शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

भारताविरुद्ध गरळ ओकू नका : शरीफ

By admin | Updated: December 20, 2015 03:03 IST

भारताशी नुकत्याच सुरू झालेल्या शांतता चर्चेवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी भारताविरुद्ध कोणतीही वक्तव्ये करू नका, असा सल्ला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ

इस्लामाबाद : भारताशी नुकत्याच सुरू झालेल्या शांतता चर्चेवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी भारताविरुद्ध कोणतीही वक्तव्ये करू नका, असा सल्ला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपले मंत्री आणि सहकाऱ्यांना दिला आहे.शरीफ यांच्या एका विश्वासू सहकाऱ्याचा हवाला देऊन ‘द नेशन’ या वृत्तपत्रात हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ‘दफन केलेले मुद्दे उकरून काढणारी वक्तव्ये करण्यापेक्षा शांतता चर्चेला प्रोत्साहन देणारी’ वक्तव्ये करा. शांततेस आणखी चालना मिळावी यासाठी प्रोत्साहन द्या,’ असे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. शांतता प्रक्रियेला नुकसान होईल, अशी कोणतीही वक्तव्ये करण्यापासून मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांना रोखण्यात आल्याचे हे वृत्त म्हणते.भारताशी संबंध सुधारण्याबाबत नवाज शरीफ आशावादी असून, भारत-पाक संबंध सुधारल्यास त्याचा फायदा संपूर्ण दक्षिण आशियाला होईल, असे शरीफ यांना वाटते. भारतातून येत असलेल्या काही वक्तव्यांवर शरीफ नाराज आहेत; पण हे भारत सरकारचे धोरण नसावे, असे शरीफ यांना वाटते. उभय पक्ष चर्चेसाठी एकत्र आल्यानंतर काश्मीर, दहशतवाद आणि व्यापार या मुद्द्यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची शरीफ यांची इच्छा आहे, असे या वृत्तात म्हटले. (वृत्तसंस्था)पाकचे लष्करी नेतृत्वही राजी?अन्य एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने या वृत्तात पुढे म्हटले आहे की, भारतासोबतच्या शांतता चर्चेबाबत शरीफ आणि लष्करी नेतृत्व यांचे एकमत झाले आहे; महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर समझोता करू नये, असे या दोघांनाही वाटते. शरीफ आणि लष्करी अधिकारी यांच्यात एकमत झाले असेल तर ही सकारात्मक घडामोड आहे, असे विश्लेषकांना वाटते. पुढील महिन्यात बैठकभारताच्या विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी नुकताच पाकिस्तान दौरा केला होता. त्यात उभय देशांतील सर्वंकष चर्चा सुरू करण्यास सहमती झाली होती. चर्चेचा आराखडा तयार करण्यासाठी दोन्ही देशांच्या विदेश सचिवांची पुढील महिन्यात बैठक होणार आहे.संवाद आवश्यकच - मसूद खानपाकिस्तानशी संवाद साधण्याबाबत भारत गंभीर आहे, त्यामुळे संवादामुळेच दोन्ही देशांना पुढे जाता येईल असे विधान पाकिस्तानचे चीनमधील माजी राजदूत मसूद खान यांनी केले आहे. पाकिस्तानने नेहमीच संवादाचा आग्रह धरला होता आणि भारताने घेतलेली आताची भूमिका म्हणजे आमचा नैतिक विजयच आहे असे मतही त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले. भारताशी चर्चा सुरू करण्यासाठी पाकने वारंवार प्रयत्न केले हे दोन अण्वस्त्रसंपन्न देशांत संवादाचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे. सध्या दोन्ही देशांनी घेतलेली भूमिका हा सकारात्मक संकेत आहे. पुढील महिन्यामध्ये आगामी प्रक्रिया ठरविण्यासाठी दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव भेटतील, असेही खान यांनी सांगितले. विश्वासाची भावना वाढीस लागण्यासाठी दोन्ही देशांच्या लोकांंमध्ये संपर्क, संवाद वाढण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.मोदी - शरीफ भेट जानेवारीत?स्वित्झर्लंडमधील दावोस-क्लोस्टर्स येथे जानेवारीत ४६वी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम होणार असून, या फोरमसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाज शरिफ उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या दोघांची तेथेही भेट होण्याची शक्यता आहे.