शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

बांगलादेशात आरक्षणावरून रक्तरंजित संघर्ष; दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 13:39 IST

सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाचा वाद बांगलादेशात उफाळून आला असून या आंदोलनाने उग्र स्वरुप धारण केले आहे. या आंदोलनाचे लोण संपूर्ण देशभरात पसरले आहे. 

ढाका - बांगलादेशात सर्वोच्च न्यायालय वादग्रस्त कोटा सिस्टमवर निर्णय देऊ शकतं ज्यावरून विद्यार्थ्यांचं देशव्यापी आंदोलन सुरू झालं आहे. मात्र या निकालापूर्वी देशभरात कर्फ्यू लागू केला आहे. सरकारने आंदोलनकर्त्यांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिलेत. विद्यापीठ परिसरातून सुरू झालेल्या या आंदोलनानं अवघ्या काही दिवसात संपूर्ण देश व्यापला. त्यात पंतप्रधान शेख हसीना यांनी आंदोलनकर्त्यांची तुलना १९७१ च्या स्वातंत्र संग्रामात पाकिस्तानला मदत करणाऱ्या लोकांसोबत केली आहे त्यामुळे आणखी तणाव वाढला आहे.

बांगलादेशात १९७१ च्या मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना सरकारी नोकरीत ३० टक्के आरक्षण मिळतं. २०१८ मध्ये या आरक्षणाविरोधात बांगलादेशात हिंसक आंदोलन झालं होतं. त्यावेळी हे आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता. मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांनी या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले. त्यानंतर हायकोर्टाने मागील महिन्यात यावर निकाल सुनावत सरकारचा निर्णय रद्द करत ३० टक्के आरक्षण अबाधित ठेवण्याचे आदेश दिले. 

बांगलादेशात आतापर्यंत १३३ मृत्यू

कोर्टाच्या या निर्णयानंतर संपूर्ण बांगलादेशात हिंसक आंदोलन उभं राहिले. आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे मोठं नुकसान झाले. बस, ट्रेन वाहतूक रोखली. अनेक ठिकाणी जाळपोळ झाली. देशातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हसीना सरकारने लष्काराला रस्त्यावर उतरवलं. बऱ्याच जागी लष्कर आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. या आंदोलनात आतापर्यंत १३३ जणांचा मृत्यू झाला असून ३ हजारपेक्षा लोक जखमी झालेत. या आंदोलनामुळे देशातील रेल्वे सेवा, सार्वजनिक वाहतूक ठप्प पडली आहे.

१ हजार भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले

बांगलादेशात विविध शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या १ हजार भारतीय विद्यार्थ्यांना सुखरुप मायदेशी आणलं आहे. बांगलादेशात १५ हजार भारतीय विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना कुठल्याही मदतीसाठी भारतीय दूतावास कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन केले आहे. त्यासोबत २४ तास हेल्पलाईन सुविधा दिली आहे. अमेरिकेनेही त्यांच्या नागरिकांना बांगलादेश दौरा टाळण्याचा सल्ला दिला आहे. बांगलादेशात सरकारने इंटरनेट आणि दूरध्वनी सुविधेवर निर्बंध आणले आहेत. बांगलादेशात एक दशकानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलन उभं राहिलं आहे. 

 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश