शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कमकुवत समजू नका, पाकच्या नवनियुक्त परराष्ट्रमंत्र्यांचा भारताला अप्रत्यक्ष इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 13:14 IST

पाकिस्तानचे नवनियुक्त परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ यांनी पदभार संभाळल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकारपरिषदेत भारत, अमेरिका आणि अफगाणिस्तान या देशांवर गंभीर आरोप केले आहेत.

ठळक मुद्देपाकिस्तानच्या हिताला धक्का पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कारस्थान रचले जात आहे. पाकिस्तानने शांतता प्रस्थापित करण्यासाठी जी पावले उचलली त्याला या दोन्ही देशांनी अजिबात सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.

लाहोर, दि. 7 - पाकिस्तानचे नवनियुक्त परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ यांनी पदभार संभाळल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकारपरिषदेत भारत, अमेरिका आणि अफगाणिस्तान या देशांवर गंभीर आरोप केले आहेत.  इंडस वॉटर ट्रीटी म्हणजेच सिंधू पाणी वाटप करारातंर्गत पाकिस्तानच्या हिताला धक्का पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कारस्थान रचले जात असून त्यात भारत आणि अमेरिका सहभागी आहेत असा गंभीर आरोप ख्वाजा असिफ यांनी केला आहे. 

अफगाणिस्तानात पाकिस्तान विरोधात कट रचले जात असून, त्याला भारताची साथ आहे. पाकिस्तानने शांतता प्रस्थापित करण्यासाठी जी पावले उचलली त्याला या दोन्ही देशांनी अजिबात सकारात्मक प्रतिसाद दिला नाही असा उलटा आरोप ख्वाजा असिफ यांनी केला. पाकिस्तानला शांतता आणि शेजारी देशांबरोबर चांगले संबंध हवे आहेत पण कोणी याला पाकिस्तानचा कमकुवतपणा समजू नये अशा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी भारताला दिला. 

सिंधू पाणी वाटप करारासंबंधीच्या कटात भारत आणि अमेरिका कशा प्रकारे सहभागी आहेत ते ख्वाजा असिफ यांनी सांगितले नाही. करारातील जे नियम आहेत त्यासंबंधी आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला अंधारात ठेवले असे असिफ यांचे म्हणणे आहे.

काय आहे करार– भारत- पाकमध्ये वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीनुसार 19 सप्टेंबर 1960 रोजी कराचीमध्ये इंडस वॉटर ट्रीटी अर्थात सिंधू पाणी वाटप करार झाला होता.– या करारावर भारताचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जनरल अयूब खान यांच्या स्वाक्षरी आहेत.– करारानुसार, भारत पाकिस्तानला सिंधु, झेलम, चिनाब, सतलज, व्यास आणि रावी नदीचे पाणी देतो.– या नद्यांचे 80 टक्क्यांहून जास्त पाणी हे पाकिस्तानला मिळते. 

पाकिस्तानवर होईल परिणाम…– भारताने पाकिस्तानचे पाणी बंद केल्यास पाण्यावाचून शेती आणि अन्नधान्य उत्पादनावरही विपरीत परिणाम झाल्यावर पाकिस्तान ताळ्यावर येईल.– कारण, शेती ही पावसाच्या पाण्यावर नव्हे, तर नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे.– यामुळेच तर पाकिस्तानचा भारताच्या बगलियार आणि किशनगंगा पॉवर प्रोजेक्ट्सला विरोध करत आहे. यासाठी भारतावर आंतराष्ट्रीय पातळीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.– भारताचे हे दोन्ही प्रोजेक्ट्स तयार झाल्यास पा‍‍किस्तानच्या तोंडचे पाणी पळेल.