शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

भारत पाकमधल्या धरमशालातल्या वर्ल्ड कप सामन्यावर धर्मसंकट

By admin | Updated: March 1, 2016 13:28 IST

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री विरभद्र सिंग यांनीच सुरक्षा व्यवस्थेचं कारण देत हा सामना रद्द करण्याची मागणी केली आहे

ऑनलाइन लोकमत
सिमला, दि. 3 - टी - 20 वर्ल्ड कपमधला भारत पाकिस्तान यांच्यातला सामना हिमाचल प्रदेशमधल्या धरमशाला येथे 19 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. मात्र, खुद्द हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री विरभद्र सिंग यांनीच सुरक्षा व्यवस्थेचं कारण देत हा सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. भारत व पाकिस्तान या पारंपरिक शत्रूंमधलं मैदानावरचं युद्ध पाहण्याची हौस प्रत्येकाला असते, परंतु पाकिस्तानी खेळाडुंना भारतात खेळू देण्यावरून भारतीय जनमत प्रतिकूल होत असल्याचं दिसत असून आता हिमाचल प्रदेशच्या सरकारनेही सुरक्षा पुरवण्यास असमर्थता दर्शवली आहे.
याआधी केवळ शिवसेनेने भारत पाकिस्तान सामने होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली होती. 1991 वानखेडेचं पिच खोदून शिवसैनिकांनी सामना रद्द करण्यास भाग पाडलं. त्यानंतर याचपद्धतीने शिवसेनेने 1998 मध्ये मुंबईतली कसोटी, 1999मध्ये दिल्लीतला सामना, 2003 मध्ये आग्रा येथला सामना होऊ दिला नव्हता.
आता हिमाचल प्रदेशमध्येही भारत पाक सामना सुरक्षितरीत्या होऊ शकणार नाही अशी भीती मुख्यमंत्र्यांना वाटत आहे. यासंदर्भात त्यांनी बीसीसीआयला पत्र पाठवून हा सामना रद्द करण्याची व अन्यत्र भरवण्याची विनंती केली आहे.
मात्र, बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी एक वर्ष आधी या सगळ्या सामन्यांचं नियोजन झालेलं असल्यामुळे ऐनवेळी असा बदल करता येणार नाही अशी भूमिका मांडली आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्रीच सामना सुरक्षित होऊ शकत नाही, असं सांगत आहेत, तर दुसरीकडे ऐनवेळा ठिकाण बदलणं शक्य नसल्याचं बीसीसीआय म्हणत आहे. यामुळे धरमशाला येथील भारत पाक सामन्यावर धर्मसंकट आलं आहे हे मात्र खरं.