शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

बांगलादेशात आरक्षणावरून रक्तरंजित संघर्ष; दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 13:39 IST

सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाचा वाद बांगलादेशात उफाळून आला असून या आंदोलनाने उग्र स्वरुप धारण केले आहे. या आंदोलनाचे लोण संपूर्ण देशभरात पसरले आहे. 

ढाका - बांगलादेशात सर्वोच्च न्यायालय वादग्रस्त कोटा सिस्टमवर निर्णय देऊ शकतं ज्यावरून विद्यार्थ्यांचं देशव्यापी आंदोलन सुरू झालं आहे. मात्र या निकालापूर्वी देशभरात कर्फ्यू लागू केला आहे. सरकारने आंदोलनकर्त्यांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिलेत. विद्यापीठ परिसरातून सुरू झालेल्या या आंदोलनानं अवघ्या काही दिवसात संपूर्ण देश व्यापला. त्यात पंतप्रधान शेख हसीना यांनी आंदोलनकर्त्यांची तुलना १९७१ च्या स्वातंत्र संग्रामात पाकिस्तानला मदत करणाऱ्या लोकांसोबत केली आहे त्यामुळे आणखी तणाव वाढला आहे.

बांगलादेशात १९७१ च्या मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना सरकारी नोकरीत ३० टक्के आरक्षण मिळतं. २०१८ मध्ये या आरक्षणाविरोधात बांगलादेशात हिंसक आंदोलन झालं होतं. त्यावेळी हे आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता. मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांनी या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले. त्यानंतर हायकोर्टाने मागील महिन्यात यावर निकाल सुनावत सरकारचा निर्णय रद्द करत ३० टक्के आरक्षण अबाधित ठेवण्याचे आदेश दिले. 

बांगलादेशात आतापर्यंत १३३ मृत्यू

कोर्टाच्या या निर्णयानंतर संपूर्ण बांगलादेशात हिंसक आंदोलन उभं राहिले. आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे मोठं नुकसान झाले. बस, ट्रेन वाहतूक रोखली. अनेक ठिकाणी जाळपोळ झाली. देशातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हसीना सरकारने लष्काराला रस्त्यावर उतरवलं. बऱ्याच जागी लष्कर आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. या आंदोलनात आतापर्यंत १३३ जणांचा मृत्यू झाला असून ३ हजारपेक्षा लोक जखमी झालेत. या आंदोलनामुळे देशातील रेल्वे सेवा, सार्वजनिक वाहतूक ठप्प पडली आहे.

१ हजार भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले

बांगलादेशात विविध शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या १ हजार भारतीय विद्यार्थ्यांना सुखरुप मायदेशी आणलं आहे. बांगलादेशात १५ हजार भारतीय विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना कुठल्याही मदतीसाठी भारतीय दूतावास कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन केले आहे. त्यासोबत २४ तास हेल्पलाईन सुविधा दिली आहे. अमेरिकेनेही त्यांच्या नागरिकांना बांगलादेश दौरा टाळण्याचा सल्ला दिला आहे. बांगलादेशात सरकारने इंटरनेट आणि दूरध्वनी सुविधेवर निर्बंध आणले आहेत. बांगलादेशात एक दशकानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलन उभं राहिलं आहे. 

 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश