शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

चीनच्या धमक्या आणखी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2017 05:15 IST

भारत व चीन यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादामध्ये भूतानला मध्ये ओढण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या

बीजिंग : भारत व चीन यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादामध्ये भूतानला मध्ये ओढण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा देऊ, अशी धमकी चीनने भारताला दिली आहे. एवढेच नव्हे, तर भूतानमध्येही ढवळाढवळ करण्याची चीनची योजना आहे. भूतानमधील लोक समाधानी नाहीत, असे म्हणत चीनने तेथे हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न चालविल्याचे वृत्त आहे.भारताने भूतान आणि अन्य देशांना आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न केल्यास चीन सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा देईल, असे म्हटले आहे. भूतान हा आनंदी लोकांचा देश म्हणून ओळखला जातो. पण तेथील नागरिक आनंदी वा समाधानी नाहीत, असे चीन सरकारच्या अधिकृत वृत्तपत्राने म्हटले आहे. एकीकडे सिक्कीममध्ये, दुसरीकडे भूतानमध्ये ढवळाढवळ करण्याचे चीनचे प्रयत्न यातून उघड होत आहेत. भूतानने १ लाख नेपाळींना आपल्या देशातून हाकलून लावले होते आणि ते करण्यात भारताचा हात होता आणि १९७५ साली सिक्कीमही भारताने बळकावलेच होते. ते करण्यासाठी भारतीय लष्कराने तेथे जनतेच्या नावाने राजाविरुद्ध तथाकथित बंड घडवून आणले, असाही आरोप चीनने केला आहे. (वृत्तसंस्था)मोदी-जिनपिंग भेट रद्ददोन देशांतील तणाव वाढत चालल्यामुळे जर्मनीतील हॅमबर्ग येथे होणाऱ्या जी२0 परिषदेच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणारी बैठक रद्द करण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. द्विपक्षीय चर्चेसाठी सध्याचे वातावरण योग्य नाही, असे सांगून चीनने दोन नेत्यांची जर्मनीमध्ये भेट होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. वास्तविक दोन नेत्यांच्या भेटीतून वाद संपविण्यासंदर्भात काही तोडगा निघेल, अशी अपेक्षा होती. मात्र राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार नाहीत, असे सांगून चीनने ती शक्यता फेटाळून लावली आहे. चीनचा युद्धसरावचिनी लष्कराने तिबेटच्या पर्वतराजीत ५,१०० मीटर उंचीवर रणागाड्यांसह नवीन शस्त्रास्त्र उपकरणांची चाचणी घेतली, असे वृत्त चीनच्या सरकारी ‘झिन्हुआ’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. नवी शस्त्रास्त्र उपकरणांसह चिनी फौजांनी गोळीबार करीत युद्धाचा सरावही केला. सिक्कीममधील जनतेची स्वतंत्र होण्यासाठीची आंदोलने भारताने चिरडली, असा हास्यास्पद दावा चीनने केला आहे. एवढे सारे आरोप करणाऱ्या चीनने भारताला मात्र तिबेट व दलाई लामा यांचा विषय उकरून काढू नये, असा शहाजोग सल्ला दिला आहे. संबंधांबाबत पुनर्विचार करण्याचे भारताने ठरविले, तर ते भारताला महागात पडेल, अशीही धमकी चीनने दिली आहे.