शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

CoronaVirus: मुंबईतल्या धारावी मॉडेलची जगभरातून प्रशंसा; जागतिक आरोग्य संघटनेनंही केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 08:54 IST

आम्हाला नेतृत्व, समाजाचा सहभाग आणि सामूहिक एकता ठेवणे आवश्यक असल्याचंही त्यांनी ट्रेडोस अधॅनम गेब्रेयसेन यांनी नमूद केलं. 

नवी दिल्लीः जागतिक आरोग्य संघटने(WHO)ने मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील कोरोना रोखण्याच्या पॅटर्नचे कौतुक केले आहे. धारावीतील कोरोना विषाणूला रोखण्याच्या केलेल्या प्रयत्नांमुळे आज तो परिसर कोरोनापासून मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. केवळ या राष्ट्रीय एकात्मता आणि जागतिक ऐक्यातून या साथीला प्रतिबंध केला जाऊ शकतो, असंही जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे.  WHOचे महासंचालक म्हणाले की, 'जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत की कोरोनाचा उद्रेक कितीही मोठा असला तरी तो नियंत्रणात आणला गेलेला आहे. यापैकी काही उदाहरणे इटली, स्पेन आणि दक्षिण कोरिया आणि धारावीमध्येही आढळतात.संयुक्त राष्ट्रांचे आरोग्य प्रमुख म्हणाले की, मुंबईतील या झोपडपट्टी परिसरातील लोकांची चाचणी, ट्रेसिंग, सामाजिक अंतर आणि संक्रमित रुग्णांवर त्वरित उपचार करण्याच्या पद्धतीमुळे धारावी कोरोनावर विजय मिळवण्याच्या मार्गावर आहे. डब्ल्यूएचओ महासंचालकांनी धारावी मॉडेलचं कौतुक करताना नेतृत्व, समाजाचा सहभाग आणि सामूहिक एकता यावर जोर दिला. ते म्हणाले, "ज्या देशांमध्ये वेगवान विकास आहे, तेथील निर्बंध कमी होत आहेत आणि आता प्रकरणे वाढू लागली आहेत. आम्हाला नेतृत्व, समाजाचा सहभाग आणि सामूहिक एकता ठेवणे आवश्यक असल्याचंही ट्रेडोस अधॅनम गेब्रेयसेन यांनी नमूद केलं. शुक्रवारी मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत फक्त १२ नवे रुग्ण सापडले आहेत.  कोरोनाच्या नवीन रुग्णांची एकूण संख्या काल 2,359नं वाढली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) च्या अधिका-याने ही माहिती दिली. नागरी संस्थेने गेल्या काही दिवसांपासून कोरोनामधील मृत्यूची नोंद करणे बंद केले आहे. या अधिका-याने सांगितले की सध्या धारावी येथे  166 रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 1,952 रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून, अडीच चौरस किलोमीटर क्षेत्रात ती पसरली आहे, जेथे जवळपास 6.5 लाख लोक राहतात.धारावी मॉडेल काय आहे, ज्याद्वारे कोरोना बर्‍याच प्रमाणात नियंत्रित केले गेले होते?1 एप्रिल रोजी धारावी येथे कोरोनाचे पहिले प्रकरण समोर येण्यापूर्वीच सरकारला भीती वाटली की इथली परिस्थिती आणखी बिघडू शकते. कारण 80 टक्के लोक सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. त्या भागात 8 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या एका-एका लहान घरात 10 ते 15 लोक राहतात. म्हणूनच गृह अलगीकरण केले जाऊ शकत नव्हते किंवा लोक सामाजिक अंतराचे अनुसरण करू शकत नव्हते.म्हणूनच जेव्हा गोष्टी समोर येऊ लागल्या तेव्हा आम्ही चेस व्हायरसच्या खाली काम करण्यास सुरुवात केली. या अंतर्गत कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग, ताप शिबिरे, लोकांना अलग ठेवणे आणि चाचणी सुरू केली. शाळा, महाविद्यालय हे क्वारंटाइन केंद्र बनले. तेथे चांगले डॉक्टर, परिचारिका आणि 3 वेळा चांगले अन्न मिळत होते. रमजानदरम्यान मुस्लिम लोक घाबरले, परंतु क्वारंटाइन केंद्रामधील चांगल्या सुविधा पाहून ते स्वतःहून बाहेर आले. यामुळे सरकारचे काम सोपे झाले. संस्थात्मक 11 हजार लोकांना अलग ठेवणे. साई हॉस्पिटल, फॅमिली केअर आणि प्रभात नर्सिंग होम यांची खूप मदत झाली. या सर्व प्रयत्नांचा परिणाम असा आहे की येथे केवळ 23 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. 77 टक्के लोक बरे झाले आहेत आणि घरी गेले आहेत.धारावीमध्ये सार्वजनिक शौचालय हे एक मोठे आव्हान आहे. या समस्येचा सामना कसा केला गेला?आमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे सार्वजनिक शौचालये, ज्यांची संख्या 450पेक्षा जास्त आहे. सुरुवातीला सार्वजनिक शौचालयाची दिवसाला दोन ते तीन वेळा स्वच्छता केली जायची. कोरोनाची प्रकरणं वेगाने वाढू लागल्यानंतर स्वच्छतागृह दिवसातून 5 ते 6 वेळा स्वच्छ करणेनं पालिकेनं सुरू केलं. टॉयलेटच्या बाहेर हँडवॉश ठेवण्यात आले होते. सुरुवातीला त्यांची चोरी झाली. पण नंतर याची व्यवस्था केली गेली. डेटॉल आणि हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने येथे मोठ्या प्रमाणात हँडवॉश दिले. स्वयंसेवी संस्था आणि इतर संस्थांनी खूप मदत केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या