शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus News: अब्जावधी लोकांना हात धुवायला पाणीच नसल्याने कोरोनाचा फैलाव- संयुक्त राष्ट्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 07:48 IST

४ अब्ज लोकांना वर्षातील एक महिना करावा लागतो पाणीटंचाईचा सामना

नवी दिल्ली : अब्जावधी लोकांना हात धुण्यासाठी पुरेसे पाणी नसल्यामुळे कोविड-१९ महामारी वेगाने पसरत आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे. गंभीर पाणीटंचाईमुळे जगातीलपाचपैकी दोन कुटुंबांना कोरोनाचा धोका आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.कोरोना विषाणूला दूर ठेवण्यासाठी वारंवार संपूर्ण हात धुणे हा सर्वांत प्रभावी मार्ग आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. तथापि, जगातील ३ अब्ज लोकांकडे हात धुण्यासाठी पाणी आणि साबण नाही. ४ अब्ज लोकांना वर्षातील किमान एक महिना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, असे संयुक्त राष्ट्रांच्या ‘यूएन-वॉटर’ समूहाने म्हटले आहे.यूएन-वॉटरचे चेअरमन गिलबर्ट एफ. हाउंगबो यांनी एका मुलाखतीत सांगितले की, पाणी आणि सुरक्षित स्वच्छता याशिवाय जगणे ही लोकांसाठी अत्यंत संकटमय स्थिती आहे. पुरेशा गुंतवणुकीअभावी अब्जावधी लोक असुरक्षित आहेत आणि आता आपण परिणाम पाहत आहोत. शुद्ध पाणी आणि स्वच्छता यावरील गुंतवणूक वर्षानुवर्षे टाळली गेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक जण असुरक्षित झाला आहे. कोरोनाच्या संसर्ग आणि पुनसंसर्गाच्या साखळीत विकसित आणि अविकसित असे सारेच देश सापडले आहेत.हाउंगबो यांनी सांगितले की, २०३० सालापर्यंत जल पायाभूत सोयीसाठी किमान ६.७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक जगात व्हायला हवी, असे संयुक्त राष्ट्रांची आकडेवारी सांगते. स्वच्छताविषयक गरजाच नव्हे, तर संभाव्य अन्न संकट टाळण्यासाठी सिंचनासाठीही गुंतवणूक व्हावी.येताहेत हात धुण्याचे गॅझेट्ससूत्रांनी सांगितले की, कमीत कमी पाण्यात हात कसे धुता येतील, यावर काही कंपन्या काम करीत आहेत. अमेरिकन स्टँडर्ड आणि ग्रोहे यासारखे ब्रँड असलेल्या जपानच्या लिक्सिल ग्रुप कॉर्पोरेशन ही कंपनी युनिसेफ आणि इतर भागीदारांसोबत या विषयावर काम करीत आहे. थोड्याशा पाण्यात हात धुता येतील, असे गॅझेट कंपनी विकसित करीत आहे.भारतात १ दशलक्ष डॉलरमध्ये ५ लाख युनिट बनवून वितरित करण्याची कंपनीची योजना आहे. त्याचा २.५ दशलक्ष लोकांना लाभ होईल.नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील जल संस्थेच्या प्राध्यापिका आणि युनिसेफच्या जल, स्वच्छता व आरोग्य विभागाच्या प्रमुख क्लॅरिसा ब्रॉकलहर्स्ट यांनी सांगितले की, साथीच्या प्रतिकारासाठी तातडीच्या उपाययोजना करणे गरजेचे आहेच; पण पाण्याची दीर्घकालीन व्यवस्था करणेही आवश्यक आहे. प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचविणे आवश्यक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या