शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: शांघायमध्ये कडक लॉकडाऊन; कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर WHO चा सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 16:53 IST

भारतात सध्या कोरोना महामारी आता हळूहळू नियंत्रणात येत आहे. सोमवारी सकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, कोविडमधून बरे होण्याचं प्रमाण ९८.७५ टक्के इतकं झाले आहे.

युरोप आणि पूर्व आशियातील कोरोना विषाणूची लाट कमी होताना दिसत नाही. चीनमधील शांघायमध्ये पुन्हा दोन टप्प्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. २.६ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात आता नऊ दिवस चाचणी वाढवण्यात येणार आहे. युरोपीय देशांमध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. दोन्ही ठिकाणी Omicron चा सब व्हेरिएंट BA.2 मुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. इस्रायलचे पंतप्रधान नफताली बेनेट हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.

भारतात सध्या कोरोना महामारी आता हळूहळू नियंत्रणात येत आहे. सोमवारी सकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, कोविडमधून बरे होण्याचं प्रमाण ९८.७५ टक्के इतकं झाले आहे. लोकांमध्ये कोरोनाबाबत जागरुकता निर्माण झाल्यानं आता कोविडची कॉलर ट्यून लवकरच बंद होण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहे. चीन पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. सोमवारी, चीनमधील सर्वात मोठं शहर शांघायच्या मोठ्या भागात लॉकडाऊन लागू केले. यासोबतच शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पुडोंग आणि त्याच्या आसपासच्या भागात सोमवार ते शुक्रवार लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. शांघायमधील लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात शहराचे विभाजन करणाऱ्या हुआंगपू नदीच्या पश्चिमेकडील भागात शुक्रवारपासून पाच दिवसांचा लॉकडाऊन सुरू होणार आहे.

WHO नं दिला इशारा

जागतिक आरोग्य संघटना (WHO) मधील कोविड-१९ चे टेक्निकल प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी म्हटलं की, कोरोना विषाणू हा आजार नेहमीच्या फ्लूसारखा राहणार आहे. याचा अर्थ असा नाही की तो धोकादायक नाही. आता हार मानण्याची वेळ नाही. आता महामारी संपली असं म्हणण्याची वेळ नाही. दुर्दैवाने, असं नाही त्यामुळे आपल्याला प्रत्येक देशातील सर्वात जोखीम असलेल्या लोकांपर्यंत लसीकरण वाढवावे लागेल. यासोबतच प्रसार रोखण्यासाठी सोप्या उपायांचा अवलंब करावा लागेल.

भारतात चाचणी कमी झाली अन् रुग्णसंख्येतही घट झाले

रविवार असल्याने कोरोना व्हायरसच्या चाचणीत मोठी कमतरता होती. देशभरात केवळ ४.५ लाख लोकांची कोरोना विषाणूची चाचणी करण्यात आली होती, त्यापैकी १२७० लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या काळात संसर्गाचे प्रमाण ०.२९ टक्के नोंदवले गेले आहे. गेल्या २४ तासांत १५६७ रुग्ण कोरोना विषाणूतून बरे झाले असून ३१ जणांना त्याचा मृत्यू झाला आहे. या कालावधीत ३२८ सक्रिय रुग्ण कमी झाले आणि आता फक्त १५,८५९ सक्रीय रुग्ण आहेत. दुसरीकडे रिकव्हरी रेट चांगला होत आहे. आता भारतात रिकव्हरी ९८.७५ टक्क्यांवर पोहोचला असून मृत्यूदर १.२१ टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना