शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
3
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
4
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
5
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
6
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
7
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
8
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
9
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
10
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
11
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
12
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
13
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
14
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
15
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
16
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
17
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
18
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
20
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
Daily Top 2Weekly Top 5

“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 01:32 IST

Operation Sindoor: चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले. गेल्या चार दिवसांपासून भारताच्या पश्चिम सीमेवरील अनेक भागांना लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरूच होते. परंतु, शनिवारी दुपारी भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान युद्धविराम लागू झाला होता. या युद्धविरामाला काही तासच उलटले असताना पाकिस्ताने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. यावरून भारताकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली. या घडामोडी सुरू असतानाच चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी संवाद साधला. या संवादावेळी अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना भारताची भूमिका स्पष्टपणे सांगितली.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याशी फोनवरून संवाद साधला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, अजित डोवाल यांनी म्हटले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीयांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे भारताने दहशतवादविरोधी कारवाई करणे आवश्यक आहे. युद्ध हा पर्याय भारतासमोर नव्हता आणि तो कोणत्याही पक्षाच्या हिताचा नाही. भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीसाठी वचनबद्ध असतील. शक्य तितक्या लवकर शांतता आणि स्थैर्य पुनर्स्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असतील.

चीनकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध

यावर वांग यी म्हणाले की, चीन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती अशांत आहे. आशियातील शांतता आणि स्थैर्य कष्टाने मिळवले आहे. ती जपली पाहिजे. भारत आणि पाकिस्तान हे शेजारी देश आहेत, जे एकमेकांपासून दूर होऊ शकत नाही आणि हे दोन्ही देश चीनचेही शेजारी आहेत. युद्ध हा भारतासमोरचा पर्याय नाही, या तुमच्या भूमिकेचे चीन समर्थन करतो. भारत आणि पाकिस्तान शांत आणि संयमी राहतील, संवाद आणि सल्लामसलतीद्वारे मतभेद योग्यरित्या हाताळतील आणि परिस्थिती आणखी चिघळू नये, अशी प्रामाणिक आशा करतो. भारत आणि पाकिस्तानने सल्लामसलतीद्वारे व्यापक आणि कायमस्वरूपी युद्धबंदी साध्य करावी अशी चीन अपेक्षा करतो. हे भारत आणि पाकिस्तानच्या हिताचे आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचीही हीच इच्छा आहे.

दरम्यान, पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे वृत्त आल्यानंतर घेतलेल्या तातडीच्या पत्रकार परिषदेमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लष्करी कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये झालेल्या चर्चेनंतर युद्धविराम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मागच्या काही तासांपासून या युद्धबंदीचं घोर उल्लंघन पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. भारतीय लष्कर प्रत्युत्तरदाखल कारवाई करत आहे. तसेच या अतिक्रमणाला प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेली ही कारवाई अत्यंत निंदनीय आहे. तसेच पाकिस्तान यासाठी जबाबदार आहे. पाकिस्तानने या परिस्थितीचा व्यवस्थित विचार करावा आणि आगळीक थांबवावी, हे अतिक्रमण रोखण्यासाठी त्वरित योग्य ती कारवाई करावी, असे आम्ही आवाहन करत आहोत.

 

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानchinaचीनAjit Dovalअजित डोवालsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर