शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
2
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
3
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
4
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
5
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
6
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
7
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
8
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
9
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
10
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
11
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
12
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
13
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
14
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
15
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
16
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
17
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
18
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
19
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
20
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या धमक्या आणखी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2017 05:15 IST

भारत व चीन यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादामध्ये भूतानला मध्ये ओढण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या

बीजिंग : भारत व चीन यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादामध्ये भूतानला मध्ये ओढण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा देऊ, अशी धमकी चीनने भारताला दिली आहे. एवढेच नव्हे, तर भूतानमध्येही ढवळाढवळ करण्याची चीनची योजना आहे. भूतानमधील लोक समाधानी नाहीत, असे म्हणत चीनने तेथे हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न चालविल्याचे वृत्त आहे.भारताने भूतान आणि अन्य देशांना आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न केल्यास चीन सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा देईल, असे म्हटले आहे. भूतान हा आनंदी लोकांचा देश म्हणून ओळखला जातो. पण तेथील नागरिक आनंदी वा समाधानी नाहीत, असे चीन सरकारच्या अधिकृत वृत्तपत्राने म्हटले आहे. एकीकडे सिक्कीममध्ये, दुसरीकडे भूतानमध्ये ढवळाढवळ करण्याचे चीनचे प्रयत्न यातून उघड होत आहेत. भूतानने १ लाख नेपाळींना आपल्या देशातून हाकलून लावले होते आणि ते करण्यात भारताचा हात होता आणि १९७५ साली सिक्कीमही भारताने बळकावलेच होते. ते करण्यासाठी भारतीय लष्कराने तेथे जनतेच्या नावाने राजाविरुद्ध तथाकथित बंड घडवून आणले, असाही आरोप चीनने केला आहे. (वृत्तसंस्था)मोदी-जिनपिंग भेट रद्ददोन देशांतील तणाव वाढत चालल्यामुळे जर्मनीतील हॅमबर्ग येथे होणाऱ्या जी२0 परिषदेच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणारी बैठक रद्द करण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. द्विपक्षीय चर्चेसाठी सध्याचे वातावरण योग्य नाही, असे सांगून चीनने दोन नेत्यांची जर्मनीमध्ये भेट होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. वास्तविक दोन नेत्यांच्या भेटीतून वाद संपविण्यासंदर्भात काही तोडगा निघेल, अशी अपेक्षा होती. मात्र राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार नाहीत, असे सांगून चीनने ती शक्यता फेटाळून लावली आहे. चीनचा युद्धसरावचिनी लष्कराने तिबेटच्या पर्वतराजीत ५,१०० मीटर उंचीवर रणागाड्यांसह नवीन शस्त्रास्त्र उपकरणांची चाचणी घेतली, असे वृत्त चीनच्या सरकारी ‘झिन्हुआ’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. नवी शस्त्रास्त्र उपकरणांसह चिनी फौजांनी गोळीबार करीत युद्धाचा सरावही केला. सिक्कीममधील जनतेची स्वतंत्र होण्यासाठीची आंदोलने भारताने चिरडली, असा हास्यास्पद दावा चीनने केला आहे. एवढे सारे आरोप करणाऱ्या चीनने भारताला मात्र तिबेट व दलाई लामा यांचा विषय उकरून काढू नये, असा शहाजोग सल्ला दिला आहे. संबंधांबाबत पुनर्विचार करण्याचे भारताने ठरविले, तर ते भारताला महागात पडेल, अशीही धमकी चीनने दिली आहे.