शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

CoronaVirus News : 'हा' देश आहे छोटासा, पण कोरोनावर मात करून दाखवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 09:17 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : नामिबियामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण १३ मार्चला आढळला होता. त्यानंतर या देशात अनेक निर्णय घेण्यात आले, ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत झाली.

ठळक मुद्दे एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत नामिबियामध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. इतकेच नाही तर कोरोनामुळे एकही बळी गेला नाही. देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर येथील सरकारी व अशासकीय यंत्रणा त्वरित सतर्क झाल्या.

विंडहोक (नामीबिया) - संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. अमेरिकेसह अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. अशातच रिपब्लिक ऑफ नामिबियाने कोरोनावर नियंत्रण मिळविले आहे. त्यामुळे या देशाचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

नामिबियामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण १३ मार्चला आढळला होता. त्यानंतर या देशात अनेक निर्णय घेण्यात आले, ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत झाली. एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत नामिबियामध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. इतकेच नाही तर कोरोनामुळे एकही बळी गेला नाही. देशात कोरोनाचे २३ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी फक्त ९ अॅक्टिव्ह आहेत.

देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर येथील सरकारी व अशासकीय यंत्रणा त्वरित सतर्क झाल्या. येथील सरकारने प्रभावी पावले उचलली आणि इतर देशांकडून धडे घेतले. राष्ट्रपती हेग जी. जीनगोब यांनी १० तासांच्या आतच इथियोपियाची राजधानी आणि दोहा याठिकाणी बंदी घातली. नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत त्यांनी देशात आणीबाणी लागू केली. 24 मार्च रोजी देशाच्या सीमा 30 दिवसांसाठी बंद केल्या. देशाच्या अंतर्गत हालचालींवरही बंदी घालण्यात आली होती.

देशात कोरोनाचे दोन रग्ण समोर आल्यानंतर हे सर्व निर्णय लवकरच घेण्यात आले. नामिबियाच्या पंतप्रधान सारा कुनगोंगेल्वा म्हणाल्या की, "सरकारने लगेच आयसोलेट केलेल्या व्यक्तींच्या उपचारांसाठी आरोग्य कार्यक्रम सुरू केला. लॉकडाउन लागू केल्यामुळे त्याचा लोकांवरही परिणाम झाला. हे कमी करण्यासाठी समाजातील दुर्बल घटकांना एका पगाराचा लाभ देण्यात आला. जेवणाचीही सोय केली." याचबरोबर, देशातील अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करण्यासाठी व्यापाऱ्यांना प्रोत्साहन पॅकेज देण्यात आले. लोकांना घरी राहा, असे सांगणे सोपे नव्हते, असेही पंतप्रधान सारा कुनगोंगेल्वा यांनी सांगितले.

नामिबियात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यानंतर लॉकडाऊन शिथिल करण्यास परवानगी देण्यात आली. तसेच, परदेशातून नवीन कोरोना रुग्ण येऊ नयेत म्हणून अजूनही सीमा बंद आहेत. दरम्यान, या देशात जास्त दाट लोकसंख्या नसल्यामुळे, साथीच्या रोगाचा प्रतिबंध करण्यास मदत झाली. मात्र, काही भागात दाट लोकवस्ती आहे, ज्यामुळे तेथे धोका अधिक होता. सरकारने सर्वात आधी राजधानी आणि किनारपट्टीच्या भाग इरोंगोमध्ये लॉकडाऊन केला होता. देशाच्या अर्थव्यवस्थेत विविधता आणणे हा सरकारचा मानस आहे जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत देश आत्मनिर्भर होईल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीय