शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोणत्या धर्माच्या लोकांनी केलं सर्वाधिक स्थलांतर? कितव्या क्रमांकावर आहेत हिंदू? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 17:31 IST

प्यू रिसर्चच्या आकडेवारीचा विचार करता, जगातील एकूण लोकसंख्येपैकी 3.6 टक्के लोक हे, ज्या देशात जन्मले त्या देशात राहत नाहीत. हा आकडा 28 कोटीच्या जवळपास जातो.

स्थलांतर हा निसर्गाचा नियम आहे, असे म्हटले जाते. कधी पोटासाठी, कधी शिक्षणासाठी तर कधी संकट काळात लोक स्थलांतर करत असतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. प्यू रिसर्चच्या आकडेवारीचा विचार करता, जगातील एकूण लोकसंख्येपैकी 3.6 टक्के लोक हे, ज्या देशात जन्मले त्या देशात राहत नाहीत. हा आकडा 28 कोटीच्या जवळपास जातो. प्यू रिसर्चच्या एका अहवालानुसार, दुसऱ्या देशात राहणाऱ्या लोकांचा आकडा धर्माच्या आधारे बघितल्यास, यात ख्रिश्चन धर्म पहिल्या क्रमांकावर आहे.

इतर देशांमध्ये स्थलांतरित झालेल्या लोकांमध्ये ख्रिश्चनांची संख्या सर्वाधिक 47 टक्के एवढी आहे. तर मुस्लीम दुसऱ्या क्रमांकावर असून स्थलांतरित झालेल्यांमध्ये त्यांची संख्या 29 टक्के एवढी आहे. या बाबतीत हिंदू तिसऱ्या क्रमांकावर आहेत, केवळ 5 टक्के हिंदूच, ज्या देशात त्यांचा जन्म झाला तो देश सोडून दुसऱ्या देशात स्थलांतरित झाले आहेत. यात चौथा क्रमांक बौद्ध समाज 4 टक्के तर ज्यू 1 टक्के आहेत. 

यातही मजेदार गोष्ट म्हणजे, स्थलांतरित झालेल्या लोकांपैकी 13 टक्के लोक हे स्वतःला नास्तिक म्हणवणारे आहेत. अशा लोकांचा ख्रिश्चन आणि मुस्लिमांनंतर तिसरा क्रमांक लागतो. महत्वाचे म्हणजे, या अहवालात, युद्ध, आर्थिक संकट, दुष्काळ यांसारख्या आपत्तींनाही स्थलांतराचे प्रमुख कारण मानण्यात आले आहे.

धार्मिक छळ हेदेखील स्थलांतराचे मुख्य कारण असल्याचे या अहवालात म्हणण्यात आले आहे. किंबहुना असा ट्रेंड त्या-त्या देशांतील अल्पसंख्याकांमध्ये अधिक दिसून येतो. तेथे होणाऱ्या अत्याचारांमुळे, ते लोक सर्वसामान्यपणे अशा देशांमध्ये जाऊन राहणे पसंत करतात, जेथे त्यांच्या धर्म-पंथाला मानणारे लोक बहुसंख्य असतील. अशा स्थलांतरामुळे अनेक देशांच्या लोकसंख्येमध्ये मोठे बदल झाल्याचेही या अहवालात म्हणण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Migrationस्थलांतरणHinduहिंदूMuslimमुस्लीम