शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

चीनच्या धमक्या आणखी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2017 05:15 IST

भारत व चीन यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादामध्ये भूतानला मध्ये ओढण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या

बीजिंग : भारत व चीन यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादामध्ये भूतानला मध्ये ओढण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा देऊ, अशी धमकी चीनने भारताला दिली आहे. एवढेच नव्हे, तर भूतानमध्येही ढवळाढवळ करण्याची चीनची योजना आहे. भूतानमधील लोक समाधानी नाहीत, असे म्हणत चीनने तेथे हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न चालविल्याचे वृत्त आहे.भारताने भूतान आणि अन्य देशांना आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न केल्यास चीन सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा देईल, असे म्हटले आहे. भूतान हा आनंदी लोकांचा देश म्हणून ओळखला जातो. पण तेथील नागरिक आनंदी वा समाधानी नाहीत, असे चीन सरकारच्या अधिकृत वृत्तपत्राने म्हटले आहे. एकीकडे सिक्कीममध्ये, दुसरीकडे भूतानमध्ये ढवळाढवळ करण्याचे चीनचे प्रयत्न यातून उघड होत आहेत. भूतानने १ लाख नेपाळींना आपल्या देशातून हाकलून लावले होते आणि ते करण्यात भारताचा हात होता आणि १९७५ साली सिक्कीमही भारताने बळकावलेच होते. ते करण्यासाठी भारतीय लष्कराने तेथे जनतेच्या नावाने राजाविरुद्ध तथाकथित बंड घडवून आणले, असाही आरोप चीनने केला आहे. (वृत्तसंस्था)मोदी-जिनपिंग भेट रद्ददोन देशांतील तणाव वाढत चालल्यामुळे जर्मनीतील हॅमबर्ग येथे होणाऱ्या जी२0 परिषदेच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणारी बैठक रद्द करण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. द्विपक्षीय चर्चेसाठी सध्याचे वातावरण योग्य नाही, असे सांगून चीनने दोन नेत्यांची जर्मनीमध्ये भेट होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. वास्तविक दोन नेत्यांच्या भेटीतून वाद संपविण्यासंदर्भात काही तोडगा निघेल, अशी अपेक्षा होती. मात्र राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार नाहीत, असे सांगून चीनने ती शक्यता फेटाळून लावली आहे. चीनचा युद्धसरावचिनी लष्कराने तिबेटच्या पर्वतराजीत ५,१०० मीटर उंचीवर रणागाड्यांसह नवीन शस्त्रास्त्र उपकरणांची चाचणी घेतली, असे वृत्त चीनच्या सरकारी ‘झिन्हुआ’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. नवी शस्त्रास्त्र उपकरणांसह चिनी फौजांनी गोळीबार करीत युद्धाचा सरावही केला. सिक्कीममधील जनतेची स्वतंत्र होण्यासाठीची आंदोलने भारताने चिरडली, असा हास्यास्पद दावा चीनने केला आहे. एवढे सारे आरोप करणाऱ्या चीनने भारताला मात्र तिबेट व दलाई लामा यांचा विषय उकरून काढू नये, असा शहाजोग सल्ला दिला आहे. संबंधांबाबत पुनर्विचार करण्याचे भारताने ठरविले, तर ते भारताला महागात पडेल, अशीही धमकी चीनने दिली आहे.