शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने मरायचं की भूकबळीनं? बोलावियातल्या जनतेचा जगण्याचा संघर्ष.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 17:28 IST

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सरकार राबतं आहे हे ही खरं आहे आणि माणसं उपाशी आहेत हे ही.

ठळक मुद्देभूकेल्या माणसांचं काय होईल? याचं उत्तर आजच्या घडीला नाही.

दक्षिण अमेरिकेतले देश. बोलाविया, अर्जेण्टिना आधीच गरीबी आणि अस्मानी सुलतानी संकटांनी होरपळलेले आहेत.त्यात तिथं कोरोना पोहोचला. बोलावियात सध्या 672 पॉङिाटिव्ह आणि 40 मृत्यू अशी आकडेवारी आहे. मात्र या कोरडय़ा आकडेवारीपलिकडे आहे या देशातल्या भिषण लॉकडाउनची गोष्ट.बोलावियात मोठे उद्योग नाहीत. सगळा व्यवसाय-व्यापार रस्त्यावर. साधारण 15 लाख लोक या देशात फिरते विक्रेते, स्ट्रिट वेंडर्स आहेत. त्यांचं पोट त्याच्यावरच चालतं. सरकारने लॉकडाउन केलं आणि त्यांचं काम ठप्प झालं. सरकारने वायदाही केला की, आम्ही सगळ्यांना अन्नधान्य देऊ. मात्र सरकार सर्वदूर पोहचू शकत नाही, यंत्रणोच्या मर्यादा उघडडय़ा पडल्या आहेत.एकीकडे बोलावियातलं स्ट्रिट फूड अत्यंत नावाजलं जातं. ते खायला लोक विदेशातून येतात. ते खाणं हा काहींना साहसी खेळही वाटतं आणि मग बोलावियात स्ट्रिटू फूड खाताना अमूक काळजी घ्या, तमूक करा असे लेखही व्हायरल केले जातात.आता ते सारंच ठप्प झालं आणि माणसांचे हातच नाही तर पोटंही रिकामं राहू लागलं.आता तिथंही तोच प्रश्न आहे की,कोरोना संसर्गानं मरायचं की भूकबळीनं.आता लोक बोलू लागलेत की, आमचा बहुतेक भूकबळी जाणार.न्याताहा, नावाची महिला एक आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला सांगते, मला सहा मुलं आहेत. मी एकल माता आहे. माङया हाताला काम नाही तर या मुलांचं पोट कसं भरु? सरकार म्हणतं अन्न देऊ, पण कधी देणार ? आम्ही मेल्यावर?’सरकारही दुस:या बाजूला हतबल आहे.एक सैन्य सोडलं तर दुसरी काही व्यवस्थाच त्यांच्याकडे नाही जी या संकटाचा सामना करु शकेल.सैन्याच्या धाकाने आधी लोक घरात बसवले, आता तेच सैन्य अन्नधान्य पोहचवणं, औषधं, पेट्रोल ते जीवनावश्यक गरजा पोहचवत आहे.आरोग्य यंत्रणा उभी राहते आहे, ती सज्ज होते आहे तोवर सैनिकी दवाखाने वापरण्यात आले.सैन्याच्या मदतीनं सरकार संकटाशी दोन हात करतं आहे, मात्र यासा:याला मानवी चेहरा नाही.भूकेल्या माणसांचं काय होईल? याचं उत्तर आजच्या घडीला नाही.कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सरकार राबतं आहे हे ही खरं आहे आणि माणसं उपाशी आहेत हे ही.