शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

उत्तराखंड सीमेजवळ चीनची आता नवी गावे; नव्या कुरापतीने भारताच्या सुरक्षेला आणखी वाढला धोका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 06:01 IST

ही घरे सीमेपासून ३५ किमी दूर आहेत. मात्र हा सारा प्रदेश चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) नियंत्रणाखाली आहे.

नवी दिल्ली : चीन भारताच्या वारंवार कुरापती काढत आहे. लडाख, अरुणाचल प्रदेशनंतर आता उत्तराखंडच्या सीमेवरही चीनने कारवाया सुरू केल्या आहेत. उत्तराखंडला लागून असलेल्या सीमेनजीक चीन त्याच्या हद्दीत आणखी नवी गावे वसवत आहे. लडाख, अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळही चीनने अशी नवी गावे वसविण्यास सुरूवात केली आहे. या गावांमुळे भविष्यात सीमाप्रश्न आणखी गंभीर स्वरूप धारण करण्याची तसेच  भारताच्या सुरक्षेला असलेला  धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.उत्तराखंडला लागून असलेल्या सीेमेपासून ११ किमी दूर चीनच्या हद्दीत ही नवी गावे वसविण्यात येत आहेत. सीमाभागात एके ठिकाणी ५५ ते ५६ नवी घरे बांधली आहेत. (वृत्तसंस्था)

नवा डाव...ही घरे सीमेपासून ३५ किमी दूर आहेत. मात्र हा सारा प्रदेश चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) नियंत्रणाखाली आहे. त्यामुळे तिथे होणारा विकास तसेच इतर बाबींवर लष्कराचे बारीक लक्ष असते. सीमेवर चीनच्या हद्दीत ४०० नवी गावे वसविण्याचा इरादा आहे. त्याद्वारे या सीमाभागात आपली पकड अधिक मजबूत करण्याचा चीनचा डाव आहे. उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीतून भारताच्या सीमेवरील शेवटच्या चौकीपर्यंत जाण्यासाठीच्या रस्त्यात ६ किमी लांबीचा एक बोगदा बांधण्यात येणार आहे.

भारतीय हद्दीतील गावे ओस पडण्याचा धोकाnउत्तराखंड व चीनमध्ये ३५० किमी लांबीची सीमा आहे. भारतीय हद्दीत उत्तराखंडच्या सीमाभागातील गावांमधील लोकांचे रोजगारासाठी दुसऱ्या शहरांत किंवा राज्यांत स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ही गावे ओस पडू लागली आहेत. nत्याउलट चीन आपल्या सीमाभागात नवी गावे वसवत असून, तिथे नागरिकांना सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. nचीनच्या सीमेला लागून असलेल्या भारतीय गावांमध्ये नागरिकांनी पुन्हा येऊन राहावे, त्यांना तिथे पुरेसा रोजगार मिळावा यासाठी भारतानेही प्रयत्न सुरू केले आहेत.  

टॅग्स :chinaचीन