शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: शांघायमध्ये कडक लॉकडाऊन; कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर WHO चा सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 16:53 IST

भारतात सध्या कोरोना महामारी आता हळूहळू नियंत्रणात येत आहे. सोमवारी सकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, कोविडमधून बरे होण्याचं प्रमाण ९८.७५ टक्के इतकं झाले आहे.

युरोप आणि पूर्व आशियातील कोरोना विषाणूची लाट कमी होताना दिसत नाही. चीनमधील शांघायमध्ये पुन्हा दोन टप्प्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. २.६ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात आता नऊ दिवस चाचणी वाढवण्यात येणार आहे. युरोपीय देशांमध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. दोन्ही ठिकाणी Omicron चा सब व्हेरिएंट BA.2 मुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. इस्रायलचे पंतप्रधान नफताली बेनेट हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.

भारतात सध्या कोरोना महामारी आता हळूहळू नियंत्रणात येत आहे. सोमवारी सकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, कोविडमधून बरे होण्याचं प्रमाण ९८.७५ टक्के इतकं झाले आहे. लोकांमध्ये कोरोनाबाबत जागरुकता निर्माण झाल्यानं आता कोविडची कॉलर ट्यून लवकरच बंद होण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहे. चीन पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. सोमवारी, चीनमधील सर्वात मोठं शहर शांघायच्या मोठ्या भागात लॉकडाऊन लागू केले. यासोबतच शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पुडोंग आणि त्याच्या आसपासच्या भागात सोमवार ते शुक्रवार लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. शांघायमधील लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात शहराचे विभाजन करणाऱ्या हुआंगपू नदीच्या पश्चिमेकडील भागात शुक्रवारपासून पाच दिवसांचा लॉकडाऊन सुरू होणार आहे.

WHO नं दिला इशारा

जागतिक आरोग्य संघटना (WHO) मधील कोविड-१९ चे टेक्निकल प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी म्हटलं की, कोरोना विषाणू हा आजार नेहमीच्या फ्लूसारखा राहणार आहे. याचा अर्थ असा नाही की तो धोकादायक नाही. आता हार मानण्याची वेळ नाही. आता महामारी संपली असं म्हणण्याची वेळ नाही. दुर्दैवाने, असं नाही त्यामुळे आपल्याला प्रत्येक देशातील सर्वात जोखीम असलेल्या लोकांपर्यंत लसीकरण वाढवावे लागेल. यासोबतच प्रसार रोखण्यासाठी सोप्या उपायांचा अवलंब करावा लागेल.

भारतात चाचणी कमी झाली अन् रुग्णसंख्येतही घट झाले

रविवार असल्याने कोरोना व्हायरसच्या चाचणीत मोठी कमतरता होती. देशभरात केवळ ४.५ लाख लोकांची कोरोना विषाणूची चाचणी करण्यात आली होती, त्यापैकी १२७० लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या काळात संसर्गाचे प्रमाण ०.२९ टक्के नोंदवले गेले आहे. गेल्या २४ तासांत १५६७ रुग्ण कोरोना विषाणूतून बरे झाले असून ३१ जणांना त्याचा मृत्यू झाला आहे. या कालावधीत ३२८ सक्रिय रुग्ण कमी झाले आणि आता फक्त १५,८५९ सक्रीय रुग्ण आहेत. दुसरीकडे रिकव्हरी रेट चांगला होत आहे. आता भारतात रिकव्हरी ९८.७५ टक्क्यांवर पोहोचला असून मृत्यूदर १.२१ टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना