शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

डोकलाम मुद्द्यावर तडजोड नाही, अन्यथा बळाचा वापर : चीनचा भारताला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:18 IST

डोकलाममधील तणाव कमी करण्यासाठी चीन कोणतीही तडजोड करणार नाही. डोकलाममधून भारतीय सैन्य मागे न हटल्यास आम्हाला बळाचा वापर करावा लागेल आणि त्याच्या परिणामासाठी भारताने तयार राहावे, असा इशारा या तज्ज्ञांनी दिला आहे.

बीजिंग : डोकलाममधील तणाव कमी करण्यासाठी चीन कोणतीही तडजोड करणार नाही. डोकलाममधून भारतीय सैन्य मागे न हटल्यास आम्हाला बळाचा वापर करावा लागेल आणि त्याच्या परिणामासाठी भारताने तयार राहावे, असा इशारा या तज्ज्ञांनी दिला आहे. भारतीय पत्रकारांनी नुकताच चीन दौरा केला आहे. या पत्रकारांजवळ पीएलएच्या विश्लेषकांनी हे मत व्यक्त केले आहे. दुसरीकडे डोकलाम हा आमचाच भाग आहे, असे म्हणत भूतानने चीनचा दावा फेटाळून लावला आहे.डोकलाम आमचा भाग नाही, असे भूतानने मान्य केले असल्याचा दावा चीनतर्फे बुधवारी करण्यात आला होता. पण तो भूतानने फेटाळून लावला. डोकलाममध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने सुरू केलेले रस्त्याचे काम भारतीय सैन्याने रोखल्यानंतर संघर्षाची ठिणगी पडली आहे.डोकलाम भागात भारताच्या ज्या हालचाली आहेत त्यामुळे चीन सरकार आणि येथील नागरिक नाराज आहेत, असे तेथील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वरिष्ठ कर्नल झोउ बो म्हणाले की, चीनने अद्याप ‘आक्रमण’ शब्दाचा उपयोग केला नाही. आम्ही ‘अतिक्रमण’ शब्दाचा उपयोग केला आहे. हा चीनचा चांगुलपणा आहे. त्यामुळे भारताने विनाअट येथून मागे हटावे.चीनची पावले चिथावणीखोरचीनने डोकलाममध्ये चिथावणीखोर पावले उचलली आहेत. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला आहे, असे मत अमेरिकेतील काँग्रेसचे संसद सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी व्यक्त केले आहे. (वृत्तसंस्था)भारत-चीनने नवाकरार करावा१८९०च्या ग्रेट ब्रिटन - चीन कराराऐवजी आता भारत व चीनने सिक्किम क्षेत्रावर नवा करार करावा, असे मत वरिष्ठ कर्नल झोउ शियाओझोउ यांनी व्यक्त केले आहे. भारत आणि चीन यांच्यात सीमेच्या पूर्व, मध्य आणि पश्चिम भागात विवाद आहेत. पूर्वी करार झाला तेव्हा पीपल्स रिपब्लिकन चायना (पीआरसी)नव्हते. भारतही १९४७मध्ये स्वतंत्र झाला. त्यामुळे याबाबत नव्याने करार करावा, असे ते म्हणाले.डोकलामजवळील गावातील लोकांना अन्यत्र जाण्याच्या सूचनाभारतीय सैन्याने डोकलाम येथून ३५ किलोमीटरवर असलेल्या नाथांग गावातून गावकºयांना बाहेर जायला सांगितल्याचे वृत्त आहे. गावकºयांना स्थलांतर करण्यास का सांगितले, हे स्पष्ट झालेले नाही.काहींच्या म्हणण्याप्रमाणे लष्कराच्या ३३ कॉर्प्सच्या जवानांना तिथे आणण्यात येणार आहे. त्यासाठी गावकºयांना गाव सोडायला सांगितले असावे.मात्र चीनने लष्करी कारवाई केली आणि त्यातून चकमकी सुरू झाल्या, तर त्याचा फटका गावकºयांना बसू नये, यासाठी भारतीय सैन्याने हा निर्णय घेतला असावा, असे बोलले जाते.नाथांग गावात काही दिवसांपासून भारतीय सैनिकांची संख्या वाढत चालली आहे, असे गावकºयांचेही म्हणणे आहे. मात्र गावकºयांना हे का सुरू आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही.दरवर्षी सप्टेंबरमध्ये लष्करातर्फे त्या भागांत वार्षिक सराव केला जातो. यंदा तो आधी करण्यात येणार आहे आणि त्यामुळे तिथे भारतीय सैनिकांची संख्या वाढली आहे, असे लष्करातील एका अधिकाºयाने सांगितले.