थ्रस्ट फॉल्ट १० अंश उत्तरेकडे सरकला असून, यामुळे काठमांडू शहर ३ मीटरने दक्षिणेकडे सरकले आहे. हा फॉल्ट दोन प्रतलांमध्ये आहे. यातील एक प्रतल भारताचा असून, दुसरा युरोपचा आहे. भारताचा प्रतल युरोपच्या प्रतलाला उत्तरेकडे ढकलत आहे.