शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
5
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
6
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
7
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
8
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
9
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
10
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
11
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
12
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
13
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
14
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
15
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
16
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
17
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
18
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
19
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
20
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 

कमकुवत समजू नका, पाकच्या नवनियुक्त परराष्ट्रमंत्र्यांचा भारताला अप्रत्यक्ष इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 13:14 IST

पाकिस्तानचे नवनियुक्त परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ यांनी पदभार संभाळल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकारपरिषदेत भारत, अमेरिका आणि अफगाणिस्तान या देशांवर गंभीर आरोप केले आहेत.

ठळक मुद्देपाकिस्तानच्या हिताला धक्का पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कारस्थान रचले जात आहे. पाकिस्तानने शांतता प्रस्थापित करण्यासाठी जी पावले उचलली त्याला या दोन्ही देशांनी अजिबात सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.

लाहोर, दि. 7 - पाकिस्तानचे नवनियुक्त परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ यांनी पदभार संभाळल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकारपरिषदेत भारत, अमेरिका आणि अफगाणिस्तान या देशांवर गंभीर आरोप केले आहेत.  इंडस वॉटर ट्रीटी म्हणजेच सिंधू पाणी वाटप करारातंर्गत पाकिस्तानच्या हिताला धक्का पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कारस्थान रचले जात असून त्यात भारत आणि अमेरिका सहभागी आहेत असा गंभीर आरोप ख्वाजा असिफ यांनी केला आहे. 

अफगाणिस्तानात पाकिस्तान विरोधात कट रचले जात असून, त्याला भारताची साथ आहे. पाकिस्तानने शांतता प्रस्थापित करण्यासाठी जी पावले उचलली त्याला या दोन्ही देशांनी अजिबात सकारात्मक प्रतिसाद दिला नाही असा उलटा आरोप ख्वाजा असिफ यांनी केला. पाकिस्तानला शांतता आणि शेजारी देशांबरोबर चांगले संबंध हवे आहेत पण कोणी याला पाकिस्तानचा कमकुवतपणा समजू नये अशा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी भारताला दिला. 

सिंधू पाणी वाटप करारासंबंधीच्या कटात भारत आणि अमेरिका कशा प्रकारे सहभागी आहेत ते ख्वाजा असिफ यांनी सांगितले नाही. करारातील जे नियम आहेत त्यासंबंधी आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला अंधारात ठेवले असे असिफ यांचे म्हणणे आहे.

काय आहे करार– भारत- पाकमध्ये वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीनुसार 19 सप्टेंबर 1960 रोजी कराचीमध्ये इंडस वॉटर ट्रीटी अर्थात सिंधू पाणी वाटप करार झाला होता.– या करारावर भारताचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जनरल अयूब खान यांच्या स्वाक्षरी आहेत.– करारानुसार, भारत पाकिस्तानला सिंधु, झेलम, चिनाब, सतलज, व्यास आणि रावी नदीचे पाणी देतो.– या नद्यांचे 80 टक्क्यांहून जास्त पाणी हे पाकिस्तानला मिळते. 

पाकिस्तानवर होईल परिणाम…– भारताने पाकिस्तानचे पाणी बंद केल्यास पाण्यावाचून शेती आणि अन्नधान्य उत्पादनावरही विपरीत परिणाम झाल्यावर पाकिस्तान ताळ्यावर येईल.– कारण, शेती ही पावसाच्या पाण्यावर नव्हे, तर नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे.– यामुळेच तर पाकिस्तानचा भारताच्या बगलियार आणि किशनगंगा पॉवर प्रोजेक्ट्सला विरोध करत आहे. यासाठी भारतावर आंतराष्ट्रीय पातळीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.– भारताचे हे दोन्ही प्रोजेक्ट्स तयार झाल्यास पा‍‍किस्तानच्या तोंडचे पाणी पळेल.