शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

उत्तराखंड सीमेजवळ चीनची आता नवी गावे; नव्या कुरापतीने भारताच्या सुरक्षेला आणखी वाढला धोका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 06:01 IST

ही घरे सीमेपासून ३५ किमी दूर आहेत. मात्र हा सारा प्रदेश चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) नियंत्रणाखाली आहे.

नवी दिल्ली : चीन भारताच्या वारंवार कुरापती काढत आहे. लडाख, अरुणाचल प्रदेशनंतर आता उत्तराखंडच्या सीमेवरही चीनने कारवाया सुरू केल्या आहेत. उत्तराखंडला लागून असलेल्या सीमेनजीक चीन त्याच्या हद्दीत आणखी नवी गावे वसवत आहे. लडाख, अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळही चीनने अशी नवी गावे वसविण्यास सुरूवात केली आहे. या गावांमुळे भविष्यात सीमाप्रश्न आणखी गंभीर स्वरूप धारण करण्याची तसेच  भारताच्या सुरक्षेला असलेला  धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.उत्तराखंडला लागून असलेल्या सीेमेपासून ११ किमी दूर चीनच्या हद्दीत ही नवी गावे वसविण्यात येत आहेत. सीमाभागात एके ठिकाणी ५५ ते ५६ नवी घरे बांधली आहेत. (वृत्तसंस्था)

नवा डाव...ही घरे सीमेपासून ३५ किमी दूर आहेत. मात्र हा सारा प्रदेश चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) नियंत्रणाखाली आहे. त्यामुळे तिथे होणारा विकास तसेच इतर बाबींवर लष्कराचे बारीक लक्ष असते. सीमेवर चीनच्या हद्दीत ४०० नवी गावे वसविण्याचा इरादा आहे. त्याद्वारे या सीमाभागात आपली पकड अधिक मजबूत करण्याचा चीनचा डाव आहे. उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीतून भारताच्या सीमेवरील शेवटच्या चौकीपर्यंत जाण्यासाठीच्या रस्त्यात ६ किमी लांबीचा एक बोगदा बांधण्यात येणार आहे.

भारतीय हद्दीतील गावे ओस पडण्याचा धोकाnउत्तराखंड व चीनमध्ये ३५० किमी लांबीची सीमा आहे. भारतीय हद्दीत उत्तराखंडच्या सीमाभागातील गावांमधील लोकांचे रोजगारासाठी दुसऱ्या शहरांत किंवा राज्यांत स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ही गावे ओस पडू लागली आहेत. nत्याउलट चीन आपल्या सीमाभागात नवी गावे वसवत असून, तिथे नागरिकांना सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. nचीनच्या सीमेला लागून असलेल्या भारतीय गावांमध्ये नागरिकांनी पुन्हा येऊन राहावे, त्यांना तिथे पुरेसा रोजगार मिळावा यासाठी भारतानेही प्रयत्न सुरू केले आहेत.  

टॅग्स :chinaचीन