शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
4
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
5
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
8
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
9
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
10
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
13
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
14
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
15
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
16
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
17
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
18
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
19
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
20
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत

चीनच्या धमक्या आणखी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2017 05:15 IST

भारत व चीन यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादामध्ये भूतानला मध्ये ओढण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या

बीजिंग : भारत व चीन यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादामध्ये भूतानला मध्ये ओढण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा देऊ, अशी धमकी चीनने भारताला दिली आहे. एवढेच नव्हे, तर भूतानमध्येही ढवळाढवळ करण्याची चीनची योजना आहे. भूतानमधील लोक समाधानी नाहीत, असे म्हणत चीनने तेथे हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न चालविल्याचे वृत्त आहे.भारताने भूतान आणि अन्य देशांना आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न केल्यास चीन सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा देईल, असे म्हटले आहे. भूतान हा आनंदी लोकांचा देश म्हणून ओळखला जातो. पण तेथील नागरिक आनंदी वा समाधानी नाहीत, असे चीन सरकारच्या अधिकृत वृत्तपत्राने म्हटले आहे. एकीकडे सिक्कीममध्ये, दुसरीकडे भूतानमध्ये ढवळाढवळ करण्याचे चीनचे प्रयत्न यातून उघड होत आहेत. भूतानने १ लाख नेपाळींना आपल्या देशातून हाकलून लावले होते आणि ते करण्यात भारताचा हात होता आणि १९७५ साली सिक्कीमही भारताने बळकावलेच होते. ते करण्यासाठी भारतीय लष्कराने तेथे जनतेच्या नावाने राजाविरुद्ध तथाकथित बंड घडवून आणले, असाही आरोप चीनने केला आहे. (वृत्तसंस्था)मोदी-जिनपिंग भेट रद्ददोन देशांतील तणाव वाढत चालल्यामुळे जर्मनीतील हॅमबर्ग येथे होणाऱ्या जी२0 परिषदेच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणारी बैठक रद्द करण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. द्विपक्षीय चर्चेसाठी सध्याचे वातावरण योग्य नाही, असे सांगून चीनने दोन नेत्यांची जर्मनीमध्ये भेट होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. वास्तविक दोन नेत्यांच्या भेटीतून वाद संपविण्यासंदर्भात काही तोडगा निघेल, अशी अपेक्षा होती. मात्र राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार नाहीत, असे सांगून चीनने ती शक्यता फेटाळून लावली आहे. चीनचा युद्धसरावचिनी लष्कराने तिबेटच्या पर्वतराजीत ५,१०० मीटर उंचीवर रणागाड्यांसह नवीन शस्त्रास्त्र उपकरणांची चाचणी घेतली, असे वृत्त चीनच्या सरकारी ‘झिन्हुआ’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. नवी शस्त्रास्त्र उपकरणांसह चिनी फौजांनी गोळीबार करीत युद्धाचा सरावही केला. सिक्कीममधील जनतेची स्वतंत्र होण्यासाठीची आंदोलने भारताने चिरडली, असा हास्यास्पद दावा चीनने केला आहे. एवढे सारे आरोप करणाऱ्या चीनने भारताला मात्र तिबेट व दलाई लामा यांचा विषय उकरून काढू नये, असा शहाजोग सल्ला दिला आहे. संबंधांबाबत पुनर्विचार करण्याचे भारताने ठरविले, तर ते भारताला महागात पडेल, अशीही धमकी चीनने दिली आहे.