शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
10
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
11
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
12
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
13
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
14
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
15
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
16
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
17
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
18
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
20
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात

“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 01:32 IST

Operation Sindoor: चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले. गेल्या चार दिवसांपासून भारताच्या पश्चिम सीमेवरील अनेक भागांना लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरूच होते. परंतु, शनिवारी दुपारी भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान युद्धविराम लागू झाला होता. या युद्धविरामाला काही तासच उलटले असताना पाकिस्ताने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. यावरून भारताकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली. या घडामोडी सुरू असतानाच चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी संवाद साधला. या संवादावेळी अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना भारताची भूमिका स्पष्टपणे सांगितली.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याशी फोनवरून संवाद साधला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, अजित डोवाल यांनी म्हटले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीयांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे भारताने दहशतवादविरोधी कारवाई करणे आवश्यक आहे. युद्ध हा पर्याय भारतासमोर नव्हता आणि तो कोणत्याही पक्षाच्या हिताचा नाही. भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीसाठी वचनबद्ध असतील. शक्य तितक्या लवकर शांतता आणि स्थैर्य पुनर्स्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असतील.

चीनकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध

यावर वांग यी म्हणाले की, चीन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती अशांत आहे. आशियातील शांतता आणि स्थैर्य कष्टाने मिळवले आहे. ती जपली पाहिजे. भारत आणि पाकिस्तान हे शेजारी देश आहेत, जे एकमेकांपासून दूर होऊ शकत नाही आणि हे दोन्ही देश चीनचेही शेजारी आहेत. युद्ध हा भारतासमोरचा पर्याय नाही, या तुमच्या भूमिकेचे चीन समर्थन करतो. भारत आणि पाकिस्तान शांत आणि संयमी राहतील, संवाद आणि सल्लामसलतीद्वारे मतभेद योग्यरित्या हाताळतील आणि परिस्थिती आणखी चिघळू नये, अशी प्रामाणिक आशा करतो. भारत आणि पाकिस्तानने सल्लामसलतीद्वारे व्यापक आणि कायमस्वरूपी युद्धबंदी साध्य करावी अशी चीन अपेक्षा करतो. हे भारत आणि पाकिस्तानच्या हिताचे आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचीही हीच इच्छा आहे.

दरम्यान, पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे वृत्त आल्यानंतर घेतलेल्या तातडीच्या पत्रकार परिषदेमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लष्करी कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये झालेल्या चर्चेनंतर युद्धविराम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मागच्या काही तासांपासून या युद्धबंदीचं घोर उल्लंघन पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. भारतीय लष्कर प्रत्युत्तरदाखल कारवाई करत आहे. तसेच या अतिक्रमणाला प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेली ही कारवाई अत्यंत निंदनीय आहे. तसेच पाकिस्तान यासाठी जबाबदार आहे. पाकिस्तानने या परिस्थितीचा व्यवस्थित विचार करावा आणि आगळीक थांबवावी, हे अतिक्रमण रोखण्यासाठी त्वरित योग्य ती कारवाई करावी, असे आम्ही आवाहन करत आहोत.

 

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानchinaचीनAjit Dovalअजित डोवालsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर