शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

सिंधूचे पाणी अन्यत्र वळविणे हे युद्धसदृशच, पाकचा कांगावा; भारतीयांचा विमान प्रवास महागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 07:30 IST

वाघा सीमा तत्काळ बंद करण्याचा व या मार्गाने वाहतूक बंद करण्यात आली आहे

इस्लामाबाद : सिंधू करारानुसार मिळणारे पाणी अन्यत्र वळविण्याचा भारताचा कोणताही प्रयत्न हा युद्धसदृश कृती मानला जाईल, असा कांगावा  पाकिस्तानने गुरुवारी केला. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या निर्णयांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारताशी व्यापार, सिमला करारासह अन्य द्विपक्षीय करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तसेच भारताच्या विमानांना पाकिस्तानी हवाई हद्द बंद केली आहे.

पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर हे निर्णय जाहीर करण्यात आले. वाघा सीमा तत्काळ बंद करण्याचा व या मार्गाने वाहतूक बंद करण्यात आली आहे. जे भारतीय वैध मार्गाने पाकिस्तानात आले आहेत, त्यांनी ३० एप्रिलपूर्वी परत जावे असा आदेश देण्यात आल्याचे पाकिस्तानने एका निवेदनात म्हटले आहे.

पुढे काय?अमेरिका, ब्रिटन, युरोप, मध्य पूर्वेकडील देशांचा प्रवास महागणारदिल्लीसह उत्तर भारतातील शहरांमधून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांना आता नियोजित ठिकाणी पोहोचण्यास अधिक वेळ लागणार आहे. परिणाम म्हणून तिकिटांचे दरही वाढण्याची शक्यता आहे. उत्तर अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि मध्य पूर्वेकडील देशांमध्ये जाताना आता विमानांना दुसऱ्या मार्गाने अधिक अंतर प्रवास करून जावे लागणार आहे.

एअर इंडिया आणि इंडिगो या कंपन्यांनी सांगितले की, त्यांच्या काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला आहे. एअर इंडियाने स्पष्ट केले की उड्डाणे आता पर्यायी मार्गाने जाणार आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेस आणि स्पाईसजेट कंपन्याना अरबी समुद्रावरून जाणारा तसेच अधिक दूर असलेल्या पर्यायी मार्गाचा वापरकरावा लागेल. त्यामुळे खर्चही वाढणार आहे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला