शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीवर येणार संकटांवर संकटे, संयुक्त राष्ट्रांनी दिला धोक्याचा इशारा, समोर आली चिंता वाढवणारी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 13:18 IST

Earth, United Nation News: गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे त्रस्त झालेल्या जगाला आता येणाऱ्या वर्षांमध्ये अजून काही आपत्तींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आपल्या एका रिपोर्टमध्ये संयुक्त राष्ट्रांनी ही माहिती दिली आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे त्रस्त झालेल्या जगाला आता येणाऱ्या वर्षांमध्ये अजून काही आपत्तींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आपल्या एका रिपोर्टमध्ये संयुक्त राष्ट्रांनी ही माहिती दिली आहे. संयुक्त राष्ट्र आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, हे जग २०१५ पासून दरवर्षी सुमारे ४०० आपत्तींचा सामना करत आहे. ज्यांची संख्या २०३० पर्यंत वाढून ५६० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच जर १९७० ते २०००च्या दरम्यानचा कालावधी पाहिला तर मध्यम आणि मोठ्या आपत्तींचे प्रमाण ९० ते १०० पर्यंत मर्यादित होते.

या वर्षाच्या विचार केल्यास गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक तीव्र उन्हाळा जाणवत आहे. त्याची सुरुवातसुद्धा लवकर झाली आहे. जर हीच परिस्थिती राहिली तर २०३० पर्यंत उष्ण हवांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल. २००१ च्या तुलनेत हे प्रमाण तीन पटींने वाढणार आहे. तसेच दुष्काळ पडण्याचे प्रमाणही ३० टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. वातावरणातील बदलांमुळे केवळ नैसर्गित आपत्तींचे प्रमाणच वाढणार नाही तर कोविड-१९, आर्थिक मंदी, अन्नटंचाई यासारख्या आपत्तींचं कारणही वातावरणातील बदल हेच आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाच्या प्रमुख मामी मिजतोरी यांनी सांगितले की, जर आम्ही लवकरच यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न केला नाही, तर पुढे जे नुकसान होईल, याची भरपाई करणे किंवा त्याला सांभाळणे आपल्या अवाक्यात राहणार नाही. त्यांनी पुढे सांगितले की, समाजाला आपत्तींच्या जोखमींचा सामना करण्यासाठी आर्थिक स्तरावर पुन्हा विचार करण्याची आवश्यकता आहे. सध्या आपला ९० टक्के कोष हा आपातकालिन मदतीसाठी असतो. ६ टक्के पुनर्निर्माण आणि चार टक्के आपत्तीला रोखण्यावर खर्च होतो.

दरम्यान, या आपत्तींचा सर्वाधिक फटका हा श्रीमंत देशांपेक्षा गरीब देशांना बसत आहे. कारण हे देश आधीच आर्थिक रूपाने विपन्नावस्थेत आहेत. त्यात या नुकसानाची भरपाई राष्ट्राला विनाशाच्या उंबरठ्यावर नेत आहेत. त्यामुळे यापासून बचाव करण्यासाठी येणाऱ्या आपत्तींचा सामना करण्यासाठी स्वत:ला तयार ठेवणे शिकले पाहिजे.  

टॅग्स :Earthपृथ्वीunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ