शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सिंधूचे पाणी अन्यत्र वळविणे हे युद्धसदृशच, पाकचा कांगावा; भारतीयांचा विमान प्रवास महागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 07:30 IST

वाघा सीमा तत्काळ बंद करण्याचा व या मार्गाने वाहतूक बंद करण्यात आली आहे

इस्लामाबाद : सिंधू करारानुसार मिळणारे पाणी अन्यत्र वळविण्याचा भारताचा कोणताही प्रयत्न हा युद्धसदृश कृती मानला जाईल, असा कांगावा  पाकिस्तानने गुरुवारी केला. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या निर्णयांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारताशी व्यापार, सिमला करारासह अन्य द्विपक्षीय करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तसेच भारताच्या विमानांना पाकिस्तानी हवाई हद्द बंद केली आहे.

पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर हे निर्णय जाहीर करण्यात आले. वाघा सीमा तत्काळ बंद करण्याचा व या मार्गाने वाहतूक बंद करण्यात आली आहे. जे भारतीय वैध मार्गाने पाकिस्तानात आले आहेत, त्यांनी ३० एप्रिलपूर्वी परत जावे असा आदेश देण्यात आल्याचे पाकिस्तानने एका निवेदनात म्हटले आहे.

पुढे काय?अमेरिका, ब्रिटन, युरोप, मध्य पूर्वेकडील देशांचा प्रवास महागणारदिल्लीसह उत्तर भारतातील शहरांमधून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांना आता नियोजित ठिकाणी पोहोचण्यास अधिक वेळ लागणार आहे. परिणाम म्हणून तिकिटांचे दरही वाढण्याची शक्यता आहे. उत्तर अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि मध्य पूर्वेकडील देशांमध्ये जाताना आता विमानांना दुसऱ्या मार्गाने अधिक अंतर प्रवास करून जावे लागणार आहे.

एअर इंडिया आणि इंडिगो या कंपन्यांनी सांगितले की, त्यांच्या काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला आहे. एअर इंडियाने स्पष्ट केले की उड्डाणे आता पर्यायी मार्गाने जाणार आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेस आणि स्पाईसजेट कंपन्याना अरबी समुद्रावरून जाणारा तसेच अधिक दूर असलेल्या पर्यायी मार्गाचा वापरकरावा लागेल. त्यामुळे खर्चही वाढणार आहे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला