शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
4
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
5
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
6
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
7
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
8
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
9
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
10
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
11
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
12
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
13
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
14
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
15
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
16
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
17
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
18
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
19
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
20
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले

कमकुवत समजू नका, पाकच्या नवनियुक्त परराष्ट्रमंत्र्यांचा भारताला अप्रत्यक्ष इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 13:14 IST

पाकिस्तानचे नवनियुक्त परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ यांनी पदभार संभाळल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकारपरिषदेत भारत, अमेरिका आणि अफगाणिस्तान या देशांवर गंभीर आरोप केले आहेत.

ठळक मुद्देपाकिस्तानच्या हिताला धक्का पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कारस्थान रचले जात आहे. पाकिस्तानने शांतता प्रस्थापित करण्यासाठी जी पावले उचलली त्याला या दोन्ही देशांनी अजिबात सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.

लाहोर, दि. 7 - पाकिस्तानचे नवनियुक्त परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ यांनी पदभार संभाळल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकारपरिषदेत भारत, अमेरिका आणि अफगाणिस्तान या देशांवर गंभीर आरोप केले आहेत.  इंडस वॉटर ट्रीटी म्हणजेच सिंधू पाणी वाटप करारातंर्गत पाकिस्तानच्या हिताला धक्का पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कारस्थान रचले जात असून त्यात भारत आणि अमेरिका सहभागी आहेत असा गंभीर आरोप ख्वाजा असिफ यांनी केला आहे. 

अफगाणिस्तानात पाकिस्तान विरोधात कट रचले जात असून, त्याला भारताची साथ आहे. पाकिस्तानने शांतता प्रस्थापित करण्यासाठी जी पावले उचलली त्याला या दोन्ही देशांनी अजिबात सकारात्मक प्रतिसाद दिला नाही असा उलटा आरोप ख्वाजा असिफ यांनी केला. पाकिस्तानला शांतता आणि शेजारी देशांबरोबर चांगले संबंध हवे आहेत पण कोणी याला पाकिस्तानचा कमकुवतपणा समजू नये अशा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी भारताला दिला. 

सिंधू पाणी वाटप करारासंबंधीच्या कटात भारत आणि अमेरिका कशा प्रकारे सहभागी आहेत ते ख्वाजा असिफ यांनी सांगितले नाही. करारातील जे नियम आहेत त्यासंबंधी आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला अंधारात ठेवले असे असिफ यांचे म्हणणे आहे.

काय आहे करार– भारत- पाकमध्ये वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीनुसार 19 सप्टेंबर 1960 रोजी कराचीमध्ये इंडस वॉटर ट्रीटी अर्थात सिंधू पाणी वाटप करार झाला होता.– या करारावर भारताचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जनरल अयूब खान यांच्या स्वाक्षरी आहेत.– करारानुसार, भारत पाकिस्तानला सिंधु, झेलम, चिनाब, सतलज, व्यास आणि रावी नदीचे पाणी देतो.– या नद्यांचे 80 टक्क्यांहून जास्त पाणी हे पाकिस्तानला मिळते. 

पाकिस्तानवर होईल परिणाम…– भारताने पाकिस्तानचे पाणी बंद केल्यास पाण्यावाचून शेती आणि अन्नधान्य उत्पादनावरही विपरीत परिणाम झाल्यावर पाकिस्तान ताळ्यावर येईल.– कारण, शेती ही पावसाच्या पाण्यावर नव्हे, तर नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे.– यामुळेच तर पाकिस्तानचा भारताच्या बगलियार आणि किशनगंगा पॉवर प्रोजेक्ट्सला विरोध करत आहे. यासाठी भारतावर आंतराष्ट्रीय पातळीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.– भारताचे हे दोन्ही प्रोजेक्ट्स तयार झाल्यास पा‍‍किस्तानच्या तोंडचे पाणी पळेल.