शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
3
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
5
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
6
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
7
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
8
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...
9
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
10
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
11
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
12
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
13
रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्...
14
कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
15
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
16
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
17
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
18
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
19
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
20
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता

भारत पाकमधल्या धरमशालातल्या वर्ल्ड कप सामन्यावर धर्मसंकट

By admin | Updated: March 1, 2016 13:28 IST

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री विरभद्र सिंग यांनीच सुरक्षा व्यवस्थेचं कारण देत हा सामना रद्द करण्याची मागणी केली आहे

ऑनलाइन लोकमत
सिमला, दि. 3 - टी - 20 वर्ल्ड कपमधला भारत पाकिस्तान यांच्यातला सामना हिमाचल प्रदेशमधल्या धरमशाला येथे 19 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. मात्र, खुद्द हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री विरभद्र सिंग यांनीच सुरक्षा व्यवस्थेचं कारण देत हा सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. भारत व पाकिस्तान या पारंपरिक शत्रूंमधलं मैदानावरचं युद्ध पाहण्याची हौस प्रत्येकाला असते, परंतु पाकिस्तानी खेळाडुंना भारतात खेळू देण्यावरून भारतीय जनमत प्रतिकूल होत असल्याचं दिसत असून आता हिमाचल प्रदेशच्या सरकारनेही सुरक्षा पुरवण्यास असमर्थता दर्शवली आहे.
याआधी केवळ शिवसेनेने भारत पाकिस्तान सामने होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली होती. 1991 वानखेडेचं पिच खोदून शिवसैनिकांनी सामना रद्द करण्यास भाग पाडलं. त्यानंतर याचपद्धतीने शिवसेनेने 1998 मध्ये मुंबईतली कसोटी, 1999मध्ये दिल्लीतला सामना, 2003 मध्ये आग्रा येथला सामना होऊ दिला नव्हता.
आता हिमाचल प्रदेशमध्येही भारत पाक सामना सुरक्षितरीत्या होऊ शकणार नाही अशी भीती मुख्यमंत्र्यांना वाटत आहे. यासंदर्भात त्यांनी बीसीसीआयला पत्र पाठवून हा सामना रद्द करण्याची व अन्यत्र भरवण्याची विनंती केली आहे.
मात्र, बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी एक वर्ष आधी या सगळ्या सामन्यांचं नियोजन झालेलं असल्यामुळे ऐनवेळी असा बदल करता येणार नाही अशी भूमिका मांडली आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्रीच सामना सुरक्षित होऊ शकत नाही, असं सांगत आहेत, तर दुसरीकडे ऐनवेळा ठिकाण बदलणं शक्य नसल्याचं बीसीसीआय म्हणत आहे. यामुळे धरमशाला येथील भारत पाक सामन्यावर धर्मसंकट आलं आहे हे मात्र खरं.