शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बांगलादेशात ‘सीतरंग’ चक्रीवादळामुळे 5 जणांचा मृत्यू, ढाकासह बहुतांश भागात पाऊस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 07:00 IST

cyclone sitrang : आपत्ती मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने एएफपीने सांगितले की, बरगुना, नराइल, सिराजगंज जिल्हे आणि भोला बेट जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

ढाका : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या सीतरंग चक्रीवादळाचा प्रभाव आता दिसून येत आहे. सीतरंग चक्रीवादळबांगलादेशात पोहोचले असून ते रात्री उशिरा देशाच्या नैऋत्य किनारपट्टीवर धडकले. दरम्यान, बांगलादेशात सीतरंग चक्रीवादळाच्या तडाख्याने पाच जणांचा मृत्यू झाला. आपत्ती मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने एएफपीने सांगितले की, बरगुना, नराइल, सिराजगंज जिल्हे आणि भोला बेट जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतीय हवामान खात्याने माहिती दिली आहे की, चक्रीवादळ सीतरंग 24 ऑक्टोबर रोजी रात्री 11.30 वाजता ढाकापासून 40 किमी पूर्वेला कोस्टल बांगलादेशच्या दिशेने केंद्रित झाले आहे. ते उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची आणि पुढील 6 तासांमध्ये चिन्हांकित कमी दाबाच्या क्षेत्रात कमकुवत होण्याची दाट शक्यता आहे. तर या वादळाच्या प्रभावामुळे पूर्व, ओडिसा, पश्चिम बंगाल, बांगलादेशाच्या किनाऱ्यावर पावसाच्या ढग तयार झाले आहेत. ईशान्य भारतातील राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

याआधी सोमवारी बांगलादेशातील 2.19 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. आपत्कालीन व्यवस्थापनाने आधीच एक अपडेट दिले होते की, ते रात्रीच्या वेळी दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवर येऊ शकते. आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद मोनिरुझमान यांनी सांगितले की, बांगलादेशी अधिकाऱ्यांनी 6,925 निवारा केंद्रे तयार केली आहेत, जिथे चक्रीवादळाच्या धोक्यामुळे बाधित लोक आश्रय घेऊ शकतात.

चक्रीवादळ सीतरंगमुळे दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा प्रभाव आधीपासूनच दिसून येत आहे, तर ढाकासह देशातील बहुतांश भागात सतत पाऊस पडत आहे. हवामान खात्याने सोमवारी संध्याकाळी जारी केलेल्या आपल्या ताज्या सूचनांमध्ये, पायरा, मोंगला आणि चितगाव बंदरांना धोक्याचे सिग्नल वाढवण्यास सांगितले आणि कॉक्स बाजार बंदरांना 10 च्या प्रमाणात धोक्याचा सिग्नल क्रमांक 6 कायम ठेवण्याचा सल्ला दिला. तसेच, दक्षिण-पश्चिम पटुआखाली, भोला, बरगुना आणि झलकाठीला वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे, इशारा असा हवामान खात्याने दिला आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेशcycloneचक्रीवादळ